ETV Bharat / sports

India vs SA, Boxing Day 5 : टीम इंडियाचा द. आफ्रिकेवर 113 धावांनी रोमहर्षक विजय

author img

By

Published : Dec 30, 2021, 4:30 PM IST

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला आहे. आफ्रिकेसमोर 305 धावा दुसऱ्या डावात करण्याचे आव्हान होते. मात्र भारतीय गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिका संघाने शरणागती पत्करली आणि एक मोठा विजय टीम इंडियाला मिळाला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला आता 1-0 अशी आघाडी मिळाली आहे.

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका
भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका

सेंच्युरियन : भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला आहे. आफ्रिकेसमोर 305 धावा दुसऱ्या डावात करण्याचे आव्हान होते. मात्र हे कठीण आव्हानाला सामोरे जाताना आफ्रिकेच्या फलंदाजांना यश आले नाही. अखेर टीम इंडियाने आफ्रिकेवर 113 धावांनी विजय संपादन केला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवशी भारताने दक्षिण अफ्रिकेचे 6 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने ३, मोहम्मद शमीने ३, मोहम्मद सिराजने २ आणि आर. अश्विनने २ गडी बाद केले.

पाचव्या दिवशी संघाची सुरुवात सलामीवीर डेन एल्गरने केली. काल त्याने 52 धावा करुन संघाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. खेळपट्टीवर त्याचा चांगला सूर लागलेला असतानाच जसप्रित बुमराहने त्याला पायचीत केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेन एल्गरने 12 चौकारांच्या सहाय्याने सर्वाधिक 77 धावा काढल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन डिकॉक जास्त काळ टिकू शकला नाही. क्विंटन डिकॉक २१ धावा करून माघारी परतला. मोहम्मद सिराजने त्याला क्लिनबोल्ड केले. त्यापाठोपाठ वियान मल्डर क्विंटन बाद झाला. मल्डरने ३ चेंडूत फक्त एक धाव केली.

भारताचा दुसरा डाव आणि दक्षिण आफ्रिकेची दमछाक

सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ 174 धावावर गारद झाला. परंतु पहिल्या डावात मिळालेल्या 130 धावांच्या आघाडीमुळे विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 305 धावांचे आव्हान उभे राहिले. ही धावसंख्या त्यांच्यासाठी खूपच अवघड असल्याचे मानले जात होते आणि घडलेली तसेच. भारतीय संघाची पहिल्या कसोटीवर मजबूत पकड बनली होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 4 गडी बाद 94 धावा केल्या होत्या.

भारताचा दुसरा डाव

चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने 10 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा केल्या. केएल राहुल 23, मयंक अग्रवाल 4, शार्दुल ठाकूर 10, चेतेश्वर पुजारा 16, विराट कोहली 18, अजिंक्य रहाणे 20, ऋषभ पंत 34, रविचंद्रन अश्विन 14, मोहम्मद शामी 1 व मोहम्मद सिराज 0 धावावर बाद झाले तर जसप्रित बुमराह 7 धावावर नाबाद राहिला.कागिसो रबाडाने व मार्को जेन्सने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या तर लंगी एनगिडीला 2 विकेट मिळाल्या.तिसऱ्या दिवसानंतर सामन्याला वळण

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव

सामन्याचा तिसरा दिवस हा भारतीय गोलंदाजांनी गाजवला आहे. दिवसाच्या सुरुवातील भारतीय संघाचा डाव ३ बाद २७२ वरून सुरू झाला आणि अवघ्या काही तासातच ३२७ धावांवर संपला. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला आणि दक्षिण आफ्रिकेला धोबी पछाड दिला. मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ गारद केला. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांवर आटोपला.भारताचा पहिला डावभारतीय संघाला पहिल्या डावात १३० धावांची भक्कम आघाडी मिळाली होती. भारताने दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ३२ अशी अवस्था केली होती, मात्र तेम्बा बवुमाने ५२ धावांची दमदार खेळी करीत संघाला सावरले. बवुमाला मोहम्मद शमीने बाद केले आणि त्यांची ७ बाद १४४ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर कागिसो रबाडाने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत चांगली झुंज दिली आणि संघाला १९७ धावांचा पल्ला गाठून दिला.

भारताचा पहिला डाव

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. याआधी भारतीय संघाने ३२७ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये केएल राहुलने भारतासाठी या डावात शतक झळकावले. राहुलने 260 चेंडूत 123 धावा केल्या. त्यानंतर मयंक अग्रवालने 60 धावा केल्या, तर कोहलीने 35 धावा जोडल्या. रहाणेने 48 धावा केल्या मात्र त्याचे अर्धशतक 2 धावांनी हुकले. शेवटी, बुमराहने 2 चौकार मारले, यात त्याने 14 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडीने 6 आणि रबाडाने 3 बळी घेतले. या दोघांशिवाय अन्य कोणताही गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी होऊ शकला नाही.

हेही वाचा - Sport Year Ender 2021 : विराट कोहलीची भारतीय क्रिकेटवरील पकड सैल

सेंच्युरियन : भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला आहे. आफ्रिकेसमोर 305 धावा दुसऱ्या डावात करण्याचे आव्हान होते. मात्र हे कठीण आव्हानाला सामोरे जाताना आफ्रिकेच्या फलंदाजांना यश आले नाही. अखेर टीम इंडियाने आफ्रिकेवर 113 धावांनी विजय संपादन केला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवशी भारताने दक्षिण अफ्रिकेचे 6 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने ३, मोहम्मद शमीने ३, मोहम्मद सिराजने २ आणि आर. अश्विनने २ गडी बाद केले.

पाचव्या दिवशी संघाची सुरुवात सलामीवीर डेन एल्गरने केली. काल त्याने 52 धावा करुन संघाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. खेळपट्टीवर त्याचा चांगला सूर लागलेला असतानाच जसप्रित बुमराहने त्याला पायचीत केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेन एल्गरने 12 चौकारांच्या सहाय्याने सर्वाधिक 77 धावा काढल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन डिकॉक जास्त काळ टिकू शकला नाही. क्विंटन डिकॉक २१ धावा करून माघारी परतला. मोहम्मद सिराजने त्याला क्लिनबोल्ड केले. त्यापाठोपाठ वियान मल्डर क्विंटन बाद झाला. मल्डरने ३ चेंडूत फक्त एक धाव केली.

भारताचा दुसरा डाव आणि दक्षिण आफ्रिकेची दमछाक

सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ 174 धावावर गारद झाला. परंतु पहिल्या डावात मिळालेल्या 130 धावांच्या आघाडीमुळे विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 305 धावांचे आव्हान उभे राहिले. ही धावसंख्या त्यांच्यासाठी खूपच अवघड असल्याचे मानले जात होते आणि घडलेली तसेच. भारतीय संघाची पहिल्या कसोटीवर मजबूत पकड बनली होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 4 गडी बाद 94 धावा केल्या होत्या.

भारताचा दुसरा डाव

चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने 10 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा केल्या. केएल राहुल 23, मयंक अग्रवाल 4, शार्दुल ठाकूर 10, चेतेश्वर पुजारा 16, विराट कोहली 18, अजिंक्य रहाणे 20, ऋषभ पंत 34, रविचंद्रन अश्विन 14, मोहम्मद शामी 1 व मोहम्मद सिराज 0 धावावर बाद झाले तर जसप्रित बुमराह 7 धावावर नाबाद राहिला.कागिसो रबाडाने व मार्को जेन्सने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या तर लंगी एनगिडीला 2 विकेट मिळाल्या.तिसऱ्या दिवसानंतर सामन्याला वळण

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव

सामन्याचा तिसरा दिवस हा भारतीय गोलंदाजांनी गाजवला आहे. दिवसाच्या सुरुवातील भारतीय संघाचा डाव ३ बाद २७२ वरून सुरू झाला आणि अवघ्या काही तासातच ३२७ धावांवर संपला. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला आणि दक्षिण आफ्रिकेला धोबी पछाड दिला. मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ गारद केला. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांवर आटोपला.भारताचा पहिला डावभारतीय संघाला पहिल्या डावात १३० धावांची भक्कम आघाडी मिळाली होती. भारताने दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ३२ अशी अवस्था केली होती, मात्र तेम्बा बवुमाने ५२ धावांची दमदार खेळी करीत संघाला सावरले. बवुमाला मोहम्मद शमीने बाद केले आणि त्यांची ७ बाद १४४ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर कागिसो रबाडाने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत चांगली झुंज दिली आणि संघाला १९७ धावांचा पल्ला गाठून दिला.

भारताचा पहिला डाव

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. याआधी भारतीय संघाने ३२७ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये केएल राहुलने भारतासाठी या डावात शतक झळकावले. राहुलने 260 चेंडूत 123 धावा केल्या. त्यानंतर मयंक अग्रवालने 60 धावा केल्या, तर कोहलीने 35 धावा जोडल्या. रहाणेने 48 धावा केल्या मात्र त्याचे अर्धशतक 2 धावांनी हुकले. शेवटी, बुमराहने 2 चौकार मारले, यात त्याने 14 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडीने 6 आणि रबाडाने 3 बळी घेतले. या दोघांशिवाय अन्य कोणताही गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी होऊ शकला नाही.

हेही वाचा - Sport Year Ender 2021 : विराट कोहलीची भारतीय क्रिकेटवरील पकड सैल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.