ETV Bharat / state

Balasaheb Thorat on Govt : कसब्यातून बदलाचे वारे सुरू झाले; 2024 मध्ये संपूर्ण बदल पाहायला मिळेल - बाळासाहेब थोरात

author img

By

Published : Mar 4, 2023, 1:58 PM IST

राज्यातील जनता शिंदे फडणवीस सरकारला कंटाळली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसब्यातून बदलाचे वारे सुरू झाले आहे. 2024 मध्ये संपूर्ण बदल पाहायला मिळेल असे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तसेच जिल्ह्यातही काही मंडळी जिरवा जिरवीचे राजकारण करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात
2024 मध्ये संपूर्ण बदल पाहायला मिळेल

अहमदनगर : संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रास्ता रोको हा शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी आहे. मात्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वसामान्य जनतेला त्रास नको म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांनी रास्ता रोको करण्या ऐवजी धरणे आंदोलन करून आपली भूमिका मांडावी अशी सूचना कार्यकर्त्यांना केल्या. लोकांना वेठीस न धरता लोकशाही व न्याय पद्धतीने आपल्या मागण्या मांडण्याची ही पद्धत नक्कीच राज्यासाठी अनुकरणीय ठरणार आहे, असे ते म्हणाले.

पिकांचे भाव पडले : भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येतो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देणाऱ्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कांद्याचा प्रश्न मोठा अवघड : कांद्याचा प्रश्न सध्या मोठा अवघड झाला आहे. दुष्काळी भागातील शेतकरी मोठ्या खर्चातून कांदा पीक घेतो. मात्र कमी भाव झाल्याने हे सर्व शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. या अडचणीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने कायम शेतकऱ्यांना मदत केली. मात्र सध्याचे सरकार फक्त मेट्रोसिटी आणि मेट्रोवर भर देत असून शेतकऱ्याकडे दुय्यम भावनेतून पहात आहे. वीज मोफत करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. अधिकाऱ्यांनी जनतेच्या हिताची कामे करावी सत्ता येते आणि जाते मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या काही लोकांकडून जिरवा जिरवीचे राजकारण सुरू आहे. गरीब आणि निरपराधांना त्रास देऊ नका. अधिकाऱ्यांनी न्याय भूमिकेने वागा. जिरवा जिरवीचे राजकारण करणाऱ्यांची जनताच जिरवेल असेही असा टोलाही आमदार थोरात यांनी लगावला.

हेही वाचा : Gold Hallmark : सोन्याच्या दागिन्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, आता सहा अंकी हॉलमार्क लागू होणार

2024 मध्ये संपूर्ण बदल पाहायला मिळेल

अहमदनगर : संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रास्ता रोको हा शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी आहे. मात्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वसामान्य जनतेला त्रास नको म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांनी रास्ता रोको करण्या ऐवजी धरणे आंदोलन करून आपली भूमिका मांडावी अशी सूचना कार्यकर्त्यांना केल्या. लोकांना वेठीस न धरता लोकशाही व न्याय पद्धतीने आपल्या मागण्या मांडण्याची ही पद्धत नक्कीच राज्यासाठी अनुकरणीय ठरणार आहे, असे ते म्हणाले.

पिकांचे भाव पडले : भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येतो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देणाऱ्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कांद्याचा प्रश्न मोठा अवघड : कांद्याचा प्रश्न सध्या मोठा अवघड झाला आहे. दुष्काळी भागातील शेतकरी मोठ्या खर्चातून कांदा पीक घेतो. मात्र कमी भाव झाल्याने हे सर्व शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. या अडचणीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने कायम शेतकऱ्यांना मदत केली. मात्र सध्याचे सरकार फक्त मेट्रोसिटी आणि मेट्रोवर भर देत असून शेतकऱ्याकडे दुय्यम भावनेतून पहात आहे. वीज मोफत करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. अधिकाऱ्यांनी जनतेच्या हिताची कामे करावी सत्ता येते आणि जाते मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या काही लोकांकडून जिरवा जिरवीचे राजकारण सुरू आहे. गरीब आणि निरपराधांना त्रास देऊ नका. अधिकाऱ्यांनी न्याय भूमिकेने वागा. जिरवा जिरवीचे राजकारण करणाऱ्यांची जनताच जिरवेल असेही असा टोलाही आमदार थोरात यांनी लगावला.

हेही वाचा : Gold Hallmark : सोन्याच्या दागिन्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, आता सहा अंकी हॉलमार्क लागू होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.