ETV Bharat / sitara

वरुण-नताशाच्या लग्नामुळे 'स्ट्रीट डान्सर'ची रिलीज डेट बदलली? - wedding

वरूण आणि नताशा येत्या डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. वरूणच्या आगामी 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटाची तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली.

वरूण नताशाच्या लग्नामुळे 'स्ट्रीट डान्सर'ची रिलीज डेट बदलली?
author img

By

Published : Jun 24, 2019, 6:22 PM IST

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल यांच्या नात्याविषयीच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. मात्र, वरूण आणि डेविड धवननं या चर्चांना बहुतेकदा अफवा म्हटलं आहे. पण यानंतरही या कपलच्या रिलेशनशिप विषयीच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत असतात.

अशात आता वरूण आणि नताशा येत्या डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. वरूणच्या आगामी 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटाची तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट आता जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागचे कारण वरूण आणि नताशाचे लग्नच असल्याचे म्हटले जात आहे.

चित्रपटाचं चित्रीकरणही वेळेत होत आहे, तर पोस्ट प्रोडक्शन आणि इतर कामही वेळतच पूर्ण होणार असताना केवळ जानेवारीतील प्रदर्शन चित्रपटासाठी फायद्याचं असल्यानं हा निर्णय घेतल्याचं वरूण आणि भूषण कुमार यांनी म्हटलं होतं. यावरूनच डिसेंबरमध्ये वरूण-नताशा विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज अनेक माध्यमांनी वर्तवला आहे. अशात आता हे कपल स्वतः याबद्दलची अधिकृत घोषण कधी करणार याकडेच वरूणच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल यांच्या नात्याविषयीच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. मात्र, वरूण आणि डेविड धवननं या चर्चांना बहुतेकदा अफवा म्हटलं आहे. पण यानंतरही या कपलच्या रिलेशनशिप विषयीच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत असतात.

अशात आता वरूण आणि नताशा येत्या डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. वरूणच्या आगामी 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटाची तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट आता जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागचे कारण वरूण आणि नताशाचे लग्नच असल्याचे म्हटले जात आहे.

चित्रपटाचं चित्रीकरणही वेळेत होत आहे, तर पोस्ट प्रोडक्शन आणि इतर कामही वेळतच पूर्ण होणार असताना केवळ जानेवारीतील प्रदर्शन चित्रपटासाठी फायद्याचं असल्यानं हा निर्णय घेतल्याचं वरूण आणि भूषण कुमार यांनी म्हटलं होतं. यावरूनच डिसेंबरमध्ये वरूण-नताशा विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज अनेक माध्यमांनी वर्तवला आहे. अशात आता हे कपल स्वतः याबद्दलची अधिकृत घोषण कधी करणार याकडेच वरूणच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Intro:Anc- देवाच्या आळंदी नगरीमध्ये वैष्णवांचा मेळा भरला असताना तामिळनाडू राज्यातून अनेक वारकरी आषाढी वारी मध्ये सहभागी होण्यासाठी देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झाले असून माऊलींच्या दर्शनानंतर हे वारकरी आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करत वारीत सहभागी होणार आहेत

तामिळनाडू राज्यातून लहान मुलांसह हे वारकरी गेल्या अनेक वर्षांपासून वारीत सहभागी होत असतात विशेष म्हणजे या संपूर्ण कुटुंबात प्रत्येक सदस्याच्या गळ्यामध्ये माऊलींची तुळशीची माळ पाहायला मिळत आहे आणि या वारकऱ्यांचे माऊलीवरील अतूट भक्तीही यातून दिसून येते


माऊलींच्या भक्तीचा महिमा हा या वारकऱ्यांना आज वारी मध्ये घेऊन आला आणि ही वारी करत असताना त्यांना मिळणारा आनंद काही वेगळाच आहे असल्याचे त्यांनी सांगितले


Body:....


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.