ETV Bharat / sports

दिलगिरीनंतर श्रीकांतची 'खेलरत्न'साठी शिफारस; टीका करणाऱ्या प्रणॉयला कारणे दाखवा नोटीस

author img

By

Published : Jun 20, 2020, 7:17 AM IST

Updated : Jun 20, 2020, 12:56 PM IST

श्रीकांत आणि प्रणॉय हे दोघे फेब्रुवारीत मनिला येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपचा उपांत्य फेरीचा सामना न खेळता बार्सिलोना येथे अन्य एका स्पर्धेसाठी रवाना झाले होते. यामुळे भारताला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. दोघांविरुद्ध शिस्तभंग म्हणून बीएआयने क्रीडा पुरस्कारासाठी नावे पाठवली नव्हती.

Kidambi Srikanth recommended for Khel Ratna after unconditional apology, HS Prannoy issued show-cause
दिलगिरीनंतरनंतर श्रीकांतची 'खेलरत्न'साठी शिफारस; टीका करणाऱ्या प्रणॉयला कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली - भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याची 'राजीव गांधी खेलरत्न' क्रीडा पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) शिफारस करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अर्जून पुरस्कारासाठी नामांकन न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या एच. एस. प्रणॉय याला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली.

श्रीकांत आणि प्रणॉय हे दोघे फेब्रुवारीत मनिला येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपचा उपांत्य फेरीचा सामना न खेळता बार्सिलोना येथे अन्य एका स्पर्धेसाठी रवाना झाले होते. यामुळे भारताला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. दोघांविरुद्ध शिस्तभंग म्हणून बीएआयने क्रीडा पुरस्कारासाठी नावे पाठवली नव्हती.

श्रीकांतने यानंतर क्रीडा मंत्रालयाकडे ई-मेलद्वारे माफी मागितली. यात त्याने भविष्यात अशा चुकीची पुनरावृत्ती न करण्याची हमी दिली आहे. दुसरीकडे प्रणॉयने अर्जून पुरस्कारासाठी नामांकन न दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर बीएआयने त्याला १५ दिवसाच्या आत उत्तर देण्याची नोटीस बजावली. उत्तर न दिल्यास आणखी कठोर कारवाईचा इशारा महासंघाने दिला आहे.

बीएआयचे सरचिटणीस अजय सिंघानिया म्हणाले की, 'श्रीकांतने त्याची चूक मान्य करत असल्याचे सांगितले आहे. मात्र प्रणॉय सातत्याने शिस्तभंग करत आहे. आतापर्यंत प्रणॉयच्या वागण्याकडे संघटनेकडून दुर्लक्ष करण्यात आले, मात्र या वेळेस त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.'

दरम्यान, बीएआयकडून प्रणॉयऐवजी समीर वर्मा याचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पुढे करण्यात आले आहे.

हेही वाचा - स्टार बॅडमिंटनपटू म्हणतो, “मी निराश झालोय”

हेही वाचा - 'अर्जुन' पुरस्कारासाठी डावलले; भडकलेला प्रणॉय म्हणाला...

नवी दिल्ली - भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याची 'राजीव गांधी खेलरत्न' क्रीडा पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) शिफारस करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अर्जून पुरस्कारासाठी नामांकन न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या एच. एस. प्रणॉय याला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली.

श्रीकांत आणि प्रणॉय हे दोघे फेब्रुवारीत मनिला येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपचा उपांत्य फेरीचा सामना न खेळता बार्सिलोना येथे अन्य एका स्पर्धेसाठी रवाना झाले होते. यामुळे भारताला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. दोघांविरुद्ध शिस्तभंग म्हणून बीएआयने क्रीडा पुरस्कारासाठी नावे पाठवली नव्हती.

श्रीकांतने यानंतर क्रीडा मंत्रालयाकडे ई-मेलद्वारे माफी मागितली. यात त्याने भविष्यात अशा चुकीची पुनरावृत्ती न करण्याची हमी दिली आहे. दुसरीकडे प्रणॉयने अर्जून पुरस्कारासाठी नामांकन न दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर बीएआयने त्याला १५ दिवसाच्या आत उत्तर देण्याची नोटीस बजावली. उत्तर न दिल्यास आणखी कठोर कारवाईचा इशारा महासंघाने दिला आहे.

बीएआयचे सरचिटणीस अजय सिंघानिया म्हणाले की, 'श्रीकांतने त्याची चूक मान्य करत असल्याचे सांगितले आहे. मात्र प्रणॉय सातत्याने शिस्तभंग करत आहे. आतापर्यंत प्रणॉयच्या वागण्याकडे संघटनेकडून दुर्लक्ष करण्यात आले, मात्र या वेळेस त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.'

दरम्यान, बीएआयकडून प्रणॉयऐवजी समीर वर्मा याचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पुढे करण्यात आले आहे.

हेही वाचा - स्टार बॅडमिंटनपटू म्हणतो, “मी निराश झालोय”

हेही वाचा - 'अर्जुन' पुरस्कारासाठी डावलले; भडकलेला प्रणॉय म्हणाला...

Last Updated : Jun 20, 2020, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.