ETV Bharat / sports

IPL २०२० Points Table : गुणतालिकेत बंगळुरूचा मुंबईला 'दे धक्का', पाहा काय झाला बदल

author img

By

Published : Oct 22, 2020, 3:58 PM IST

बंगळुरूच्या विजयाने मुंबईला गुणतालिकेत धक्का बसला आहे. पाहा, आरसीबीच्या विजयानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले...

IPL 2020 Points Table: RCB climb to second spot after clinching swift victory over Kolkata Knight Riders
IPL २०२० Points Table : गुणतालिकेत बंगळुरूचा मुंबईला 'दे धक्का', पाहा काय झाला बदल

अबुधाबी - विराट कोहली नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सचा दारूण पराभव करत गुणतालिकेत मोठे फेरबदल केले. बंगळुरूच्या विजयाने मुंबईला गुणतालिकेत धक्का बसला आहे. पाहा, आरसीबीच्या विजयानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले...

कोलकाता विरूद्धच्या सामन्यापूर्वी बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. त्यांनी नऊ सामने खळले होते. या नऊ सामन्यांमध्ये बंगळुरूने सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, तर त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभवही पत्करावा लागला होता. कोलकाता विरुद्धचा सामना सहज जिंकत बंगळुरूने गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला धक्का दिला. कारण या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ हा १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. पण आजच्या सामन्यात दोन गुण पटकावल्यामुळे बंगळुरूचे १४ गुण झाले आहेत. त्यामुळे १४ गुणांसह बंगळुरूने गुणतालिकेत मुंबईला धक्का देत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

कोलकाताचा संघ या सामन्यापूर्वी चौथ्या क्रमाकांवर होता. त्यांनी यापूर्वी नऊ सामने खेळले होते. या नऊ सामन्यांमध्ये कोलकाताने पाच सामन्यांमध्ये विजय मिळवले होते, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. बंगळुरूविरूद्धच्या पराभवानंतरही गुणतालिकेत त्यांच्या स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आताही कोलकाता चौथ्या स्थानावर कायम आहे आहे. कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये १० गुण पटकावत त्यांनी आपले स्थान कायम राखले आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर बंगळुरूचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर मुंबईच्या संघाची घसरण होऊन ते तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. कोलकाताने गुणतालिकेतील चौथे स्थान कायम राखले आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे पंजाब आणि राजस्थानचा संघ आहे. तर सातव्या स्थानी हैदराबाद आहे. तर धोनीचा चेन्नई संघ आठव्या स्थानावर आहे.

अबुधाबी - विराट कोहली नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सचा दारूण पराभव करत गुणतालिकेत मोठे फेरबदल केले. बंगळुरूच्या विजयाने मुंबईला गुणतालिकेत धक्का बसला आहे. पाहा, आरसीबीच्या विजयानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले...

कोलकाता विरूद्धच्या सामन्यापूर्वी बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. त्यांनी नऊ सामने खळले होते. या नऊ सामन्यांमध्ये बंगळुरूने सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, तर त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभवही पत्करावा लागला होता. कोलकाता विरुद्धचा सामना सहज जिंकत बंगळुरूने गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला धक्का दिला. कारण या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ हा १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. पण आजच्या सामन्यात दोन गुण पटकावल्यामुळे बंगळुरूचे १४ गुण झाले आहेत. त्यामुळे १४ गुणांसह बंगळुरूने गुणतालिकेत मुंबईला धक्का देत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

कोलकाताचा संघ या सामन्यापूर्वी चौथ्या क्रमाकांवर होता. त्यांनी यापूर्वी नऊ सामने खेळले होते. या नऊ सामन्यांमध्ये कोलकाताने पाच सामन्यांमध्ये विजय मिळवले होते, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. बंगळुरूविरूद्धच्या पराभवानंतरही गुणतालिकेत त्यांच्या स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आताही कोलकाता चौथ्या स्थानावर कायम आहे आहे. कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये १० गुण पटकावत त्यांनी आपले स्थान कायम राखले आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर बंगळुरूचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर मुंबईच्या संघाची घसरण होऊन ते तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. कोलकाताने गुणतालिकेतील चौथे स्थान कायम राखले आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे पंजाब आणि राजस्थानचा संघ आहे. तर सातव्या स्थानी हैदराबाद आहे. तर धोनीचा चेन्नई संघ आठव्या स्थानावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.