ETV Bharat / sitara

१९ महिन्यानंतर अमृता रावने स्वतःला दिली इटालियन ‘थाळी’ची ‘ट्रीट’! - अमृता रावने इटालियन जेवण जेवले

गरोदर राहिल्यापासून मुलाच्या जन्मानंतरही बरेच महिने अमृता रावने फक्त घरचेच, फक्त आईच्या हातचे, जेवण घेण्यास प्राधान्य दिले. परंतु आता तब्बल १९ महिन्यांनंतर अमृताने तिच्या आवडत्या इटालियन रेस्टॉरंट मधून जेवण मागविले आणि त्याची लज्जत चाखली आणि स्वतःला ट्रीट दिली.

अमृता रावने स्वतःला दिली इटालियन ‘थाळी’ची ‘ट्रीट’!
अमृता रावने स्वतःला दिली इटालियन ‘थाळी’ची ‘ट्रीट’!
author img

By

Published : Sep 6, 2021, 3:34 PM IST

घरचे खाणे पौष्टिक असते आणि त्यामुळे ते खाण्यास प्राधान्य दिले पाहिजे असे बडेबुजुर्ग नेहमी सांगत असतात. खासकरून गरोदरपणात महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या बाळाला सर्व प्रकारचे पौष्टिक अन्न मिळावे. गरोदर असताना अभिनेत्री अमृता राव हिनेसुद्धा या सूत्राचा अवलंब केला होता आणि गरोदर राहिल्यापासून मुलाच्या जन्मानंतरही बरेच महिने तिने फक्त घरचेच, फक्त आईच्या हातचे, जेवण घेण्यास प्राधान्य दिले. परंतु आता तब्बल १९ महिन्यांनंतर अमृताने तिच्या आवडत्या इटालियन रेस्टॉरंट मधून जेवण मागविले आणि त्याची लज्जत चाखली आणि स्वतःला ट्रीट दिली.

आरजे अनमोलशी लग्न झाल्यानंतर अमृता रावने गेल्या नोव्हेंबरमध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव वीर ठेवले आहे. लॉकडाऊनमध्ये ती गर्भवती झाली म्हणून, नऊ महिने ती बाहेर खाऊ शकत नव्हती आणि डिलीव्हरीनंतर लोकांनी तिला चायनीज अन्न न घेण्याचा सल्ला दिला होता जो तिने इमानेइतबारे पाळला. परंतु तिने आता आपल्या भावना आपल्या फॅन्ससोबत शेयर करताना लिहिले की, “हा आहे माझा ‘मॉमी’ टाइम ते ‘मी’ टाइम. १९ महिन्यानंतर मी हॉटेलमधून खाणे मागविले. माझ्या आवडीच्या त्या रेस्टॉरंटने सर्व मार्गदर्शक तत्वे पाळत माझ्यासाठी पूर्णतः ‘हेल्दी’ जेवण बनविले. मला वाटतं की इतक्या महिन्यांनंतर मला ही ‘ट्रीट’ मिळायला काहीच हरकत नसावी. आणि मी तक्रार अजिबात करीत नाहीये कारण कदाचित ‘मॉमी’ बनण्याचा हा फायदा असावा ”

त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मातृत्व हा एक प्रवास आहे जो ‘स्व’ चा त्याग करून सुरू होतो. आणि मी अजिबात तक्रार करत नाही, मला वाटते की आई होण्याचा हा सर्वात चांगला भाग आहे. पहिले नऊ महिने लॉकडाऊन होता तेव्हा मी फक्त 'मॉम के हाथ का खाना' खाल्ले आणि पुढील १० महिने खूप कडक ‘डायट’ होते कारण तुम्हाला बाळाला आहार देताना तुम्हाला चायनीज पदार्थ खाण्याची परवानगी नाही.”

अमृता राव पुढे म्हणाली, “मी १९ महिने महिन्यांनंतर पहिल्यांदाच रेस्टॉरंटमधून काही स्वादिष्ट खाद्यपदार्थ खाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी ‘ती’ थाळी पाहिली तेव्हा माझ्यातील लहान मूल जागे झाले आणि माझा उत्साह द्विगुणित झाला. मला वाटते की इतक्या महिन्यांच्या परिश्रमानंतर ‘ऐसा खाना खाना तो बनता हैं.”

हेही वाचा - ‘शर्माजी नमकीन' : परेश रावल यांनी पूर्ण केला ऋषी कपूर यांचा 'अखेर'चा चित्रपट!!

घरचे खाणे पौष्टिक असते आणि त्यामुळे ते खाण्यास प्राधान्य दिले पाहिजे असे बडेबुजुर्ग नेहमी सांगत असतात. खासकरून गरोदरपणात महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या बाळाला सर्व प्रकारचे पौष्टिक अन्न मिळावे. गरोदर असताना अभिनेत्री अमृता राव हिनेसुद्धा या सूत्राचा अवलंब केला होता आणि गरोदर राहिल्यापासून मुलाच्या जन्मानंतरही बरेच महिने तिने फक्त घरचेच, फक्त आईच्या हातचे, जेवण घेण्यास प्राधान्य दिले. परंतु आता तब्बल १९ महिन्यांनंतर अमृताने तिच्या आवडत्या इटालियन रेस्टॉरंट मधून जेवण मागविले आणि त्याची लज्जत चाखली आणि स्वतःला ट्रीट दिली.

आरजे अनमोलशी लग्न झाल्यानंतर अमृता रावने गेल्या नोव्हेंबरमध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव वीर ठेवले आहे. लॉकडाऊनमध्ये ती गर्भवती झाली म्हणून, नऊ महिने ती बाहेर खाऊ शकत नव्हती आणि डिलीव्हरीनंतर लोकांनी तिला चायनीज अन्न न घेण्याचा सल्ला दिला होता जो तिने इमानेइतबारे पाळला. परंतु तिने आता आपल्या भावना आपल्या फॅन्ससोबत शेयर करताना लिहिले की, “हा आहे माझा ‘मॉमी’ टाइम ते ‘मी’ टाइम. १९ महिन्यानंतर मी हॉटेलमधून खाणे मागविले. माझ्या आवडीच्या त्या रेस्टॉरंटने सर्व मार्गदर्शक तत्वे पाळत माझ्यासाठी पूर्णतः ‘हेल्दी’ जेवण बनविले. मला वाटतं की इतक्या महिन्यांनंतर मला ही ‘ट्रीट’ मिळायला काहीच हरकत नसावी. आणि मी तक्रार अजिबात करीत नाहीये कारण कदाचित ‘मॉमी’ बनण्याचा हा फायदा असावा ”

त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मातृत्व हा एक प्रवास आहे जो ‘स्व’ चा त्याग करून सुरू होतो. आणि मी अजिबात तक्रार करत नाही, मला वाटते की आई होण्याचा हा सर्वात चांगला भाग आहे. पहिले नऊ महिने लॉकडाऊन होता तेव्हा मी फक्त 'मॉम के हाथ का खाना' खाल्ले आणि पुढील १० महिने खूप कडक ‘डायट’ होते कारण तुम्हाला बाळाला आहार देताना तुम्हाला चायनीज पदार्थ खाण्याची परवानगी नाही.”

अमृता राव पुढे म्हणाली, “मी १९ महिने महिन्यांनंतर पहिल्यांदाच रेस्टॉरंटमधून काही स्वादिष्ट खाद्यपदार्थ खाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी ‘ती’ थाळी पाहिली तेव्हा माझ्यातील लहान मूल जागे झाले आणि माझा उत्साह द्विगुणित झाला. मला वाटते की इतक्या महिन्यांच्या परिश्रमानंतर ‘ऐसा खाना खाना तो बनता हैं.”

हेही वाचा - ‘शर्माजी नमकीन' : परेश रावल यांनी पूर्ण केला ऋषी कपूर यांचा 'अखेर'चा चित्रपट!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.