ETV Bharat / sports

IND VS WI T20 : भारताकडून वेस्ट इंडिजचा सुपडासाफ; मालिका जिंकली

वेस्ट इंडिज विरुध्दच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने टी-२० मालिका ३-० अशी निर्वादित जिंकली. विंडिजने दिलेले १४७ धावांचे आव्हान भारताने १९.१ षटकांत पूर्ण केले. कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी तर गोलंदाजीत दीपक चहारने ४ धावांमध्ये ३ गडी बाद केले.

author img

By

Published : Aug 6, 2019, 7:58 PM IST

Updated : Aug 7, 2019, 7:59 AM IST

IND vs WI ३rd T२० LIVE : विंडीजला पहिला धक्का..सुनील नरिन बाद

गयाना - वेस्ट इंडिज विरुध्दच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने, विंडिजवर ७ गडी राखून विजय मिळवला. विंडिजने दिलेले १४७ धावांचे आव्हान भारताने १९.१ षटकांतच ३ गड्याचा मोबदल्यात पूर्ण केले. फलंदाजीमध्ये कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत या दोघांनी अर्धशतके झळकावली तर गोलंदाजीत दीपक चहारने ४ धावा देत ३ गडी बाद केले.

गयानाच्या मैदानावर ओल असल्याने सामन्याला नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुरुवात झाली. भारताने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. विडिंजची आघाडीची फळी लवकर बाद झाली. तेव्हा, स्फोटक फलंदाज किरॉन पोलार्ड याने ४५ चेंडूत ५८ धावा करत संघाचा डाव सावरला. त्याच्या आणि रोव्हमन पॉवेल (२० चेंडूत ३२ धावा) याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने २० षटकांत ६ बाद १४६ धावा केल्या. भारताकडून दीपक चहारने ३, नवदीप सैनीने २ तर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पदार्पण करणारा राहुल चहार याने १ बळी मिळवला.

विडिंजचे १४७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही वेळातच लोकेश राहुल १८ धावा करुन परतला. त्यानंतर मात्र कर्णधार विराट कोहली (५९ धावा) आणि ऋषभ पंत या दोघांनी १०६ धावांची भागिदारी करत भारताला विजयाजवळ नेले. भारताचा विजय टप्प्यात आल्यानंतर थॉमसने कोहलीला बाद केले.

त्यानंतर ऋषभ पंतने डावाची सर्वसुत्रे आपल्या हातात घेतली. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत भारताला सोपा विजय मिळवून दिला. पंतने ४ चौकार ४ षटकाराच्या मदतीने ४२ चेंडूत ६५ धावा केल्या.

गयाना - वेस्ट इंडिज विरुध्दच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने, विंडिजवर ७ गडी राखून विजय मिळवला. विंडिजने दिलेले १४७ धावांचे आव्हान भारताने १९.१ षटकांतच ३ गड्याचा मोबदल्यात पूर्ण केले. फलंदाजीमध्ये कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत या दोघांनी अर्धशतके झळकावली तर गोलंदाजीत दीपक चहारने ४ धावा देत ३ गडी बाद केले.

गयानाच्या मैदानावर ओल असल्याने सामन्याला नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुरुवात झाली. भारताने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. विडिंजची आघाडीची फळी लवकर बाद झाली. तेव्हा, स्फोटक फलंदाज किरॉन पोलार्ड याने ४५ चेंडूत ५८ धावा करत संघाचा डाव सावरला. त्याच्या आणि रोव्हमन पॉवेल (२० चेंडूत ३२ धावा) याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने २० षटकांत ६ बाद १४६ धावा केल्या. भारताकडून दीपक चहारने ३, नवदीप सैनीने २ तर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पदार्पण करणारा राहुल चहार याने १ बळी मिळवला.

विडिंजचे १४७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही वेळातच लोकेश राहुल १८ धावा करुन परतला. त्यानंतर मात्र कर्णधार विराट कोहली (५९ धावा) आणि ऋषभ पंत या दोघांनी १०६ धावांची भागिदारी करत भारताला विजयाजवळ नेले. भारताचा विजय टप्प्यात आल्यानंतर थॉमसने कोहलीला बाद केले.

त्यानंतर ऋषभ पंतने डावाची सर्वसुत्रे आपल्या हातात घेतली. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत भारताला सोपा विजय मिळवून दिला. पंतने ४ चौकार ४ षटकाराच्या मदतीने ४२ चेंडूत ६५ धावा केल्या.

Intro:Body:

IND vs WI ३rd T२० LIVE : ओल्या खेळपट्टीमुळे नाणेफेकीचा कौल लांबला

गयाना -  पहिल्या दोन टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवणाऱ्या टीम इंडियाला आज परत एकदा विजयाची संधी असणार आहे. भारताचा विंडीजविरुद्ध आज अंतिम सामना रंगणार आहे. मात्र, ओल्या खेळपट्टीमुळे नाणेफेकीचा कौल लांबला आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने 22 धावांनी बाजी मारली. त्यामुळे भारताने तीन सामन्यांची मालिका आधीच २-० ने खिशात घातली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याची संधी टीम इंडियाला असणार आहे.

दोन्ही संघ :

भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, कृणाल पंडय़ा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज - जॉन कॅम्पबेल, एविन लुइस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कालरेस ब्रेथवेट (कर्णधार), कीमो पॉल, सुनील नरिन, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, अँथनी ब्रॅम्बल, जेसन मोहम्मद, खारी पाएरे.


Conclusion:
Last Updated : Aug 7, 2019, 7:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.