ETV Bharat / state

संगमनेरात मराठा समाज पुन्हा आक्रमक, आरक्षण मागणीसाठी केले रास्ता रोको - अहमदनगर संगमनेर मराठा मोर्चा रास्ता रोको

एकेकाळी राज्यकर्ता असलेला मराठा समाज आज परिस्थितीमुळे गरीब झालेला आहे. ग्रामीण भागात आमच्या समाजाची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे. आम्हाला बळीराजा म्हटले जाते. पण आमची खरी अवस्था तर राज्यातल्या अगदी शेवटच्या माणसासारखी झाली आहे. तो बळी'राजा' राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही रीतसर आरक्षणाची मागणी केली आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने शासनास निवेदन देण्यात आले.

संगमनेरात मराठा समाज पुन्हा आक्रमक
संगमनेरात मराठा समाज पुन्हा आक्रमक
author img

By

Published : Sep 23, 2020, 8:14 PM IST

अहमदनगर - मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीय सकल मराठा समाज पुन्हा एकवटून आक्रमक होऊन आपल्या आरक्षण मागणीसाठी रस्त्यावर उतरला. संगमनेरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने आज संगमनेर बस स्थानकासमोर मोठया संख्येने 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.

संगमनेरात मराठा समाज पुन्हा आक्रमक
मराठा आरक्षणाचा सद्यपरिस्थितीत निर्माण झालेला पेच तत्काळ सोडवून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक आरक्षण व इतर सुविधा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बसस्थानकासमोर मराठा समाज बांधवांनी ठिय्या देत सुमारे एक तास रस्ता अडवत आंदोलन केले. यावेळी विविध घोषणांचे फलक , छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले भगवे झेंडे हातात घेऊन 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे', 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देण्यात आल्या. सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनात बस स्थानकासमोरील रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर करत, सामाजिक अंतर राखत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला दरम्यान अमोल खताळ, खंडू सातपुते, अशोक सातपुते यांनी उपस्थितांना संबोधित करत आरक्षणाबाबत बोलताना आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा - मराठा मोर्चा सनदशीर, गृहमंत्र्यांनी फोन टॅप करू नये- मराठा क्रांती मोर्चाची मागणी

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने शासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, एकेकाळी राज्यकर्ता असलेला मराठा समाज आज परिस्थितीमुळे गरीब झालेला आहे. ग्रामीण भागात आमच्या समाजाची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे. आम्हाला बळीराजा म्हटले जाते. पण आमची खरी अवस्था तर राज्यातल्या अगदी शेवटच्या माणसासारखी झाली आहे. तो बळी'राजा' राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही रीतसर आरक्षणाची मागणी केली आहे. एक आदर्श घालून देत आम्ही आजवर लाखोंच्या संख्येने आंदोलन केली आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या अपेक्षा आहेत त्याला अनुसरून आम्ही आजवर आंदोलन केले आहेत. आमच्या व्यासपीठावर आम्ही राजकारण्यांना येऊ दिलं नाही. एवढा सगळा लढा आम्ही दिला. पण आज न्यायालयाने स्थगितीचा निकाल दिला. त्यामुळे आम्हाला डावलले जात आहे, अशी समाजाची भावना होऊ नये, यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी मराठा समाजातर्फे केली आहे.


निवेदनात सकल मराठा समाजाने खालील मागण्या केल्या आहेत -


1 ) राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल (देशातल्या 26 राज्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे पुनर्विचार याचिका दाखल करावी.) केल्यास आरक्षणाच्या तत्काळ अंमलबजावणीचा मार्ग सुकर होऊ शकेल.

2 ) सरकारने विशेष अधिवेशन बोलावून तातडीने अध्यादेश काढावा.

3 ) नवीन सरकारी नोकर भरती तत्काळ थांबवावी. (पोलीस भरती)

4 ) चालू वर्षीचे प्रवेशाला आरक्षण ग्राह्य धरून, शैक्षणिक फी माफी झाली पाहिजे.

5 ) आरक्षण स्थगिती आदेश निघण्यापूर्वी नोकरीसंदर्भात ज्या जाहिराती निघाल्या आहेत, त्या सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.

6 ) सारथी या संस्थेचे पुनरुज्जीवन होऊन त्याला भरघोस निधी मिळालाच पाहिजे.

7 ) अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करून निधी वाढून मिळालाच पाहिजे.
अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - 'मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसीच्या कोट्यातून नको'

अहमदनगर - मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीय सकल मराठा समाज पुन्हा एकवटून आक्रमक होऊन आपल्या आरक्षण मागणीसाठी रस्त्यावर उतरला. संगमनेरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने आज संगमनेर बस स्थानकासमोर मोठया संख्येने 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.

संगमनेरात मराठा समाज पुन्हा आक्रमक
मराठा आरक्षणाचा सद्यपरिस्थितीत निर्माण झालेला पेच तत्काळ सोडवून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक आरक्षण व इतर सुविधा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बसस्थानकासमोर मराठा समाज बांधवांनी ठिय्या देत सुमारे एक तास रस्ता अडवत आंदोलन केले. यावेळी विविध घोषणांचे फलक , छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले भगवे झेंडे हातात घेऊन 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे', 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देण्यात आल्या. सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनात बस स्थानकासमोरील रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर करत, सामाजिक अंतर राखत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला दरम्यान अमोल खताळ, खंडू सातपुते, अशोक सातपुते यांनी उपस्थितांना संबोधित करत आरक्षणाबाबत बोलताना आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा - मराठा मोर्चा सनदशीर, गृहमंत्र्यांनी फोन टॅप करू नये- मराठा क्रांती मोर्चाची मागणी

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने शासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, एकेकाळी राज्यकर्ता असलेला मराठा समाज आज परिस्थितीमुळे गरीब झालेला आहे. ग्रामीण भागात आमच्या समाजाची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे. आम्हाला बळीराजा म्हटले जाते. पण आमची खरी अवस्था तर राज्यातल्या अगदी शेवटच्या माणसासारखी झाली आहे. तो बळी'राजा' राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही रीतसर आरक्षणाची मागणी केली आहे. एक आदर्श घालून देत आम्ही आजवर लाखोंच्या संख्येने आंदोलन केली आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या अपेक्षा आहेत त्याला अनुसरून आम्ही आजवर आंदोलन केले आहेत. आमच्या व्यासपीठावर आम्ही राजकारण्यांना येऊ दिलं नाही. एवढा सगळा लढा आम्ही दिला. पण आज न्यायालयाने स्थगितीचा निकाल दिला. त्यामुळे आम्हाला डावलले जात आहे, अशी समाजाची भावना होऊ नये, यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी मराठा समाजातर्फे केली आहे.


निवेदनात सकल मराठा समाजाने खालील मागण्या केल्या आहेत -


1 ) राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल (देशातल्या 26 राज्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे पुनर्विचार याचिका दाखल करावी.) केल्यास आरक्षणाच्या तत्काळ अंमलबजावणीचा मार्ग सुकर होऊ शकेल.

2 ) सरकारने विशेष अधिवेशन बोलावून तातडीने अध्यादेश काढावा.

3 ) नवीन सरकारी नोकर भरती तत्काळ थांबवावी. (पोलीस भरती)

4 ) चालू वर्षीचे प्रवेशाला आरक्षण ग्राह्य धरून, शैक्षणिक फी माफी झाली पाहिजे.

5 ) आरक्षण स्थगिती आदेश निघण्यापूर्वी नोकरीसंदर्भात ज्या जाहिराती निघाल्या आहेत, त्या सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.

6 ) सारथी या संस्थेचे पुनरुज्जीवन होऊन त्याला भरघोस निधी मिळालाच पाहिजे.

7 ) अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करून निधी वाढून मिळालाच पाहिजे.
अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - 'मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसीच्या कोट्यातून नको'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.