ETV Bharat / sitara

यशराजचा सिनेमा मिळवण्यासाठी सुशांतने नाकारला होता अनुराग कश्यपचा चित्रपट

author img

By

Published : Jul 24, 2020, 8:30 PM IST

चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांनी नुकताच खुलासा केला की दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 'हसी तो फसी' हा त्याचा चित्रपट नाकारुन यशराज फिल्म्सचा 'शुध्द देसी रोमान्स' या चित्रपटाची निवड केली होती.

Sushant Singh Rajput
सुशांतसिंग राजपूत

मुंबई: सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर, नेपोटिझ्म या विषयावर चर्चेला उधाण आले आहे. सुशांतचे चाहते बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. या चर्चेत सहभागी होत निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी प्रत्येक नवीन कलाकार मोठ्या प्रॉडक्शन हाऊसची योग्य अयोग्यता कशी शोधतात यावर चर्चा केली. सुशांतसिंह राजपूतने यशराज फिल्म्सचा 'शुध्द देसी रोमान्स' चित्रपट करायचा असल्यामुळे 'हसी तो फसी' हा चित्रपट नाकारला होता याबद्दल मोकळेपणाने सांगितले.

"मुकेश छाबरा माझ्या ऑफिस मध्ये काम करायचा. आम्ही 'फॅन्टम' या निर्मिती संस्थेकडून 'हसी तो फसी' हा चित्रपट बनवत होतो. त्या चित्रपटाची सुरुवात आम्ही सुशांतसिंहला घेऊन केली होती. त्यानंतर आम्ही परिणीती चोप्राकडे गेलो. आम्ही सांगितले हा 'काइ पो छे' चित्रपटातील हा कलाकार आहे त्याचा 'पीके' हा चित्रपट येतोय. त्यानंतर तो यशराज फिल्मसकडे गेला, त्यावेळी परिणीतीला यशराज फिल्म्स हाताळत होती. त्यानंतर यशराज फिल्म्सने सुशांतला बोलवले आणि त्याला 'शुध्द देसी रोमान्स'साठी करारबध्द केले", असे अनुरागने सांगितले.

तो पुढे म्हणाला, "सुशांत माझ्या ऑफिसमध्ये बसायचा, मी आणि मुकेश त्याच्याशी बोलायचो. त्याने यशराज फिल्म्सशी साईन केले आणि हसी तो फसी हा आऊटसायडरचा चित्रपट सोडला. कारण त्याला यशराज फिल्म्सची मान्यता मिळवायची होती, हे सर्व कलाकारांच्या बाबतीत होते आणि मी कोणालाही अडवू शकत नव्हतो. तो अतिशय हुशार कलाकार होता. हे सर्व तुमच्या निवडीबद्दल आहे. मी करीत असलेल्या चित्रपटापेक्षा त्याने जास्त पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने हा पुढे जाण्याचा निर्णय घेतला कारण त्याला धर्मा प्रॉडक्शनसोबत काम करायचे होते. लोक आता कोणाचा तरी मृत्यूचा वापर प्रत्येकाला खाली खेचण्यासाठी करीत आहेत."

हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरणी शत्रुघ्न सिन्हांनी केली सीबीआय चौकशीची मागणी

पुढे सविस्तरपणे बोलताना अनुरागने सांगितले की त्याने दुसऱ्यांदा दुसऱ्या एका सिनेमासाठी सुशांतला विचारले होते परंतु तेव्हाही त्याने दुसरा एक चित्रपट निवडला होता.

अनुराग म्हणाला, "वर्षभरानंतर २०१६ मध्ये महेंद्रसिंग धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटाच्या रिलीजच्या अगोदर मी एक कथा लिहिली आणि मुकेश छाबरा त्याला भेटायला गेला. त्याने सुशांतला सांगितले की अनुरागने एक स्क्रिप्ट लिहिली आहे आणि तो स्टार कलाकार शोधतोय जो उत्तर प्रदेशच्या बाहेरचा असेल. सुशांतने कथा ऐकली, दरम्यान धोनी रिलीज झाला आणि सुपरहिट ठरला, त्यानंतर त्याने मला फोन केला नाही. मी नाराज झालो नाही, मी पुढे गेलो आणि मुक्काबाज बनवला. हे कुणालाही अस्वस्थ करण्यासाठी नाही. मला याची सवय आहे."

सुशांतसिंह राजपूत १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी अहवालाच्या आधारे स्पष्ट केले होते.

मुंबई: सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर, नेपोटिझ्म या विषयावर चर्चेला उधाण आले आहे. सुशांतचे चाहते बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. या चर्चेत सहभागी होत निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी प्रत्येक नवीन कलाकार मोठ्या प्रॉडक्शन हाऊसची योग्य अयोग्यता कशी शोधतात यावर चर्चा केली. सुशांतसिंह राजपूतने यशराज फिल्म्सचा 'शुध्द देसी रोमान्स' चित्रपट करायचा असल्यामुळे 'हसी तो फसी' हा चित्रपट नाकारला होता याबद्दल मोकळेपणाने सांगितले.

"मुकेश छाबरा माझ्या ऑफिस मध्ये काम करायचा. आम्ही 'फॅन्टम' या निर्मिती संस्थेकडून 'हसी तो फसी' हा चित्रपट बनवत होतो. त्या चित्रपटाची सुरुवात आम्ही सुशांतसिंहला घेऊन केली होती. त्यानंतर आम्ही परिणीती चोप्राकडे गेलो. आम्ही सांगितले हा 'काइ पो छे' चित्रपटातील हा कलाकार आहे त्याचा 'पीके' हा चित्रपट येतोय. त्यानंतर तो यशराज फिल्मसकडे गेला, त्यावेळी परिणीतीला यशराज फिल्म्स हाताळत होती. त्यानंतर यशराज फिल्म्सने सुशांतला बोलवले आणि त्याला 'शुध्द देसी रोमान्स'साठी करारबध्द केले", असे अनुरागने सांगितले.

तो पुढे म्हणाला, "सुशांत माझ्या ऑफिसमध्ये बसायचा, मी आणि मुकेश त्याच्याशी बोलायचो. त्याने यशराज फिल्म्सशी साईन केले आणि हसी तो फसी हा आऊटसायडरचा चित्रपट सोडला. कारण त्याला यशराज फिल्म्सची मान्यता मिळवायची होती, हे सर्व कलाकारांच्या बाबतीत होते आणि मी कोणालाही अडवू शकत नव्हतो. तो अतिशय हुशार कलाकार होता. हे सर्व तुमच्या निवडीबद्दल आहे. मी करीत असलेल्या चित्रपटापेक्षा त्याने जास्त पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने हा पुढे जाण्याचा निर्णय घेतला कारण त्याला धर्मा प्रॉडक्शनसोबत काम करायचे होते. लोक आता कोणाचा तरी मृत्यूचा वापर प्रत्येकाला खाली खेचण्यासाठी करीत आहेत."

हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरणी शत्रुघ्न सिन्हांनी केली सीबीआय चौकशीची मागणी

पुढे सविस्तरपणे बोलताना अनुरागने सांगितले की त्याने दुसऱ्यांदा दुसऱ्या एका सिनेमासाठी सुशांतला विचारले होते परंतु तेव्हाही त्याने दुसरा एक चित्रपट निवडला होता.

अनुराग म्हणाला, "वर्षभरानंतर २०१६ मध्ये महेंद्रसिंग धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटाच्या रिलीजच्या अगोदर मी एक कथा लिहिली आणि मुकेश छाबरा त्याला भेटायला गेला. त्याने सुशांतला सांगितले की अनुरागने एक स्क्रिप्ट लिहिली आहे आणि तो स्टार कलाकार शोधतोय जो उत्तर प्रदेशच्या बाहेरचा असेल. सुशांतने कथा ऐकली, दरम्यान धोनी रिलीज झाला आणि सुपरहिट ठरला, त्यानंतर त्याने मला फोन केला नाही. मी नाराज झालो नाही, मी पुढे गेलो आणि मुक्काबाज बनवला. हे कुणालाही अस्वस्थ करण्यासाठी नाही. मला याची सवय आहे."

सुशांतसिंह राजपूत १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी अहवालाच्या आधारे स्पष्ट केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.