ETV Bharat / state

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात?

author img

By

Published : Jul 2, 2019, 6:18 PM IST

गेल्या दोन दिवसांपूर्वी चव्हाण यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

बाळासाहेब थोरात

अहमदनगर - संगमनेरचे आमदार आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. एवढेच नाहीतर देशातही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. मात्र, त्यांचा राजीनामा अद्यापही स्विकारला नाही. राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील गेल्या मे महिन्यामध्ये राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा स्विकारला नव्हता. गेल्या दोन दिवसांपूर्वी चव्हाण यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच अशोक चव्हाण यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी देणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

अहमदनगर - संगमनेरचे आमदार आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. एवढेच नाहीतर देशातही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. मात्र, त्यांचा राजीनामा अद्यापही स्विकारला नाही. राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील गेल्या मे महिन्यामध्ये राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा स्विकारला नव्हता. गेल्या दोन दिवसांपूर्वी चव्हाण यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच अशोक चव्हाण यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी देणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

Intro:Shirdi_Ravindra Mahale


ANCHOR_ संगमनेर तालुक्याचे आमदार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याची ई टीव्ही भारतला सुत्रानची माहिती....

VO_ काँग्रेस पक्षाचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यानी में महिन्यात आपल्या पदाचा राजीनिमा दिला होता आणि अखेर अशोक चव्हाण यांचा काँग्रेस अध्यक्ष यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी राजीनामा स्वीकारला असून प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्राणी दिली आहे..विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत..बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असून विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचंही चर्चा सध्या सुरु आहे....Body:MH_AHM_Shirdi Balasaheb Thorat On Pradesh Adhyksha_2 July_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Balasaheb Thorat On Pradesh Adhyksha_2 July_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.