ETV Bharat / sitara

इम्रान खान आणि अवंतिकाच्या नात्यात दुरावा?

अभिनेता इम्रान खान आणि अवंतिका गेली काही महिने वेगळे राहात आहेत. अवंतिकाने अलिकडे एक पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्णाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

author img

By

Published : Sep 9, 2019, 1:34 PM IST

इम्रान खान आणि अवंतिका फोटो इन्स्टाग्रामच्या सौजन्याने

मुंबई - बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहात आहेत. अलिकडेच अवंतिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट वाचल्यानंतर लक्षात येते की, दोघांमध्ये फारसे बरे चाललेले नाही. या पोस्टमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आल्यानंतर तिने ही पोस्ट आता डिलीट केली आहे.

अवंतिका मलिकने पोस्ट केलेल्या लिखानामध्ये मॉर्गन हार्पर निकोलस यांच्या एक कोटचा वापर केला आहे. तिने लिहिलंय, ''कधी कधी तुम्हाला निघून जायचे असते. तुम्ही ज्याच्यावर उर्जा खर्च करीत असता त्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. तुम्ही थांबू शकाल असे वाटू शकते. ती गोष्ट तुम्ही पुन्हा मिळवू शकता, असे असतानाही तुम्हाला निर्धाराने निर्णय घ्यावा लागतो. तिथून अशा ठिकाणी निघून जावे जिथे तुमचे स्वागत होईल.''

पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, ''हा निर्णय घेणे सोपे असत नाही. लोकांनी जर तुमच्याबद्दलची मते बदलली, त्यांना तुम्ही योग्य नाहीत असे वाटत असेल, तर तुम्हाला तिथून निघून जावे लागेल. पुढे कोणीतरी तुमची वाट पाहात असेल यावर विश्वास ठेवून हा निर्णय घ्यावा लागतो. आज मला हे पाहण्याची गरज होती.''

इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांचे लग्न २०११ मध्ये झाले होते. २०१४ मध्ये त्यांना इमारा ही मुलगी झाली. इम्रान सध्या अभिनयाच्या दुनियेपासून लांब आहे. सध्या त्याने आपले लक्ष दिग्दर्शनावर केंद्रीत करण्याचे ठरवले आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहात आहेत. अलिकडेच अवंतिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट वाचल्यानंतर लक्षात येते की, दोघांमध्ये फारसे बरे चाललेले नाही. या पोस्टमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आल्यानंतर तिने ही पोस्ट आता डिलीट केली आहे.

अवंतिका मलिकने पोस्ट केलेल्या लिखानामध्ये मॉर्गन हार्पर निकोलस यांच्या एक कोटचा वापर केला आहे. तिने लिहिलंय, ''कधी कधी तुम्हाला निघून जायचे असते. तुम्ही ज्याच्यावर उर्जा खर्च करीत असता त्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. तुम्ही थांबू शकाल असे वाटू शकते. ती गोष्ट तुम्ही पुन्हा मिळवू शकता, असे असतानाही तुम्हाला निर्धाराने निर्णय घ्यावा लागतो. तिथून अशा ठिकाणी निघून जावे जिथे तुमचे स्वागत होईल.''

पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, ''हा निर्णय घेणे सोपे असत नाही. लोकांनी जर तुमच्याबद्दलची मते बदलली, त्यांना तुम्ही योग्य नाहीत असे वाटत असेल, तर तुम्हाला तिथून निघून जावे लागेल. पुढे कोणीतरी तुमची वाट पाहात असेल यावर विश्वास ठेवून हा निर्णय घ्यावा लागतो. आज मला हे पाहण्याची गरज होती.''

इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांचे लग्न २०११ मध्ये झाले होते. २०१४ मध्ये त्यांना इमारा ही मुलगी झाली. इम्रान सध्या अभिनयाच्या दुनियेपासून लांब आहे. सध्या त्याने आपले लक्ष दिग्दर्शनावर केंद्रीत करण्याचे ठरवले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.