ETV Bharat / sitara

रातोरात स्टार झालेल्या भाग्यश्रीने अचानक सोडली चित्रपटसृष्टी, वाचा कारण

author img

By

Published : Jun 2, 2020, 7:37 PM IST

मैंने प्यार किया चित्रपटाच्या यशानंतर भाग्यश्रीला अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या. मात्र, तिने चित्रपटांत करियर करण्याऐवजी कौटुंबिक जीवन निवडले. त्या काळात भाग्यश्रीने यश चोप्रा आणि प्रकाश मेहता यांच्या चित्रपटांच्या ऑफरदेखील नाकारल्या.

yash chopra fired bhagyashree
भाग्यश्रीने अचानक सोडली चित्रपटसृष्टी

मुंबई - अभिनेत्री भाग्यश्रीने 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिचा हा पहिलाच चित्रपट हीट ठरला आणि भाग्यश्री रातोरात स्टार झाली. या चित्रपटानंतर तिला अनेक मोठ-मोठ्या सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या. मात्र, इतक्यात तिने अभिनेता आणि व्यावसायिक हिमालयसोबत लग्न करणार असल्याचं जाहीर केलं.

स्टार होताच केलेल्या या लग्नाचा तिच्या करियरवर मोठा परिणाम झाला आणि यानंतर ती कधीही सिनेसृष्टीत आपली जागा बनवू शकली नाही. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत भाग्यश्रीने तिच्या लवकर लग्न करण्याच्या आणि अभिनय सोडण्याच्या निर्णयबद्दल चर्चा केली.

मैंने प्यार किया चित्रपटाच्या यशानंतर भाग्यश्रीला अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या. मात्र, तिने चित्रपटांत करियर करण्याऐवजी कौटुंबीक जीवन निवडले. त्या काळात भाग्यश्रीने यश चोप्रा आणि प्रकाश मेहता यांच्या चित्रपटांच्या ऑफरदेखील नाकारल्या.

भाग्यश्रीने सांगितले, त्यावेळी मी अनेक मोठ मोठ्या सिनेमांच्या ऑफर नाकारल्या. याच कारणामुळे मी जेव्हा केव्हा प्रकाश अंकल आणि यशजी यांना भेटत असे तेव्हा ते सर्वांसमोर या गोष्टीसाठी माझ्यावर रागवत. काही दिवसांपूर्वीच माझा मुलगा अभिमन्यूची ओळख करुन देण्यासाठी मी यश अंकल यांच्याकडे गेले होते. यावेळी त्यांनी माझ्या मुलाला सांगितले, की ही तुझी आई आहे ना, ती सिनेसृष्टीतील सर्वात वेडी मुलगी आहे. यशजी यांना माझ्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मात्र, मी कायम त्यांना नकार दिला, असे भाग्यश्री पुढे म्हणाली,

भाग्यश्रीने कुटुंबाच्या विरोधात जात हिमालयसोबत लग्नगाठ बांधली होती. सलमान खान आणि सुरज बडजात्या यांच्यासह काही सहकाऱ्यांच्या उपस्थितीत एका मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला होता. लवकरच भाग्यश्री दोन सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभास 20 या दाक्षिणात्य कलाकार प्रभासच्या सिनेमात ती झळकणार आहे. तर, किट्टी पार्टी सिनेमातदेखील तिने भूमिका साकारली आहे.

मुंबई - अभिनेत्री भाग्यश्रीने 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिचा हा पहिलाच चित्रपट हीट ठरला आणि भाग्यश्री रातोरात स्टार झाली. या चित्रपटानंतर तिला अनेक मोठ-मोठ्या सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या. मात्र, इतक्यात तिने अभिनेता आणि व्यावसायिक हिमालयसोबत लग्न करणार असल्याचं जाहीर केलं.

स्टार होताच केलेल्या या लग्नाचा तिच्या करियरवर मोठा परिणाम झाला आणि यानंतर ती कधीही सिनेसृष्टीत आपली जागा बनवू शकली नाही. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत भाग्यश्रीने तिच्या लवकर लग्न करण्याच्या आणि अभिनय सोडण्याच्या निर्णयबद्दल चर्चा केली.

मैंने प्यार किया चित्रपटाच्या यशानंतर भाग्यश्रीला अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या. मात्र, तिने चित्रपटांत करियर करण्याऐवजी कौटुंबीक जीवन निवडले. त्या काळात भाग्यश्रीने यश चोप्रा आणि प्रकाश मेहता यांच्या चित्रपटांच्या ऑफरदेखील नाकारल्या.

भाग्यश्रीने सांगितले, त्यावेळी मी अनेक मोठ मोठ्या सिनेमांच्या ऑफर नाकारल्या. याच कारणामुळे मी जेव्हा केव्हा प्रकाश अंकल आणि यशजी यांना भेटत असे तेव्हा ते सर्वांसमोर या गोष्टीसाठी माझ्यावर रागवत. काही दिवसांपूर्वीच माझा मुलगा अभिमन्यूची ओळख करुन देण्यासाठी मी यश अंकल यांच्याकडे गेले होते. यावेळी त्यांनी माझ्या मुलाला सांगितले, की ही तुझी आई आहे ना, ती सिनेसृष्टीतील सर्वात वेडी मुलगी आहे. यशजी यांना माझ्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मात्र, मी कायम त्यांना नकार दिला, असे भाग्यश्री पुढे म्हणाली,

भाग्यश्रीने कुटुंबाच्या विरोधात जात हिमालयसोबत लग्नगाठ बांधली होती. सलमान खान आणि सुरज बडजात्या यांच्यासह काही सहकाऱ्यांच्या उपस्थितीत एका मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला होता. लवकरच भाग्यश्री दोन सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभास 20 या दाक्षिणात्य कलाकार प्रभासच्या सिनेमात ती झळकणार आहे. तर, किट्टी पार्टी सिनेमातदेखील तिने भूमिका साकारली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.