ETV Bharat / sports

Virender Sehwag Statement : पंत 100हून अधिक कसोटी खेळला, तर त्याचे नाव इतिहासात नोंदवले जाईल - वीरेंद्र सेहवाग

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ( Former opener Virender Sehwag ) दावा केला आहे की, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने 100 कसोटी सामने खेळले, तर त्याचे नाव इतिहासाच्या पुस्तकात कायमचे लिहिले जाईल.

author img

By

Published : May 27, 2022, 6:01 PM IST

Sehwag & Rishabh
Sehwag & Rishabh

मुंबई: यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ( Wicketkeeper-batsman Rishabh Pant ) टी-20 क्रिकेटमधील आपल्या कारनामांमुळे प्रसिद्धी झोतात आला. पण अलीकडेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत 30 सामन्यांमध्ये 40.85 च्या सरासरीने 1920 धावा केल्या, ज्यात चार शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. ऋषभ पंत बाबत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ( Virender Sehwag ) मोठा दावा केला आहे.

मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या घरच्या मालिकेत, 24 वर्षीय पंतने 120.12 च्या स्ट्राइक रेटने 185 धावा केल्या, ज्यामध्ये बंगळुरू येथील गुलाबी-बॉल कसोटीत 28 चेंडूतील अर्धशतकांचा समावेश होता. जो भारतीय फलंदाजाकडून लगावलेले सर्वात वेगवान अर्धशतक होते. सेहवाग म्हणाला, जर तो 100 हून अधिक कसोटी खेळला तर त्याचे नाव इतिहासाच्या पुस्तकात कायमचे नोंदवले ( Recorded forever in history books ) जाईल. केवळ 11 भारतीय क्रिकेटपटूंनी ही कामगिरी केली आहे आणि प्रत्येकाला ती 11 नावे आठवत असतील.

स्पोर्ट्स 18 वर हिरोज शो ( Heroes show on Sports18 ) शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होईल. सेहवाग स्वतः कसोटी क्रिकेटमधील सर्वात स्फोटक खेळाडूंपैकी एक होता. त्याने 49.34 च्या सरासरीने 82.23 च्या आश्चर्यकारक स्ट्राइक रेटने 8586 धावा केल्या. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.05 च्या सरासरीने आणि 104.33 च्या स्ट्राइक रेटने 8273 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅट अधिक लोकप्रिय आणि किफायतशीर होत असूनही, भविष्यात कसोटी क्रिकेट हे खेळाचे अधिक चांगले स्वरूप राहील असे सेहवागला अजूनही वाटत होते, हे आश्चर्यकारक नव्हते.

तो म्हणाला, माझ्या मते कसोटी क्रिकेट हेच कोणत्याही क्रिकेटपट्टूसाठी सर्वश्रेष्ठ क्रिकेट आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेट खेळण्यावर का जोर देत आहे, कारण त्याला माहित आहे जर त्याने 100-150 किंवा 200 कसोटी खेळले, तर तो रेकॉर्ड बुकमध्ये अमर होईल.

सेहवागला पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याच्या कल्पनेसाठी देखील लक्षात ठेवले जाते, जे त्याने 2011 च्या विश्वचषक विजयी मोहिमेदरम्यान पाच वेळा केले होते. याविषयी विचारले असता सेहवाग म्हणाला, सचिन तेंडुलकरसह अनेकांनी मला सांगितले की, मी पहिला चेंडू मारण्याची योजना आखली होती. पण मी असे कधीच केले नाही. मी पहिला चेंडू हा सराव किंवा खराब चेंडू असा विचार करून मारायचो.

हेही वाचा - Question On Kl Rahul Batting : केएल राहुलच्या फलंदाजीवर क्रिकेटच्या दिग्गजांनी उपस्थित केले प्रश्न

मुंबई: यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ( Wicketkeeper-batsman Rishabh Pant ) टी-20 क्रिकेटमधील आपल्या कारनामांमुळे प्रसिद्धी झोतात आला. पण अलीकडेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत 30 सामन्यांमध्ये 40.85 च्या सरासरीने 1920 धावा केल्या, ज्यात चार शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. ऋषभ पंत बाबत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ( Virender Sehwag ) मोठा दावा केला आहे.

मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या घरच्या मालिकेत, 24 वर्षीय पंतने 120.12 च्या स्ट्राइक रेटने 185 धावा केल्या, ज्यामध्ये बंगळुरू येथील गुलाबी-बॉल कसोटीत 28 चेंडूतील अर्धशतकांचा समावेश होता. जो भारतीय फलंदाजाकडून लगावलेले सर्वात वेगवान अर्धशतक होते. सेहवाग म्हणाला, जर तो 100 हून अधिक कसोटी खेळला तर त्याचे नाव इतिहासाच्या पुस्तकात कायमचे नोंदवले ( Recorded forever in history books ) जाईल. केवळ 11 भारतीय क्रिकेटपटूंनी ही कामगिरी केली आहे आणि प्रत्येकाला ती 11 नावे आठवत असतील.

स्पोर्ट्स 18 वर हिरोज शो ( Heroes show on Sports18 ) शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होईल. सेहवाग स्वतः कसोटी क्रिकेटमधील सर्वात स्फोटक खेळाडूंपैकी एक होता. त्याने 49.34 च्या सरासरीने 82.23 च्या आश्चर्यकारक स्ट्राइक रेटने 8586 धावा केल्या. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.05 च्या सरासरीने आणि 104.33 च्या स्ट्राइक रेटने 8273 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅट अधिक लोकप्रिय आणि किफायतशीर होत असूनही, भविष्यात कसोटी क्रिकेट हे खेळाचे अधिक चांगले स्वरूप राहील असे सेहवागला अजूनही वाटत होते, हे आश्चर्यकारक नव्हते.

तो म्हणाला, माझ्या मते कसोटी क्रिकेट हेच कोणत्याही क्रिकेटपट्टूसाठी सर्वश्रेष्ठ क्रिकेट आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेट खेळण्यावर का जोर देत आहे, कारण त्याला माहित आहे जर त्याने 100-150 किंवा 200 कसोटी खेळले, तर तो रेकॉर्ड बुकमध्ये अमर होईल.

सेहवागला पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याच्या कल्पनेसाठी देखील लक्षात ठेवले जाते, जे त्याने 2011 च्या विश्वचषक विजयी मोहिमेदरम्यान पाच वेळा केले होते. याविषयी विचारले असता सेहवाग म्हणाला, सचिन तेंडुलकरसह अनेकांनी मला सांगितले की, मी पहिला चेंडू मारण्याची योजना आखली होती. पण मी असे कधीच केले नाही. मी पहिला चेंडू हा सराव किंवा खराब चेंडू असा विचार करून मारायचो.

हेही वाचा - Question On Kl Rahul Batting : केएल राहुलच्या फलंदाजीवर क्रिकेटच्या दिग्गजांनी उपस्थित केले प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.