ETV Bharat / state

सरकार पाच वर्ष टिकावं म्हणूनच बैठका सुरू - बाळासाहेब थोरात

author img

By

Published : Nov 16, 2019, 8:05 PM IST

राज्याला स्थिर सरकार द्यायचे आहे. ते सरकार पाच वर्षे चालायला हवे, यासाठी सर्व गोष्टींवर चर्चा करून नंतरच पुढे जायचे आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चर्चा सुरू असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात

अहमदनगर - विधानसभा निवडणुकांचे हिशोब सादर करण्याची शेवटची मुदत असल्याने, बहुतांश आमदार मतदारसंघात आहेत. त्यामुळे राज्यपालांची भेट घेणे रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच शिवसेना आणि आघाडी यांच्यात सरकार स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचेही थोरात यांनी म्हटले आहे. संगमनेर येथे पत्रकारांसोबत थोरात बोलत होते.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर

राज्यपालांची भेट घेण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने वेळ मागितली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांचे हिशोब सादर करण्याची शेवटची मुदत असल्याने आणि बहुतांश आमदार हे त्यांच्या मतदारसंघात असल्याने, शनिवारी घेण्यात येणारी राज्यपालांची भेट रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे दिली.

हेही वाचा... नवी मुंबईत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घटले

राज्यात सरकार स्थापनेबाबत शरद पवार यांच्या बरोबर आमचीही भूमिका, सरकार पाच वर्षे चालावे अशीच आहे. त्यामुळे सरकार पाच वर्षे टिकवायचे असल्याने सर्वच गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे. कोणतीही शंका न ठेवता पुढे गेले पाहिजे, त्यासाठी चर्चा सुरू आहेत. दिल्लीतही याबाबत चर्चा केली जात आहे. काही दिवस लागतील मात्र सर्व व्यवस्थित होईल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा... राज्यभरात राहुल गांधींविरोधात आंदोलन, राफेलसंदर्भात जाहीर माफी मागण्याची मागणी

राज्यात सरकार स्थापनेचा विषय चालू असतानाच महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्याबाबत अजून कोणतेही आदेश आम्ही दिलेले नाही, मात्र स्थानिक पातळीवर भाजपला दूर ठेवण्यासाठी कार्यकर्ते संख्याबळासाठी काही निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता थोरात यांनी व्यक्त केली आहे. राज्यात पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील की नाही, याबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असेही थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

अहमदनगर - विधानसभा निवडणुकांचे हिशोब सादर करण्याची शेवटची मुदत असल्याने, बहुतांश आमदार मतदारसंघात आहेत. त्यामुळे राज्यपालांची भेट घेणे रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच शिवसेना आणि आघाडी यांच्यात सरकार स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचेही थोरात यांनी म्हटले आहे. संगमनेर येथे पत्रकारांसोबत थोरात बोलत होते.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर

राज्यपालांची भेट घेण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने वेळ मागितली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांचे हिशोब सादर करण्याची शेवटची मुदत असल्याने आणि बहुतांश आमदार हे त्यांच्या मतदारसंघात असल्याने, शनिवारी घेण्यात येणारी राज्यपालांची भेट रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे दिली.

हेही वाचा... नवी मुंबईत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घटले

राज्यात सरकार स्थापनेबाबत शरद पवार यांच्या बरोबर आमचीही भूमिका, सरकार पाच वर्षे चालावे अशीच आहे. त्यामुळे सरकार पाच वर्षे टिकवायचे असल्याने सर्वच गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे. कोणतीही शंका न ठेवता पुढे गेले पाहिजे, त्यासाठी चर्चा सुरू आहेत. दिल्लीतही याबाबत चर्चा केली जात आहे. काही दिवस लागतील मात्र सर्व व्यवस्थित होईल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा... राज्यभरात राहुल गांधींविरोधात आंदोलन, राफेलसंदर्भात जाहीर माफी मागण्याची मागणी

राज्यात सरकार स्थापनेचा विषय चालू असतानाच महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्याबाबत अजून कोणतेही आदेश आम्ही दिलेले नाही, मात्र स्थानिक पातळीवर भाजपला दूर ठेवण्यासाठी कार्यकर्ते संख्याबळासाठी काही निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता थोरात यांनी व्यक्त केली आहे. राज्यात पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील की नाही, याबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असेही थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:



Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ राज्यपालांची भेट घेण्यासाठी शिवसेनेसह आम्ही कॉग्रेस राष्ड्रवादीने वेळ मागीतला होता मात्र विधानसभा निवडणुकांचे हिशोब सादर करण्याची शेवटची मुदत असल्याने आणि बहुतांशी आमदार हे मतदारसंघात असल्याने आज घेण्यात येणारी राज्यपालाची भेट ही रद्द करण्यात आली असल्याची माहीती कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथे दिली आहे....


VO_ राज्यात सरकार स्थापने बाबत पवार साहेबांन बरोबरच आमचीही हीच भुमिका आहे की सरकार पाच वर्षे टिकवायच आहे त्या मुळे सर्वच गोष्टींन वर चर्चा झाली पाहीजे काही शंका न ठेवता पुढ गेल पाहीजे त्या नुसार चर्चा सुरु आहेत दिल्लीतही या बाबत चर्चा केली जातेय कदाचीत चार दिवस जास्त जातील मात्र जे होईल ते व्यवस्थीत होईल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय....

BITE_बाळासाहेब थोरात कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष

VO_ राज्य सरकारच्या स्थापनेचा विषय चालु असतांनाच महानगर पालीकेच्या निवडणुका येताय आम्ही तर अजुन काही तसे आदेश दिलेले नाही मात्र स्थानिक पातळीवर भाजपाला दुर ठेवण्यासाठी कार्यकर्ते संख्याबळासाठी तसा निर्णय घेवुु शकतात असे मला वाटतय..राज्यात पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील या बाबत अद्याप काही सांगु शकत नाही तीन्ही पक्ष एकत्र बसुन जो काय निर्णय घ्यायचा तो घेतला जाईल आणि ठरेल असही थोरातांनी स्पष्ट केलय....Body:mh_ahm_shirdi balasaheb thorat_16_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi balasaheb thorat_16_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.