मुंबई -अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती असलेली 'पाताल लोक' ही मालिका सध्या गाजत आहे. अनुष्काने स्टारपद मिळवल्यानंतर वयाच्या २५ व्या वर्षी निर्माती होण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्वयं निर्मित चित्रपटात अभिनय करण्यासाठी चित्रपट बनवण्यास सुरुवात केली नसल्याचेही तिने सांगितले.
अनुष्का म्हणाली, ''चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी, या स्थितीचा चांगला लाभ उठवण्यासाठी मी निर्मितीच्या क्षेत्रात उतरले आहे. मी स्वत: ला 'स्टार' बनवण्यासाठी चित्रपटांची निर्मिती सुरू केलेली नाही. मी बसून लेखकांशी बातचीत करेन, त्यांच्यासोबत काही गोष्टींवर चर्चा करेन जेणे करुन खास प्रकारचे चित्रपट का तयार होत नाहीत?''
अभिनेत्री अनुष्का शर्माने बर्याच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची किमया दाखविली आहे. ती अभिनयासोब चित्रपटांची निर्मितीही करीत असते. अनेक चित्रपटाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा वेब सिरीजच्या दुनियेत तिने पदार्पण केलंय. पाताल लोक ही वेब सिरीज सध्या गाजली आहे. याची निर्मिती जरी अनुष्काने केली असली तरी त्यात तिने अभिनय केलेला नाही.
अनुष्काच्या प्रॉडक्शन व्हेंचरची 'पाताल लोक' ही वेब सीरिज असून तिला खूप कौतुक वाटले आहे. अनुष्काने सांगितले की तिचे आई-वडील अजय आणि आशिमा यांनाही वेब सिरीज आवडली आहे.