नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशमध्ये तीन एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी पोहोचला ( Indian Cricket Team has Reached Bangladesh to Play ) आहे. टीम इंडिया बांगलादेशमध्ये ( Three ODIs Between Bangladesh and India ) एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. बांगलादेश आणि भारत ( India will play 2 Tests against Bangladesh ) यांच्यातील पहिले ( Team India will Play ODI and Test Series in Bangladesh ) दोन एकदिवसीय सामने 4 आणि 7 डिसेंबर रोजी मीरपूर, ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (SBNCS) येथे होणार आहेत.
भारत बांगलादेशबरोबर तीन एकदिवसीय सामने तर 2 टेस्ट मॅच खेळणार : बांगलादेशबरोबर भारत एकूण तीन वन-डे तर दोन टेस्ट मालिका खेळणार आहे. पहिले दोन वनडे मॅच 4 आणि 7 डिसेंबर रोजी मीरपूर ढाका येथील शेर-ए-बांगला येथील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. तिसरा एकदिवसीय सामना, जो आधी ढाका येथे होणार होता. तो आता 10 डिसेंबर रोजी चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ 14 ते 18 डिसेंबरदरम्यान चितगाव येथे पहिला कसोटी सामना आणि 22 ते 26 डिसेंबरदरम्यान मीरपूर येथे दुसरा कसोटी सामना खेळणार आहे.
भारताने बांगलादेशमध्ये चारपैकी तीन मालिका जिंकल्या : द्विपक्षीय वनडे मालिका खेळण्यासाठी 2004 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदा बांगलादेशला गेला होता. त्यानंतर भारताने तीन एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. 2007 साली भारताने दुसऱ्यांदा बांगलादेशमध्ये द्विपक्षीय वनडे मालिका खेळली. तेव्हा राहुल द्रविड कर्णधार होता. भारताने मालिका २-० ने जिंकली. 2014 मध्ये, भारताने बांगलादेशमध्ये तिसरी मालिका खेळली. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील तीन एकदिवसीय मालिकेत पावसाने व्यत्यय आणला.
भारताने आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या मालिका : भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे दोन सामने जिंकले आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला. त्याच वेळी वर्ष 2015 मध्ये, भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळली. भारताने ती मालिका 1-2 ने गमावली. भारतीय संघ 14 ते 18 डिसेंबरदरम्यान चितगाव येथे पहिला कसोटी सामना आणि 22 ते 26 डिसेंबरदरम्यान मीरपूर येथे दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. 2015 मध्ये, भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळली. भारताने ती मालिका 1-2 ने गमावली.
भारत विरुद्ध बांगलादेशदरम्यान झालेले सामने : दोन्ही संघांमध्ये एकूण 36 सामने झाले असून, त्यात भारताने 30 तर बांगलादेशने पाच सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि कुलदीप सेन.