मुंबई - सध्या देशभरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उन्हाच्या तिव्रतेमुळे नागरिकांना प्रचंड झळा सोसाव्या लागत आहेत. महाराष्ट्रासह इलाहाबाद, दिल्ली, जयपूर, लखनऊ, या शहरातही उन्हाचा पारा हा ४५ अंश सेल्सियसच्यावर पोहोचला आहे. या उन्हाच्या झळा महानायक अमिताभ बच्चन यांनाही पोहोचत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर मजेशीर ट्विट करून उन्हामुळे कसे हाल होत आहेत, हे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी त्यांचा एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे.
'गर्मी की वजह से हालात ऐसे हो गये है कि आजकल तजुरबा लिखा हुआ भी तरबूजा पढ़ने में आता है', असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हवामान खात्याने यावर्षी पावसाचे आगमन उशीरा सांगितले आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उन्हाचा पारा जास्तच असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.