ETV Bharat / sports

अक्रमचा पाकच्या माजी क्रिकेटपटूवर हल्लाबोल

सोहेलला उत्तर देताना अक्रम म्हणाला, "माझ्याविरूद्ध नकारात्मक गोष्टी ऐकल्यावर मी निराश होतो. मी 17 वर्षांपूर्वी निवृत्त झालो, परंतु लोक अद्याप त्यांच्या फायद्यासाठी माझे नाव वापरतात."

author img

By

Published : May 9, 2020, 8:26 AM IST

People use my name for their benefit said wasim akram
अक्रमचा पाकच्या माजी क्रिकेटपटूवर हल्लाबोल

लाहोर - पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने विरोधकांवर निशाणा साधत असे म्हटले आहे, की ते त्यांच्या फायद्यासाठीच मला लक्ष्य करतात. माजी सलामीवीर आमिर सोहेलच्या विधानानंतर अक्रमने हे विधान केले आहे. 1992 मध्ये अक्रममुळे पाकिस्तान विश्वचषक जिंकू शकला नव्हता, असे सोहेलने म्हटले होते.

सोहेलला उत्तर देताना अक्रम म्हणाला, "माझ्याविरूद्ध नकारात्मक गोष्टी ऐकल्यावर मी निराश होतो. मी 17 वर्षांपूर्वी निवृत्त झालो, परंतु लोक अद्याप त्यांच्या फायद्यासाठी माझे नाव वापरतात."

सोहेलने असेही म्हटले होते की जर अक्रम गंभीर असता तर पाकिस्तानने विश्वचषक जिंकला असता. सोहेल म्हणाला, "हे अगदी सोपे आहे. 1992 चा वर्ल्ड कप बाजूला ठेवा आणि 1996 च्या वर्ल्ड कपबद्दल बोला. रमीज राजा कर्णधार होता, त्यापूर्वी सलीम मलिक कर्णधार होते. ते खूप यशस्वी कर्णधार होते. आणि जर ते आणखी एका वर्षासाठी कर्णधार झाले असते तर वसीम संघाचा कर्णधार झाला नसता. "

सोहेल पुढे म्हणाला, ''वसीम गंभीर असता तर पाकिस्तानने 1996, 1999, 2003 चा विश्वचषक जिंकला असता. "

लाहोर - पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने विरोधकांवर निशाणा साधत असे म्हटले आहे, की ते त्यांच्या फायद्यासाठीच मला लक्ष्य करतात. माजी सलामीवीर आमिर सोहेलच्या विधानानंतर अक्रमने हे विधान केले आहे. 1992 मध्ये अक्रममुळे पाकिस्तान विश्वचषक जिंकू शकला नव्हता, असे सोहेलने म्हटले होते.

सोहेलला उत्तर देताना अक्रम म्हणाला, "माझ्याविरूद्ध नकारात्मक गोष्टी ऐकल्यावर मी निराश होतो. मी 17 वर्षांपूर्वी निवृत्त झालो, परंतु लोक अद्याप त्यांच्या फायद्यासाठी माझे नाव वापरतात."

सोहेलने असेही म्हटले होते की जर अक्रम गंभीर असता तर पाकिस्तानने विश्वचषक जिंकला असता. सोहेल म्हणाला, "हे अगदी सोपे आहे. 1992 चा वर्ल्ड कप बाजूला ठेवा आणि 1996 च्या वर्ल्ड कपबद्दल बोला. रमीज राजा कर्णधार होता, त्यापूर्वी सलीम मलिक कर्णधार होते. ते खूप यशस्वी कर्णधार होते. आणि जर ते आणखी एका वर्षासाठी कर्णधार झाले असते तर वसीम संघाचा कर्णधार झाला नसता. "

सोहेल पुढे म्हणाला, ''वसीम गंभीर असता तर पाकिस्तानने 1996, 1999, 2003 चा विश्वचषक जिंकला असता. "

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.