ETV Bharat / sports

IPL अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली, BCCI सूत्रांची माहिती

author img

By

Published : Apr 14, 2020, 2:23 PM IST

Updated : Apr 14, 2020, 2:59 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लॉकाडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याचे जाहीर केले. यानंतर आयपीएलचे काय होणार अशी चर्चा रंगली. यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी, यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

As the lockdown has been extended till May 3 by the government, we will postpone the Indian Premier League for the time being: BCCI Sources
IPL अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली, BCCI सुत्रांची माहिती

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लॉकाडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याचे जाहीर केले. यानंतर आयपीएलचे काय होणार अशी चर्चा रंगली. यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी, यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होणार होती. पण देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यात देशातील लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपणार होता. यामुळे आयपीएल होईल, अशी चाहत्यांशी आशा होती. पण लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी मोदींनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगत त्याचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवला.

केंद्राच्या या निर्णयानंतर बीसीसीआय अधिक पर्यायांवर विचार करणार आहे. जर परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्यास ही स्पर्धा थेट पुढच्या वर्षी खेळवली जाऊ शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

  • As the lockdown has been extended till May 3 by the government, we will postpone the Indian Premier League for the time being: BCCI Sources pic.twitter.com/VzRpTlVa9M

    — ANI (@ANI) April 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जून-जुलै महिन्यात बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील होती. पण त्याआधी सप्टेंबर महिन्यात आयपीएल खेळवता येईल का याबाबतही विचार सुरु होता. मात्र या काळात आशिया करंडक आणि इतर संघांच्या मालिका आहेत. यामुळे विदेशातील खेळाडू या स्पर्धेसाठी येऊ शकणार नाहीत.

त्यात ऑस्ट्रेलिया सरकारने ६ महिने लॉकडाऊन घोषित केला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उपलब्धते बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अशा परिस्थितीत बीसीसीआयकडे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यापलीकडे कोणताही पर्याय नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआय यावर काय उपाय काढते हे पाहावे उत्सुकतेचे आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे पुनरागमनाच्या चूकीच्या आशा निर्माण करु शकत नाही – डिव्हिलियर्स

हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे आयपीएल २०२० चे काय होणार ?

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लॉकाडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याचे जाहीर केले. यानंतर आयपीएलचे काय होणार अशी चर्चा रंगली. यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी, यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होणार होती. पण देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यात देशातील लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपणार होता. यामुळे आयपीएल होईल, अशी चाहत्यांशी आशा होती. पण लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी मोदींनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगत त्याचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवला.

केंद्राच्या या निर्णयानंतर बीसीसीआय अधिक पर्यायांवर विचार करणार आहे. जर परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्यास ही स्पर्धा थेट पुढच्या वर्षी खेळवली जाऊ शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

  • As the lockdown has been extended till May 3 by the government, we will postpone the Indian Premier League for the time being: BCCI Sources pic.twitter.com/VzRpTlVa9M

    — ANI (@ANI) April 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जून-जुलै महिन्यात बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील होती. पण त्याआधी सप्टेंबर महिन्यात आयपीएल खेळवता येईल का याबाबतही विचार सुरु होता. मात्र या काळात आशिया करंडक आणि इतर संघांच्या मालिका आहेत. यामुळे विदेशातील खेळाडू या स्पर्धेसाठी येऊ शकणार नाहीत.

त्यात ऑस्ट्रेलिया सरकारने ६ महिने लॉकडाऊन घोषित केला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उपलब्धते बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अशा परिस्थितीत बीसीसीआयकडे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यापलीकडे कोणताही पर्याय नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआय यावर काय उपाय काढते हे पाहावे उत्सुकतेचे आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे पुनरागमनाच्या चूकीच्या आशा निर्माण करु शकत नाही – डिव्हिलियर्स

हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे आयपीएल २०२० चे काय होणार ?

Last Updated : Apr 14, 2020, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.