ETV Bharat / sports

IPL 2020 : मुंबईच्या पाचव्या विजेतेपदाबाबत सचिन म्हणाला, अफलातून विजय....

author img

By

Published : Nov 11, 2020, 1:51 PM IST

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२०चे विजेतेपद पटकावले. मुंबईच्या विजयानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबई संघाचे कौतुक करत अंतिम सामन्यावर मुंबईने पूर्णपणे वर्चस्व गाजवले ,असे म्हटलं आहे.

"Complete Domination": Sachin Tendulkar Congratulates Mumbai Indians For Winning Fifth IPL Title
IPL २०२० : मुंबईच्या पाचव्या विजेतेपदावर सचिन म्हणाला, अफलातून विजय....

मुंबई - मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अफलातून विजय मिळवला, अशा शब्दांत भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने मुंबई संघाचे कौतुक केले. मंगळवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या, आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली संघाचा ५ गडी राखून पराभव करत जेतेपद पटकावले. या विजयानंतर सचिनने ही प्रतिक्रिया दिली.

मुंबईच्या विजयावर सचिनने एक ट्विट केले आहे. मुंबईच्या खेळाडूंनी अफलातून विजय मिळवला. अंतिम सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. खेळाडूंसोबतच सपोर्ट स्टाफचेही कौतुक. मागील वर्षी ज्या पद्धतीची कामगिरी केली होती, त्याच प्रकारची कामगिरी यंदाही केल्याने संघाला विजय मिळवणे सोपे गेले, असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अंतिम सामन्याआधी सचिनने मुंबई संघासाठी खास संदेश दिला होता. यात त्याने, मुंबईसाठी तुम्ही जेव्हा मैदानावर खेळायला उतरता, तेव्हा तुम्ही केवळ एक व्यक्ती नसता, तर संपूर्ण उर्जेचा समूह असता. सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईचा संघ म्हणजे एक कुटुंब असल्याचे सांगत, संघाच्या चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये आपण सगळे एकमेकांच्या सोबत असतो. त्यामुळे सर्वस्व पणाला लावून खेळा, असा सल्ला दिला होता.

असा रंगला सामना -

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ९६ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित ६८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने मुंबईच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

हेही वाचा - IPL 2020 : मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानी यांचे खेळाडूंबरोबर सेलिब्रेशन

हेही वाचा - IPLचे विजेतेपद पटकावल्यानंतर ठाकरे सरकारकडून मुंबई संघाचे कौतुक

मुंबई - मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अफलातून विजय मिळवला, अशा शब्दांत भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने मुंबई संघाचे कौतुक केले. मंगळवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या, आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली संघाचा ५ गडी राखून पराभव करत जेतेपद पटकावले. या विजयानंतर सचिनने ही प्रतिक्रिया दिली.

मुंबईच्या विजयावर सचिनने एक ट्विट केले आहे. मुंबईच्या खेळाडूंनी अफलातून विजय मिळवला. अंतिम सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. खेळाडूंसोबतच सपोर्ट स्टाफचेही कौतुक. मागील वर्षी ज्या पद्धतीची कामगिरी केली होती, त्याच प्रकारची कामगिरी यंदाही केल्याने संघाला विजय मिळवणे सोपे गेले, असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अंतिम सामन्याआधी सचिनने मुंबई संघासाठी खास संदेश दिला होता. यात त्याने, मुंबईसाठी तुम्ही जेव्हा मैदानावर खेळायला उतरता, तेव्हा तुम्ही केवळ एक व्यक्ती नसता, तर संपूर्ण उर्जेचा समूह असता. सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईचा संघ म्हणजे एक कुटुंब असल्याचे सांगत, संघाच्या चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये आपण सगळे एकमेकांच्या सोबत असतो. त्यामुळे सर्वस्व पणाला लावून खेळा, असा सल्ला दिला होता.

असा रंगला सामना -

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ९६ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित ६८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने मुंबईच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

हेही वाचा - IPL 2020 : मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानी यांचे खेळाडूंबरोबर सेलिब्रेशन

हेही वाचा - IPLचे विजेतेपद पटकावल्यानंतर ठाकरे सरकारकडून मुंबई संघाचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.