अहमदाबाद - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतीय संघाला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. आता आज होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजीत सुधारणेसह मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान भारतीय संघापुढे आहे.
आजच्या सामन्यात के. एल. राहुल आणि शिखर धवन यांच्याकडून चांगल्या सलामीची आपेक्षा भारतीय संघाची असेल. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीला देखील मोठी खेळी करावी लागेल. तर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांच्याकडून स्फोटक खेळीची आपेक्षा तर खुद्द विराटने बोलून दाखवली आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि हार्दिकवर वेगवान माऱ्याची तर अक्षर पटेल, चहल आणि वॉशिंग्टन सुंदरवर फिरकीची भिस्त असणार आहे.
दुसरीकडे इंग्लंडने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावर चांगली कामगिरी नोंदवली. जोफ्रा आर्चरने पहिल्या टी-२० सामन्यात तीन विकेट घेत भारतीय संघाचे कंबरडे मोडले होते. तर फलंदाजीत रॉयने फटकेबाजी केली होती. अशाच कामगिरीची आपेक्षा इंग्लंडचा संघ करत असेल.
भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, युझर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि टी. नटराजन.
इंग्लंडचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर.
हेही वाचा - रोहितला विश्रांती दिल्याने सेहवाग विराटवर भडकला, म्हणाला...
हेही वाचा - IPL मध्ये धावांचा पाऊस पाडणारा 'हा' फलंदाज म्हणतोय, मी इंग्लंडविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार