ETV Bharat / opinion

काँग्रेसमधील बाळ गंगाधर टिळक... - लोकमान्य टिळक काँग्रेस

राजकीय लेखनासाठी ज्यांना तुरुंगात टाकले होते गेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले नेते म्हणजे टिळक. त्यांच्या १००व्या पुण्यतिथीनिमित्त पाहूयात, कसे होते काँग्रेसमधील टिळक..

Bal Gangadhar Tilak in Congress
काँग्रेसमधील बाळ गंगाधर टिळक...
author img

By

Published : Aug 1, 2020, 6:05 AM IST

हैदराबाद : राजकीय लेखनासाठी ज्यांना तुरुंगात टाकले गेले, असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले नेते म्हणजे टिळक. ब्रिटिश पत्रकार व्हॅलेंटाइन चिरोल यांनी जेव्हा टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जायचे, त्यावेळी राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सांगितल्या आहेत.

  • १८९० मध्ये टिळक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सभासद बनले. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध पक्षाच्या साध्या दृष्टिकोनावर ते कडाडून टीका करत असत.
  • १९१६ मध्ये टिळकांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ब्रिटिश हक्क कार्यकर्त्या , शिक्षण तज्ज्ञ आणि परोपकारी अशा अॅनी बेझंट यांच्या सोबत एकत्र काम केले. काम करत असतानाच त्यांनी स्वराज्य-अभियानाची मोहीम पुढे आणण्यासाठी ऑल इंडिया होम रुल लीग शोधण्यास मदत केली. शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी त्यांनी गावागावांमध्ये प्रवास केला.
  • टिळकांचा राष्ट्रीय नेता म्हणून विस्तार होत असतानाच होम रुल चळवळीने ब्रिटिशांना १९१७ मध्ये मोन्टागू घोषणेचा मसुदा करण्यास भाग पाडले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ( १९१६ ) लखनौ इथे झालेल्या अधिवेशनात टिळकांनी घोषणा केली , ‘ स्वराज्य हा भारतीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे .’ त्यांनी लिहिले , ‘ स्वराज्याची किंवा स्वत: च्या सरकारची मागणी करायची वेळ आली आहे. तुकड्या तुकड्याने काहीही नको. सध्याची प्रशासनाची व्यवस्था देशाचे नुकसानच करत आहे. ती सुधारली पाहिजे किंवा संपुष्टात आली पाहिजे. राष्ट्रवादी नेत्यांनी भारतीयांना स्वदेशी , बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री द्यावी.’

योगदान

  • टिळकांनी देशात बहिष्कार , स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण त्याबरोबर निष्क्रिय प्रतिकार असा चौपदरी कार्यक्रम देशाला आणि राष्ट्रवादी नेत्यांना दिला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपुढे मान्यतेसाठी आणि अंगीकार करण्यासाठी सादर केला.
  • या कार्यक्रमाची सुरुवात आर्थिक शस्त्र म्हणून झाली असली तरीही लवकरच याचे राजकीय महत्त्व कळून चुकले आणि ते प्रामुख्याने वाढले. सुरुवातीला हा कार्यक्रम म्हणजे ब्रिटिशांनी बंगालच्या केलेल्या फाळणीवरची प्रतिक्रिया होती , पण लवकरच ही सर्व भारतभर चळवळ बनली.
  • सुरुवातीला या कार्यक्रमामुळे सरकारला बंगालला पुन्हा एकत्र करावे लागले. पण लवकरच हा कार्यक्रम राष्ट्रीय जागरुकतेसाठी आणि राष्ट्रीय मुक्ती स्वराज्य यासाठी केंद्रस्थानी आला. अशा प्रकारे आर्थिक कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम झाला. स्थानिक आंदोलन हा राष्ट्रीय प्रश्न बनला. याचा परिणाम विशिष्ट ब्रिटीश धोरणामध्ये बदल झाला. यामुळे भारत स्वत: निर्णयक्षम झाला.

विभाजन आणि ऐक्य

  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये टिळकांचा प्रवेश नेमस्त म्हणून झाला असला तरीही त्यांचा ब्रिटिश नोकरशाही आणि ब्रिटिश न्यायव्यवस्था यांच्यावरचा विश्वास उडाला.
  • म्हणून त्यांनी लिहिले, त्यांनी लिहिले , ‘ स्वराज्याची किंवा स्वत: च्या सरकारची मागणी करायची वेळ आली आहे. तुकड्या तुकड्याने काहीही नको. सध्याची प्रशासनाची व्यवस्था देशाचे नुकसानच करत आहे. ती सुधारली पाहिजे किंवा संपुष्टात आली पाहिजे. ‘
  • टिळकांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मवाळ विचारांना विरोध केला. त्यांनी भारतीय राष्ट्रवादी बंगालमधले बिपिन चंद्र पाल आणि पंजाबमधले लाला लजपत राय यांना पाठिंबा दिला. त्यांना लाल – बाल – पाल त्रिमूर्ती म्हणून संबोधले जात असे.
  • १९०७ मध्ये काँग्रेस पक्षाचे वार्षिक अधिवेशन गुजरातमधल्या सुरत , इथे झाले. काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडताना पक्षातले मवाळ आणि कट्टरपंथी यांच्यात चांगलीच जुंपली. पक्ष जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी यांच्यात विभागला गेला. जहाल मतवादीचे नेतृत्व टिळक , पाल आणि लजपत राय करत होते . राष्ट्रवादी अरोबिंदो घोष, व्ही.ओ.चिदंबरम पिल्लाई यांचा टिळकांना पाठिंबा होता.
  • १९१६ मध्ये गोखले यांच्या मृत्यूनंतर टिळकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर टिळक शांत झाले होते आणि त्यांनी १९१६ मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ऐक्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
  • मोहम्मद अली जिनांच्या मते टिळकांनी देशासाठी जीव ओवाळला आणि हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्याचाच परिणाम १९१६चा लखनौ करार.

साथीचा रोग आणि अटक

  • १८९६ मध्ये बुबोनिक प्लेग हा मुंबईतून पुण्यापर्यंत पसरला होता. आणि जानेवारी १८९७ पर्यंत याचे साथीच्या रोगात रूपांतर झाले.
  • या आणीबाणीशी सामना करायला ब्रिटिश सैन्य आणले गेले आणि कठोर उपाय सुरू झाले. यात घराघरात जबरदस्तीने घुसणे , तेथील रहिवाशांची तपासणी करणे , त्यांना रुग्णालये आणि विलीनीकरण शिबिरांमध्ये हलवणे , खाजगी मालकीच्या वस्तू टाकून देणे आणि नष्ट करणे आणि रुग्णांना शहरात प्रवेश करणे किंवा शहर सोडण्यास मनाई असे उपाय अवलंबले गेले. मेच्या शेवटाला हा साथीचा रोग नियंत्रणात आला.
  • ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या उपाय योजनांचा योग्य असल्या तरीही त्यांच्याकडे जुलूम जबरदस्ती म्हणून पाहिले जात होते.
  • टिळकांनी त्यांचे वर्तमानपत्र केसरीमध्ये जहाल लेख लिहून हा मुद्दा उपस्थित केला. (केसरी मराठीत प्रकाशित व्हायचे तर मराठा इंग्लिशमध्ये असायचा ). या लेखात टिळकांनी भगवद्गीतेचा दाखला देत म्हटले होते, एखाद्याने कसल्याही फायद्याचा विचार न करता अत्याचारी व्यक्तीची हत्या केली तर त्याला कसलाच दोष लागत नाही. त्यानंतर २२ जून १८९७ मध्ये चापेकर बंधू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रँड आणि आणखी एक ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट अयरेस्ट यांना गोळी घालून ठार मारले.

हैदराबाद : राजकीय लेखनासाठी ज्यांना तुरुंगात टाकले गेले, असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले नेते म्हणजे टिळक. ब्रिटिश पत्रकार व्हॅलेंटाइन चिरोल यांनी जेव्हा टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जायचे, त्यावेळी राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सांगितल्या आहेत.

  • १८९० मध्ये टिळक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सभासद बनले. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध पक्षाच्या साध्या दृष्टिकोनावर ते कडाडून टीका करत असत.
  • १९१६ मध्ये टिळकांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ब्रिटिश हक्क कार्यकर्त्या , शिक्षण तज्ज्ञ आणि परोपकारी अशा अॅनी बेझंट यांच्या सोबत एकत्र काम केले. काम करत असतानाच त्यांनी स्वराज्य-अभियानाची मोहीम पुढे आणण्यासाठी ऑल इंडिया होम रुल लीग शोधण्यास मदत केली. शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी त्यांनी गावागावांमध्ये प्रवास केला.
  • टिळकांचा राष्ट्रीय नेता म्हणून विस्तार होत असतानाच होम रुल चळवळीने ब्रिटिशांना १९१७ मध्ये मोन्टागू घोषणेचा मसुदा करण्यास भाग पाडले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ( १९१६ ) लखनौ इथे झालेल्या अधिवेशनात टिळकांनी घोषणा केली , ‘ स्वराज्य हा भारतीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे .’ त्यांनी लिहिले , ‘ स्वराज्याची किंवा स्वत: च्या सरकारची मागणी करायची वेळ आली आहे. तुकड्या तुकड्याने काहीही नको. सध्याची प्रशासनाची व्यवस्था देशाचे नुकसानच करत आहे. ती सुधारली पाहिजे किंवा संपुष्टात आली पाहिजे. राष्ट्रवादी नेत्यांनी भारतीयांना स्वदेशी , बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री द्यावी.’

योगदान

  • टिळकांनी देशात बहिष्कार , स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण त्याबरोबर निष्क्रिय प्रतिकार असा चौपदरी कार्यक्रम देशाला आणि राष्ट्रवादी नेत्यांना दिला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपुढे मान्यतेसाठी आणि अंगीकार करण्यासाठी सादर केला.
  • या कार्यक्रमाची सुरुवात आर्थिक शस्त्र म्हणून झाली असली तरीही लवकरच याचे राजकीय महत्त्व कळून चुकले आणि ते प्रामुख्याने वाढले. सुरुवातीला हा कार्यक्रम म्हणजे ब्रिटिशांनी बंगालच्या केलेल्या फाळणीवरची प्रतिक्रिया होती , पण लवकरच ही सर्व भारतभर चळवळ बनली.
  • सुरुवातीला या कार्यक्रमामुळे सरकारला बंगालला पुन्हा एकत्र करावे लागले. पण लवकरच हा कार्यक्रम राष्ट्रीय जागरुकतेसाठी आणि राष्ट्रीय मुक्ती स्वराज्य यासाठी केंद्रस्थानी आला. अशा प्रकारे आर्थिक कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम झाला. स्थानिक आंदोलन हा राष्ट्रीय प्रश्न बनला. याचा परिणाम विशिष्ट ब्रिटीश धोरणामध्ये बदल झाला. यामुळे भारत स्वत: निर्णयक्षम झाला.

विभाजन आणि ऐक्य

  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये टिळकांचा प्रवेश नेमस्त म्हणून झाला असला तरीही त्यांचा ब्रिटिश नोकरशाही आणि ब्रिटिश न्यायव्यवस्था यांच्यावरचा विश्वास उडाला.
  • म्हणून त्यांनी लिहिले, त्यांनी लिहिले , ‘ स्वराज्याची किंवा स्वत: च्या सरकारची मागणी करायची वेळ आली आहे. तुकड्या तुकड्याने काहीही नको. सध्याची प्रशासनाची व्यवस्था देशाचे नुकसानच करत आहे. ती सुधारली पाहिजे किंवा संपुष्टात आली पाहिजे. ‘
  • टिळकांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मवाळ विचारांना विरोध केला. त्यांनी भारतीय राष्ट्रवादी बंगालमधले बिपिन चंद्र पाल आणि पंजाबमधले लाला लजपत राय यांना पाठिंबा दिला. त्यांना लाल – बाल – पाल त्रिमूर्ती म्हणून संबोधले जात असे.
  • १९०७ मध्ये काँग्रेस पक्षाचे वार्षिक अधिवेशन गुजरातमधल्या सुरत , इथे झाले. काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडताना पक्षातले मवाळ आणि कट्टरपंथी यांच्यात चांगलीच जुंपली. पक्ष जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी यांच्यात विभागला गेला. जहाल मतवादीचे नेतृत्व टिळक , पाल आणि लजपत राय करत होते . राष्ट्रवादी अरोबिंदो घोष, व्ही.ओ.चिदंबरम पिल्लाई यांचा टिळकांना पाठिंबा होता.
  • १९१६ मध्ये गोखले यांच्या मृत्यूनंतर टिळकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर टिळक शांत झाले होते आणि त्यांनी १९१६ मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ऐक्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
  • मोहम्मद अली जिनांच्या मते टिळकांनी देशासाठी जीव ओवाळला आणि हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्याचाच परिणाम १९१६चा लखनौ करार.

साथीचा रोग आणि अटक

  • १८९६ मध्ये बुबोनिक प्लेग हा मुंबईतून पुण्यापर्यंत पसरला होता. आणि जानेवारी १८९७ पर्यंत याचे साथीच्या रोगात रूपांतर झाले.
  • या आणीबाणीशी सामना करायला ब्रिटिश सैन्य आणले गेले आणि कठोर उपाय सुरू झाले. यात घराघरात जबरदस्तीने घुसणे , तेथील रहिवाशांची तपासणी करणे , त्यांना रुग्णालये आणि विलीनीकरण शिबिरांमध्ये हलवणे , खाजगी मालकीच्या वस्तू टाकून देणे आणि नष्ट करणे आणि रुग्णांना शहरात प्रवेश करणे किंवा शहर सोडण्यास मनाई असे उपाय अवलंबले गेले. मेच्या शेवटाला हा साथीचा रोग नियंत्रणात आला.
  • ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या उपाय योजनांचा योग्य असल्या तरीही त्यांच्याकडे जुलूम जबरदस्ती म्हणून पाहिले जात होते.
  • टिळकांनी त्यांचे वर्तमानपत्र केसरीमध्ये जहाल लेख लिहून हा मुद्दा उपस्थित केला. (केसरी मराठीत प्रकाशित व्हायचे तर मराठा इंग्लिशमध्ये असायचा ). या लेखात टिळकांनी भगवद्गीतेचा दाखला देत म्हटले होते, एखाद्याने कसल्याही फायद्याचा विचार न करता अत्याचारी व्यक्तीची हत्या केली तर त्याला कसलाच दोष लागत नाही. त्यानंतर २२ जून १८९७ मध्ये चापेकर बंधू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रँड आणि आणखी एक ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट अयरेस्ट यांना गोळी घालून ठार मारले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.