ETV Bharat / state

कोरोना संकट संपलेले नसून ते टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी - बाळासाहेब थोरात

author img

By

Published : Jun 10, 2020, 5:14 PM IST

मागील 2 महिन्यात लॉकडाऊनमुळे कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले आहे. सुमारे 75 दिवसानंतर राज्यात 'मिशन बिगेन' अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी ही पूर्णपणे मोकळीक नाही हे लक्षात घ्यावे, असे थोरात म्हणाले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, Revenue minister Balasaheb thorat
Revenue minister Balasaheb thorat

अहमदनगर - कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सतर्क आहेत. हे संकट अजून संपलेले नाही. लॉकडाऊननंतरच्या काळात सर्व व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शासन काम करत आहे. लॉकडाऊनमधील शिथिलता ही पूर्णपणे मोकळीक नसून कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने स्व:तची काळजी घेत स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

राज्यासह जिल्हा व संगमनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील 2 महिन्यात लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. सुमारे 75 दिवसानंतर राज्यात 'मिशन बिगेन' अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी ही पूर्णपणे मोकळीक नाही हे लक्षात घ्यावे.कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून तो काही भागात संक्रमणातून वाढू पहात आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. याच बरोबर मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धूणे, स्व:तमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात पाले भाज्यांचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोना संकटात आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग, इतर शासकीय कर्मचारी व विविध स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी कोरोना योद्धा म्हणून चांगले काम केले.

आपल्याला ही कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असून राज्य कोरोनामुक्त करायचे आहे. यासाठी प्रत्येकाने स्व:तची काळजी घेणे आवश्यक आहे. या संकटसमयी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अहमदनगर - कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सतर्क आहेत. हे संकट अजून संपलेले नाही. लॉकडाऊननंतरच्या काळात सर्व व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शासन काम करत आहे. लॉकडाऊनमधील शिथिलता ही पूर्णपणे मोकळीक नसून कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने स्व:तची काळजी घेत स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

राज्यासह जिल्हा व संगमनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील 2 महिन्यात लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. सुमारे 75 दिवसानंतर राज्यात 'मिशन बिगेन' अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी ही पूर्णपणे मोकळीक नाही हे लक्षात घ्यावे.कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून तो काही भागात संक्रमणातून वाढू पहात आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. याच बरोबर मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धूणे, स्व:तमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात पाले भाज्यांचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोना संकटात आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग, इतर शासकीय कर्मचारी व विविध स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी कोरोना योद्धा म्हणून चांगले काम केले.

आपल्याला ही कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असून राज्य कोरोनामुक्त करायचे आहे. यासाठी प्रत्येकाने स्व:तची काळजी घेणे आवश्यक आहे. या संकटसमयी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.