ETV Bharat / sports

T20 WC 2021: ICCची मोठी घोषणा, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ इतकेच खेळाडू घेऊ जाऊ शकतील

आयसीसीने आगामी टी-20 विश्व करंडक स्पर्धेसाठी प्रत्येक देशाला 15 खेळाडू आणि आठ अधिकाऱ्यांना सोबत आणण्याची परवानगी दिली आहे.

author img

By

Published : Aug 14, 2021, 4:13 PM IST

icc-announces-all-teams-to-bring-only-15-cricketers-and-8-officials-for-2021-t20-world-cup
T20 WC 2021: ICCची मोठी घोषणा, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी सर्व संघ इतकेच खेळाडू घेऊ जाऊ शकतील

मुंबई - आयसीसीने आगामी टी-20 विश्व करंडक स्पर्धेसाठी प्रत्येक देशाला 15 खेळाडू आणि आठ अधिकाऱ्यांना सोबत आणण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, ही स्पर्धा भारतात होणार होती. परंतु भारतातील कोरोनाची स्थिती पाहता या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितलं की, आयसीसीने टी-20 स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशांना प्रत्येकी 15 खेळाडू आणि प्रशिक्षक इतर स्टाफ मिळून 8 जण यांना परवानगी दिली आहे. त्यांनी याची यादी 10 सप्टेंबरपर्यंत पाठवण्यास सांगितलं आहे. पीटीआयशी बोलताना त्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आयसीसीने कोरोना आणि बायो बबलची परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला आहे. आयसीसी फक्त 15 खेळाडू आणि 8 अधिकाऱ्यांचा खर्च उचलणार आहे.

अधिकाऱ्याने सांगितलं की, बोर्डाचा निर्णय आहे की कोरोना स्थिती पाहता त्यांनी मुख्य संघासोबत किती खेळाडू पाठवले पाहिजे. जर मुख्य संघातील कोणता खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला किंवा दुखापतग्रस्त झाला तर त्याची जागा राखीव खेळाडू घेऊ शकतो.

आयसीसीने सर्व देशांच्या बोर्डाने कळवलं आहे की, क्वारंटाइन कालावधी सुरू होण्याच्या 5 दिवस आधी ते संघात बदल करू शकतात. तरीदेखील आयसीसीने 10 सप्टेंबरपर्यंत खेळाडूंची यादी पाठवण्यास सांगितलं आहे.

दरम्यान 2016 नंतर पहिल्यांदाच टी-20 विश्व करंडक स्पर्धा होत आहे. याचे आयोजन 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान, ओमान आणि यूएईमध्ये येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी पात्रता फेरी 23 सप्टेंबर पासून होणार आहे. यात श्रीलंका, बांगलादेश, आर्यलंड यासारखे संघ आहेत. यातून चार संघ सुपर 12 फेरीसाठी पात्र ठरतील.

हेही वाचा - 15 ऑगस्ट विशेष : ऑलिम्पिकवीरांना कलेच्या माध्यमातून अनोखी मानवंदना

हेही वाचा - Ind vs Eng 2nd Test : भारत ३६४ धावांत गारद; दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ३ बाद ११९ धावा

मुंबई - आयसीसीने आगामी टी-20 विश्व करंडक स्पर्धेसाठी प्रत्येक देशाला 15 खेळाडू आणि आठ अधिकाऱ्यांना सोबत आणण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, ही स्पर्धा भारतात होणार होती. परंतु भारतातील कोरोनाची स्थिती पाहता या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितलं की, आयसीसीने टी-20 स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशांना प्रत्येकी 15 खेळाडू आणि प्रशिक्षक इतर स्टाफ मिळून 8 जण यांना परवानगी दिली आहे. त्यांनी याची यादी 10 सप्टेंबरपर्यंत पाठवण्यास सांगितलं आहे. पीटीआयशी बोलताना त्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आयसीसीने कोरोना आणि बायो बबलची परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला आहे. आयसीसी फक्त 15 खेळाडू आणि 8 अधिकाऱ्यांचा खर्च उचलणार आहे.

अधिकाऱ्याने सांगितलं की, बोर्डाचा निर्णय आहे की कोरोना स्थिती पाहता त्यांनी मुख्य संघासोबत किती खेळाडू पाठवले पाहिजे. जर मुख्य संघातील कोणता खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला किंवा दुखापतग्रस्त झाला तर त्याची जागा राखीव खेळाडू घेऊ शकतो.

आयसीसीने सर्व देशांच्या बोर्डाने कळवलं आहे की, क्वारंटाइन कालावधी सुरू होण्याच्या 5 दिवस आधी ते संघात बदल करू शकतात. तरीदेखील आयसीसीने 10 सप्टेंबरपर्यंत खेळाडूंची यादी पाठवण्यास सांगितलं आहे.

दरम्यान 2016 नंतर पहिल्यांदाच टी-20 विश्व करंडक स्पर्धा होत आहे. याचे आयोजन 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान, ओमान आणि यूएईमध्ये येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी पात्रता फेरी 23 सप्टेंबर पासून होणार आहे. यात श्रीलंका, बांगलादेश, आर्यलंड यासारखे संघ आहेत. यातून चार संघ सुपर 12 फेरीसाठी पात्र ठरतील.

हेही वाचा - 15 ऑगस्ट विशेष : ऑलिम्पिकवीरांना कलेच्या माध्यमातून अनोखी मानवंदना

हेही वाचा - Ind vs Eng 2nd Test : भारत ३६४ धावांत गारद; दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ३ बाद ११९ धावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.