ETV Bharat / sitara

सिनेसृष्टीचं ग्लॅमर पाहून याल, तर काहीही साध्य होणार नाही - रोहिणी हट्टंगडी

author img

By

Published : Nov 5, 2019, 11:11 PM IST

रोहिणी हट्टंगडी यंदा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणाऱ्या विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. सांगलीमध्ये हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

सिनेसृष्टीचं ग्लॅमर पाहून याल, तर काहीही साध्य होणार नाही - रोहिणी हट्टंगडी

सांगली - केवळ ग्लॅमरस म्हणून चित्रपट सृष्टीत आल्यास काहीच करता येणार नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केले आहे. तसेच आजच्या तरुण पिढीने संधी मिळाल्यावर हुरळून जाऊ नये. शिकत राहावे. तसेच महिला कलाकारांनी 'नाही' म्हणण्याची हिम्मत दाखवली पाहिजे, असा सल्लाही रोहिणी यांनी दिला आहे. सांगलीमध्ये विष्णुदास भावे गौरव पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.

रोहिणी हट्टंगडी यंदा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणाऱ्या विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. सांगलीमध्ये हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यंदाचा ५४ वा पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देण्यात आला. विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या शानदार सोहळ्यात ९९ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात आला.

रोहिणी हट्टंगडी

हेही वाचा -रोहिणी हट्टंगडींच्या उपस्थितीत नाट्य पंढरीत रंगभूमी दिन उत्साहात साजरा

शाल, भावे पदक, सन्मानचिन्ह व २५ हजार रोख देऊन यावेळी रोहिणी हट्टंगडी यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे पदाधिकारी आणि सांगलीकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोहिणी म्हणाल्या, 'विष्णुदास भावे पुरस्कार मिळणे, म्हणजे मी भाग्यवान समजते. भारावून जाणे काय असते हे हा पुरस्कार जाहीर झाल्याच्यानंतर कळले', अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा -'फत्तेशिकस्त' सिनेमाला शिवकालीन संगीताचा साज; पोवाडा, कव्वालीसह तुंबडीची प्रेक्षकांना पर्वणी

आजच्या तरुण पिढीला आणि विशेषतः महिला कलाकारांचे होणारे शोषण या बद्दल बोलताना, आज महिलांकडे 'नाही' म्हणण्याचा मोठा अधिकार आहे. त्यामुळे हिमतीने त्यां नाही म्हणायला शिकल्या तर, त्यांच्यावर अन्याय करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

आजच्या तरुणांनी स्वतःच्या गावात आधी काम करायला हवे. आजच्या तरुण पिढीने केवळ ग्लॅमरस म्हणून या क्षेत्रात आल्यास, त्यांना काही करता येणार नाही. आधी काम केले पाहिजे आणि शिकले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला मानधन मिळेल. एकाद्या संधीने हुरळून न जाता शिकुन पुढे जायला हवे, असा सल्लाही त्यांनी यावेळी तरुण पीढीला दिला.

हेही वाचा -IFFI 2019: महानायकासोबत रजनीकांत करणार 'ईफ्फी'ची सुरूवात

सांगली - केवळ ग्लॅमरस म्हणून चित्रपट सृष्टीत आल्यास काहीच करता येणार नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केले आहे. तसेच आजच्या तरुण पिढीने संधी मिळाल्यावर हुरळून जाऊ नये. शिकत राहावे. तसेच महिला कलाकारांनी 'नाही' म्हणण्याची हिम्मत दाखवली पाहिजे, असा सल्लाही रोहिणी यांनी दिला आहे. सांगलीमध्ये विष्णुदास भावे गौरव पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.

रोहिणी हट्टंगडी यंदा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणाऱ्या विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. सांगलीमध्ये हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यंदाचा ५४ वा पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देण्यात आला. विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या शानदार सोहळ्यात ९९ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात आला.

रोहिणी हट्टंगडी

हेही वाचा -रोहिणी हट्टंगडींच्या उपस्थितीत नाट्य पंढरीत रंगभूमी दिन उत्साहात साजरा

शाल, भावे पदक, सन्मानचिन्ह व २५ हजार रोख देऊन यावेळी रोहिणी हट्टंगडी यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे पदाधिकारी आणि सांगलीकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोहिणी म्हणाल्या, 'विष्णुदास भावे पुरस्कार मिळणे, म्हणजे मी भाग्यवान समजते. भारावून जाणे काय असते हे हा पुरस्कार जाहीर झाल्याच्यानंतर कळले', अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा -'फत्तेशिकस्त' सिनेमाला शिवकालीन संगीताचा साज; पोवाडा, कव्वालीसह तुंबडीची प्रेक्षकांना पर्वणी

आजच्या तरुण पिढीला आणि विशेषतः महिला कलाकारांचे होणारे शोषण या बद्दल बोलताना, आज महिलांकडे 'नाही' म्हणण्याचा मोठा अधिकार आहे. त्यामुळे हिमतीने त्यां नाही म्हणायला शिकल्या तर, त्यांच्यावर अन्याय करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

आजच्या तरुणांनी स्वतःच्या गावात आधी काम करायला हवे. आजच्या तरुण पिढीने केवळ ग्लॅमरस म्हणून या क्षेत्रात आल्यास, त्यांना काही करता येणार नाही. आधी काम केले पाहिजे आणि शिकले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला मानधन मिळेल. एकाद्या संधीने हुरळून न जाता शिकुन पुढे जायला हवे, असा सल्लाही त्यांनी यावेळी तरुण पीढीला दिला.

हेही वाचा -IFFI 2019: महानायकासोबत रजनीकांत करणार 'ईफ्फी'ची सुरूवात

Intro:mh_sng_06_rohini_hatgandi_on_bhave_puraskar_byt_02_7203751

स्लग - ग्लॅमरस म्हणून याल,तर चित्रपट सृष्टीत काहीच करता येणार नाही - रोहिणी हट्टंगडी..

अँकर - केवळ ग्लॅमरस म्हणून चित्रपट सृष्टीत आल्यास काहीच करता येणार नाही,असे मत जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी स्पष्ट केले आहे.तसेच आजच्या तरुण पिढीने संधी मिळाल्यावर हुरळून जाऊ नये,शिकत राहिले पाहिजे, त्याचबरोबर महिला कलाकारांना "नाही"म्हणायची हिम्मत दाखवली पाहिजे,असा सल्लाही रोहिणी हट्टंगडी यांनी दिला.त्या सांगली मध्ये विष्णुदास भावे गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलत होत्या .


Body:व्ही वो - मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार सोहळा आज सांगली मध्ये मोठ्या थाटात पार पडला आहे.यंदाचा 54 वा पुरस्कार हा जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देण्यात आला. विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या शानदार सोहळ्यात 99 व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद ग्जवी यांच्या हस्ते हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात आला.शाल,भावे पदक, सन्मानचिन्ह व 25 हजार रोख देऊन यावेळी रोहिणी हट्टंगडी यांना गौरवण्यात आले.याप्रसंगी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे पदाधिकारी व सांगलीकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी या पुरस्काराला उत्तर देताना, विष्णुदास भावे पुरस्कार मिळणे, म्हणजे मी भाग्यवान समजते.आणि भारावून जाणे काय असते,ते हा पुरस्कार जाहीर झाल्याच्यानंतर कळले,अश्या शब्दात रोहिणी हट्टंगडी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तर आजच्या तरुण पिढीला आणि विशेषतः महिला कलाकारांचे होणारे शोषण या बद्दल बोलताना,आज
महिलांच्याकडे 'नाही'म्हणायचा मोठा अधिकार आहे,आणि "नाही" म्हणायची हिम्मत महिलांना दाखवल्यास,कोणाची हिम्मत होणार नाही,असं मत महिलांच्यावर सिनेसृष्टीत होणाऱ्या शोषणाबद्दल व्यक्त केले.

तर आजच्या तरुणांना स्वतःच्या गावात आधी काम केले पाहिजे, आणि आजच्या तरुण पिढीने केवळ ग्लॅमरस म्हणून या क्षेत्रात आल्यास, त्यांना काही करता येणार नाही, आधी काम केले पाहिजे आणि शिकले पाहिजे ,मग तुमच्या मागे पैसा,नाव धावून येईल,आणि एखाद्या संधी मिळाल्यास तरुणांना हुरळून जाऊ नये,शिकले पाहिजे,तरच पुढे जाऊ शकाल असे ,मतही यावेळी रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केले आहे.

बाईट - रोहिणी हट्टंगडी - जेष्ठ अभिनेत्री .


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.