ETV Bharat / sports

भारताच्या क्रिकेट संघात एकजुटतेचा अभाव - मोहम्मद कैफ

author img

By

Published : May 22, 2020, 8:03 AM IST

कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. कैफ म्हणाला, ''सतत खेळाडूंची होणारी अदलाबदली आणि सतत नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झालेला नाही. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय संघात आता एक सुटसुटितपणा आणि समन्वय येणे गरजेचे असून कोणते खेळाडू खेळणार हे निश्चित करणे गरजेचे आहे.''

Mohammad kaif commented on lack of unity in indian cricket team
भारताच्या क्रिकेट संघात एकजुटतेचा अभाव - मोहम्मद कैफ

नवी दिल्ली - मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने एका अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडले आहेत. कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. कैफ म्हणाला, ''सतत खेळाडूंची होणारी अदलाबदली आणि सतत नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झालेला नाही. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. 2013 नंतर भारताने आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नाही. यातून हे स्पष्ट दिसून येतेय की भारतीय संघामध्ये एकजुटपणाची कमतरता जाणवत आहे.''

''आमच्यावेळी सौरव गांगुलीने सर्व खेळाडूंना एकत्र ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. आजही आपण पाहिले तर बीसीसीआयसारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर दादाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पुढील काळात दादा भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणेल असा विश्वास मला आहे. आमच्या काळात अनेक खेळाडू आजच्यासारखे फिट नसले तरी ते उत्तम क्रिकेटपटू होते आणि त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते'', असेही कैफने सांगितले.

आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेविषयी बोलताना कैफ म्हणाला, ''भारतीय संघात आता एक सुटसुटितपणा आणि समन्वय येणे गरजेचे असून कोणते खेळाडू खेळणार हे निश्चित करणे गरजेचे आहे. भारतीय संघासमोर शॉर्ट फॉरमॅटमध्ये खेळताना अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे विराटचे नेतृत्व आणि त्याचे निर्णय खुप महत्त्वाचे आहेत. माझ्या मते भारताचा महत्त्वाचा खेळाडू महेंद्रसिंह धोनी संघात असणे गरजेचे आहे. धोनी शिवाय भारतीय संघ अपूर्ण आहे. जेव्हा धोनी स्वत: हून मी थकलो आता निवृत्त होतो, असे सांगेल तेव्हा त्याच्यातील क्रिकेट संपले असल्याचे मी समजेन.''

नवी दिल्ली - मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने एका अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडले आहेत. कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. कैफ म्हणाला, ''सतत खेळाडूंची होणारी अदलाबदली आणि सतत नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झालेला नाही. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. 2013 नंतर भारताने आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नाही. यातून हे स्पष्ट दिसून येतेय की भारतीय संघामध्ये एकजुटपणाची कमतरता जाणवत आहे.''

''आमच्यावेळी सौरव गांगुलीने सर्व खेळाडूंना एकत्र ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. आजही आपण पाहिले तर बीसीसीआयसारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर दादाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पुढील काळात दादा भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणेल असा विश्वास मला आहे. आमच्या काळात अनेक खेळाडू आजच्यासारखे फिट नसले तरी ते उत्तम क्रिकेटपटू होते आणि त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते'', असेही कैफने सांगितले.

आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेविषयी बोलताना कैफ म्हणाला, ''भारतीय संघात आता एक सुटसुटितपणा आणि समन्वय येणे गरजेचे असून कोणते खेळाडू खेळणार हे निश्चित करणे गरजेचे आहे. भारतीय संघासमोर शॉर्ट फॉरमॅटमध्ये खेळताना अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे विराटचे नेतृत्व आणि त्याचे निर्णय खुप महत्त्वाचे आहेत. माझ्या मते भारताचा महत्त्वाचा खेळाडू महेंद्रसिंह धोनी संघात असणे गरजेचे आहे. धोनी शिवाय भारतीय संघ अपूर्ण आहे. जेव्हा धोनी स्वत: हून मी थकलो आता निवृत्त होतो, असे सांगेल तेव्हा त्याच्यातील क्रिकेट संपले असल्याचे मी समजेन.''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.