ETV Bharat / state

'पटानी'च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर

अहमदनगर - संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील नवनिर्वाचित युवा आमदारांनी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धिरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी हे उपस्थित होते.

author img

By

Published : Jan 17, 2020, 5:29 PM IST

Updated : Jan 17, 2020, 7:39 PM IST

ahamadnagar
'पटानी’च्या प्रश्नावर आदित्य अवधूतला म्हणाले, तुमची 'दिशा' चुकली...

अहमदनगर - संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील नवनिर्वाचित युवा आमदारांनी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धिरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी हे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी या आमदारांची मुलाखत गायक अवधूत गुप्ते यांनी घेतली. यावेळी अवधूत गुप्ते यांनी सर्व युवा आमदारांना राजकीय प्रश्न तर विचारलेच पण वैयक्तिक प्रश्नही विचारून धमाल उडवून दिली.

'पटानी’च्या प्रश्नावर आदित्य अवधूतला म्हणाले, तुमची 'दिशा' चुकली...

हेही वाचा - युवा आमदारांशी संवाद: 'महाराष्ट्राला गरज असताना सगळी नाती एकत्र'

या मुलाखती दरम्यान, गुप्ते यांनी आदित्य ठाकरेंना आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे देते. रश्मी वहिनींनी किती वर्ष तुमची जबाबदारी घ्यायची असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी एकच जल्लोष केला. या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनीही हजरजबाबीपणे उत्तर देत म्हणाले, “आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईने मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे. त्यावर गुप्तेंनी पुन्हा विचारले, आम्हाला मध्ये मध्ये बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात ‘पटनी’ चाहीए. आपका उत्तर पटानी चाहीए. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असे म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

हेही वाचा - ...आणि रोहित पवारांनी मंचावरूनच लावला नरेंद्र मोदींना फोन

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “बाळासाहेब थोरात साहेबांचे आभार मानतो की तुम्ही हा संवादाचा कार्यक्रम आयोजित केला. मी आदित्य संवाद कार्यक्रम सुरु केला. लोकांमधले प्रश्न विचारण्याचे धाडस वाढते ते महत्वाचे आहे. कुठलाही प्रोटोकॉल मिळाला किंवा काढला तरी राहणे, वागणे बदलू नका, असे आजोबा आणि वडिलांनी मला सांगितलं आहे. राजकारण्यांची खासियत दहा वर्षांपूर्वी बोललेले आठवत नाही, पण आम्ही महाविकास आघाडीत लक्षात ठेवतो, असे ते म्हणाले.

हेही वाचा - 'लंके प्रतिष्ठान'च्यावतीने पारनेरमध्ये कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन

दरम्यान, कार्यक्रमात ठाकरे म्हणाले की, आजोबा हे वेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी विचारांची पेरणी केली. काल कुणीतरी महाराष्ट्राचे चार तुकडे होऊ शकतात, असे म्हटले. महाराष्ट्राचे भविष्य घडवायचो आहे म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

'पटानी'च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर

अहमदनगर - संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील नवनिर्वाचित युवा आमदारांनी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धिरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी हे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी या आमदारांची मुलाखत गायक अवधूत गुप्ते यांनी घेतली. यावेळी अवधूत गुप्ते यांनी सर्व युवा आमदारांना राजकीय प्रश्न तर विचारलेच पण वैयक्तिक प्रश्नही विचारून धमाल उडवून दिली.

'पटानी’च्या प्रश्नावर आदित्य अवधूतला म्हणाले, तुमची 'दिशा' चुकली...

हेही वाचा - युवा आमदारांशी संवाद: 'महाराष्ट्राला गरज असताना सगळी नाती एकत्र'

या मुलाखती दरम्यान, गुप्ते यांनी आदित्य ठाकरेंना आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे देते. रश्मी वहिनींनी किती वर्ष तुमची जबाबदारी घ्यायची असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी एकच जल्लोष केला. या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनीही हजरजबाबीपणे उत्तर देत म्हणाले, “आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईने मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे. त्यावर गुप्तेंनी पुन्हा विचारले, आम्हाला मध्ये मध्ये बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात ‘पटनी’ चाहीए. आपका उत्तर पटानी चाहीए. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असे म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

हेही वाचा - ...आणि रोहित पवारांनी मंचावरूनच लावला नरेंद्र मोदींना फोन

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “बाळासाहेब थोरात साहेबांचे आभार मानतो की तुम्ही हा संवादाचा कार्यक्रम आयोजित केला. मी आदित्य संवाद कार्यक्रम सुरु केला. लोकांमधले प्रश्न विचारण्याचे धाडस वाढते ते महत्वाचे आहे. कुठलाही प्रोटोकॉल मिळाला किंवा काढला तरी राहणे, वागणे बदलू नका, असे आजोबा आणि वडिलांनी मला सांगितलं आहे. राजकारण्यांची खासियत दहा वर्षांपूर्वी बोललेले आठवत नाही, पण आम्ही महाविकास आघाडीत लक्षात ठेवतो, असे ते म्हणाले.

हेही वाचा - 'लंके प्रतिष्ठान'च्यावतीने पारनेरमध्ये कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन

दरम्यान, कार्यक्रमात ठाकरे म्हणाले की, आजोबा हे वेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी विचारांची पेरणी केली. काल कुणीतरी महाराष्ट्राचे चार तुकडे होऊ शकतात, असे म्हटले. महाराष्ट्राचे भविष्य घडवायचो आहे म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Intro:




आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे देते. रश्मी वहिनींनी किती वर्ष तुमची जबाबदारी घ्यायची असा प्रश्न आदित्य ठाकरेंना अवधूत गुप्तेंनी विचारला असता उपस्थितांनी एकच जल्लोष केला. या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईने मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे. त्यावर अवधूत गुप्तेंनी पुन्हा विचारलं, आम्हाला मध्ये मध्ये बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात ‘पटनी’ चाहीए. आपका उत्तर पटानी चाहीए. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असं म्हणताच एकच जल्लोष झालं...संगमनेरच्या अमृतवहिनी महाविद्यालयात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतली. यावेळी अवधूत गुप्ते यांनी सर्व युवा आमदारांना राजकीय प्रश्न तर विचारलेच पण वैयक्तिक प्रश्नही विचारून धमाल उडवून दिली.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “बाळासाहेब थोरात साहेबांचे आभार मानतो की तुम्ही हा संवादाचा कार्यक्रम आयोजित केला. मी आदित्य संवाद कार्यक्रम सुरु केला, लोकांमधले प्रश्न विचारण्याचं धाडस वाढतं ते महत्वाचं आहे. कुठलाही प्रोटोकॉल मिळाला किंवा काढला तरी राहणं वागणं बदलू नका, असं आजोबा आणि वडिलांनी मला सांगितलं आहे. राजकारण्यांची खासियत दहा वर्षांपूर्वी बोललेलं आठवत नाही पण आम्ही महाविकास आघाडीत लक्षात ठेवतो असे म्हणाले. पुढे अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना शपथविधीवेळी आईचं नाव घेण्यामागचं कारण विचारलं. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी शपथविधीवेळी आईचं नाव घेतलं ते नैसर्गिक आणि सहजपणे. आई-वडील दोघांनी आपल्याला मोठं केलेलं असतं. आई आपल्याला आजही ओरडा करते, ते प्रेमाने असतं. आई आपली काळजी घेते, म्हणून मी आईचं नाव घेतलं. आई सांगायची राजकारणात जाऊ नको, बाबा आहेत, आजोबा आहेत, पेपरात चांगलं येतं, वाईट येतं, हाऊसमध्ये जाण्याची हौस माझीच होती. आजोबा हे वेगळं व्यक्तिमत्त्व होतं, विचारांची पेरणी केली नव्या महाराष्ट्रात यशस्वी झालं. मागे कुणीतरी महाराष्ट्राचे चार तुकडे होऊ शकतात असं म्हटलं. आधी सामाजिक फाळणी, पण शिवसेनेत जात धर्म आणि विभाग कधीही पहिला जात नव्हता. महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं आहे म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले...Body:mh_ahm_shirdi_aditya takarey_17_mh10010
Conclusion:mh_ahm_shirdi_aditya takarey_17_mh10010
Last Updated : Jan 17, 2020, 7:39 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.