ETV Bharat / state

पाण्यासाठी छावा क्रांतीवीर संघटनेने थोपटले दंड; राहाता तहसील कार्यालयाबाहेर ५ दिवसांपासून उपोषण

गोदावरी उजवा कालव्याच्या 60 मैल 20 चारी दरम्यान पाण्याच्या वाटपात मोठा घोटाळा झाल्याचे क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी म्हटले आहे.

author img

By

Published : Sep 6, 2019, 1:21 PM IST

Updated : Sep 6, 2019, 3:02 PM IST

छावा क्रांतीवीर संघटनेचे कार्यकर्ते

अहमदनगर - गोदावरी उजवा कालव्यात सोडण्यात आलेल्या आवर्तनातून धनदांडग्या लोकांची शेततळे भरुन दिली, असा आरोप छावा क्रांतीवीर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे संघटनेने राहाता तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. गेल्या ५ दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे.

पाटाच्या पाण्यासाठी राहाता तहसील कार्यालयासमोर छावा क्रांतीवीर संघटनेचे आंदोलन

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या उपोषणाला व्यापाऱ्यांचाही दुकाने बंद ठेऊन पाठिंबा

गोदावरी उजवा कालव्याचे पाणी आवर्तन 18 ऑगस्ट 2019 ला सोडण्यात आले होते. या आवर्तनादरम्यान उपअभियंता व शाखाधिकारी यांनी धनदांडग्या लोकांच्या शेतातील शेततळे भरून देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी समर्थकांसह राहाता तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा - दुष्काळाची दाहकता असह्य झाल्याने शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन

गोदावरी उजवा कालव्याच्या 60 मैल 20 चारी दरम्यान पाण्याच्या वाटपात मोठा घोटाळा झाल्याचेही वाघ यांनी म्हटले. ते म्हणाले, अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने केली होती. मात्र, त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे 2 सप्टेंबरला आम्ही हे उपोषण सुरू केले. संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही अथवा कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अहमदनगर - गोदावरी उजवा कालव्यात सोडण्यात आलेल्या आवर्तनातून धनदांडग्या लोकांची शेततळे भरुन दिली, असा आरोप छावा क्रांतीवीर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे संघटनेने राहाता तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. गेल्या ५ दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे.

पाटाच्या पाण्यासाठी राहाता तहसील कार्यालयासमोर छावा क्रांतीवीर संघटनेचे आंदोलन

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या उपोषणाला व्यापाऱ्यांचाही दुकाने बंद ठेऊन पाठिंबा

गोदावरी उजवा कालव्याचे पाणी आवर्तन 18 ऑगस्ट 2019 ला सोडण्यात आले होते. या आवर्तनादरम्यान उपअभियंता व शाखाधिकारी यांनी धनदांडग्या लोकांच्या शेतातील शेततळे भरून देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी समर्थकांसह राहाता तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा - दुष्काळाची दाहकता असह्य झाल्याने शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन

गोदावरी उजवा कालव्याच्या 60 मैल 20 चारी दरम्यान पाण्याच्या वाटपात मोठा घोटाळा झाल्याचेही वाघ यांनी म्हटले. ते म्हणाले, अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने केली होती. मात्र, त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे 2 सप्टेंबरला आम्ही हे उपोषण सुरू केले. संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही अथवा कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Intro:



Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_गोदावरी उजवा कालव्या सोडण्यात आलेल्या आवर्तणातुन सामान्य शेतकर्यांना पाणी न देता
धनदांडग्या लोकांची शेततळे भरून दिल्याचा आरोप करत गेल्या पाच दिवसा पासुन छावा क्रांतीवीर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहाता तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे....

VO_ शेतकऱ्यांवर अन्याय करणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करा या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ हे आपल्या समर्थकां सह राहाता तहसील कार्यालयासमोर उपोषण करताय गोदावरी उजवा कालव्याच्या 60 मैल 20 चारी दरम्यान पाण्याच्या वाटपात मोठा घोटाळा झाल्याच त्यांनी म्हटलय गोदावरी उजवा कालव्याचे पाणी आवर्तन 18 ऑगस्ट 2019 रोजी सोडण्यात आले होते या आवर्तना दरम्यान उप अभियंता व शाखाधिकारी यांनी धनदांडग्या लोकांच्या शेतातील शेततळे भरून देऊन सर्वसामान्य शेतकरी यांवर अन्याय केल्याचा आरोप संघटनेने केला आहे शेतकऱ्यांवर अन्याय करणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने करण्यात आली होती मात्र त्याची कुठलीही दखल न घेता कारवाई शून्य झाल्याने
2 सप्टेंबर रोजी छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी राहाता तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही अथवा कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे यावेळी उपोषणकर्ते विश्वनाथ वाघ यांनी म्हटलय....

BITE_ विश्वनाथ वाघ अध्यक्ष छावा क्रातिवीर संघटना

BITE_ आहेर तहसीलदार Body:mh_ahm_shirdi_water andolan_6_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_water andolan_6_visuals_bite_mh10010
Last Updated : Sep 6, 2019, 3:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.