ETV Bharat / state

'उमेदवाराच्या नावासमोर जात लावून प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या विचारांना गालबोट लावले'

अ‍ॅड. आंबेडकर हे आजपर्यंत जाती अंताविषयी बोलत होते़. शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावरील जातीचा उल्लेख काढून टाकावा, अशी त्यांची मागणी होती. मात्र, त्यांनीच उमेदवारांच्यासमोर जातीचा उल्लेख केला आहे.

author img

By

Published : Mar 18, 2019, 1:16 PM IST

जोगेंद्र कवाडे

अहमदनगर - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी टीका केली आहे. नावापुढे जात लावणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना गालबोट लावण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकरांवर टिकास्त्र सोडले

कवाडेम्हणाले, की अ‍ॅड.आंबेडकर हे आजपर्यंत जाती अंताविषयी बोलत होते़. शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावरील जातीचा उल्लेख काढून टाकावा, अशी त्यांची मागणी होती. मात्र, त्यांनीच उमेदवारांच्यासमोर जातीचा उल्लेख केला आहे.आता आंबेडकर यांच्या जाती अंताच्या लढ्याला काय अर्थ आहे? असा सवाल कवाडे यांनी उपस्थित केला.

कवाडेंची आघाडीकडे चार जागांची मागणी
लोकसभा निवडणुकीत पिपल्स रिबब्लिकन पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व लोकाधिकार पक्ष यांची महाअघाडी आहे.आम्ही महाआघाडीकडे महाराष्ट्रातील ४ जागांची मागणी केली आहे.यामध्ये शिर्डी, अमरावती, रामटेक व इचलकरंजी यांचा समावेश आहे. आम्हाला किमान २ जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर आपण स्वत: निवडणूक लढविणार आहोत. महाआघाडीत येण्याचे वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण दिले होते.त्यांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नाही असे कवाडे यांनी सांगितले.

अहमदनगर - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी टीका केली आहे. नावापुढे जात लावणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना गालबोट लावण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकरांवर टिकास्त्र सोडले

कवाडेम्हणाले, की अ‍ॅड.आंबेडकर हे आजपर्यंत जाती अंताविषयी बोलत होते़. शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावरील जातीचा उल्लेख काढून टाकावा, अशी त्यांची मागणी होती. मात्र, त्यांनीच उमेदवारांच्यासमोर जातीचा उल्लेख केला आहे.आता आंबेडकर यांच्या जाती अंताच्या लढ्याला काय अर्थ आहे? असा सवाल कवाडे यांनी उपस्थित केला.

कवाडेंची आघाडीकडे चार जागांची मागणी
लोकसभा निवडणुकीत पिपल्स रिबब्लिकन पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व लोकाधिकार पक्ष यांची महाअघाडी आहे.आम्ही महाआघाडीकडे महाराष्ट्रातील ४ जागांची मागणी केली आहे.यामध्ये शिर्डी, अमरावती, रामटेक व इचलकरंजी यांचा समावेश आहे. आम्हाला किमान २ जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर आपण स्वत: निवडणूक लढविणार आहोत. महाआघाडीत येण्याचे वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण दिले होते.त्यांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नाही असे कवाडे यांनी सांगितले.

Intro:अहमदनगर- उमेदवारा समोर जातीचे नाव लावून प्रकाश आंबेडकरांनी महामानवाच्या विचारांना गालबोट लावले..-जोगेंद्र कवाडे.Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_18_march_ahm_trimujhe_1_kawade_press_b
mh_18_march_ahm_trimujhe_2_kawade_press_b

अहमदनगर- उमेदवारा समोर जातीचे नाव लावून प्रकाश आंबेडकरांनी महामानवाच्या विचारांना गालबोट लावले..-जोगेंद्र कवाडे.

अहमदनगर- जातीच्या अंतासाठी लढणा-या अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे़ या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आज अहमदनगर येथे केली. यावेळी बोलताना जोगेंद्र कवाडे म्हणाले की, अ‍ॅड. आंबेडकर हे आजपर्यंत जाती अंताविषयी बोलत होते़. शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावरील जातीचा उल्लेख काढून टाकावा अशी त्यांची मागणी होती प्रत्यक्षात मात्र त्यांनीच त्यांच्या उमेदवारांच्यासमोर जातीचा उल्लेख केला आहे. आता आंबेडकर यांच्या जाती अंताच्या लढ्याला काय अर्थ आहे? असाही सवाल कवाडे यांनी उपस्थित केला. 

कवाडें कडून आघाडी कडे चार जागांची मागणी-
-लोकसभा निवडणुकीत पिपल्स रिबब्लिकन पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व लोकाधिकार पक्ष यांची महाअघाडी आहे.  आम्ही महाआघाडीकडे महाराष्ट्रातील चार जागांची मागणी केली आहे. यामध्ये शिर्डी, अमरावती, रामटेक  व इचलकरंजी यांचा समावेश आहे. आम्हाला किमान दोन जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर आपण स्वत: निवडणूक लढविणार आहोत. महाआघाडीत येण्याचे वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण दिले होते त्यांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नाही असे कवाडे यांनी सांगितले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- उमेदवारा समोर जातीचे नाव लावून प्रकाश आंबेडकरांनी महामानवाच्या विचारांना गालबोट लावले..-जोगेंद्र कवाडे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.