ETV Bharat / international

नमस्ते! इस्त्रायलचे पंतप्रधान म्हणतात.. आता भारतीय पद्धतीने घाला नमस्कार!

author img

By

Published : Mar 5, 2020, 10:47 AM IST

कोरोना सध्या जागतिक पातळीवर असलेला सर्वात मोठा धोका आहे. इस्त्रायल सरकारने घातक कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षेचे अनेक उपाय सुचवले आहेत. पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी इस्त्रायली जनतेला भारतीय पद्धतीने नमस्कार करण्याचे आवाहन केले आहे.

Benjamin Netanyahu
पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू

जेरुसलेम - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी इस्त्रायली जनतेला भारतीय पद्धतीने नमस्कार करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेला नमस्कार म्हणण्याचा सुरक्षित उपाय सुचवला आहे.

Prime Minister of Israel Benjamin Netanyahu @netanyahu encourages Israelis to adopt the Indian way of greeting #Namaste at a press conference to mitigate the spread of #coronavirus pic.twitter.com/gtSKzBDjl4

— India in Israel (@indemtel) March 4, 2020

कोरोना सध्या जागतिक पातळीवर असलेला सर्वात मोठा धोका आहे. इस्त्रायल सरकारने घातक कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षेचे अनेक उपाय सुचवले आहेत. संशयितांना लोकांपासून एकांतात ठेवण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यांना तेथेच उपचाराच्या सर्वोत्तम सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी माहिती नेत्यान्याहू यांनी दिली.

हेही वाचा - तालिबानच्या हल्ल्यात अफगाणिस्ताचे २० जवान ठार; शांतता करारावर प्रश्नचिन्ह

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात नागरिकांना अनेक बदल करण्याची आवश्यकता आहे. भारतीय पद्धतीने नमस्कार केल्यास हातांचा स्पर्श टाळता येतो, परिणामी संसर्गाचा धोकाही कमी होतो, असे नेत्यान्याहू म्हणाले.

जेरुसलेम - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी इस्त्रायली जनतेला भारतीय पद्धतीने नमस्कार करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेला नमस्कार म्हणण्याचा सुरक्षित उपाय सुचवला आहे.

कोरोना सध्या जागतिक पातळीवर असलेला सर्वात मोठा धोका आहे. इस्त्रायल सरकारने घातक कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षेचे अनेक उपाय सुचवले आहेत. संशयितांना लोकांपासून एकांतात ठेवण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यांना तेथेच उपचाराच्या सर्वोत्तम सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी माहिती नेत्यान्याहू यांनी दिली.

हेही वाचा - तालिबानच्या हल्ल्यात अफगाणिस्ताचे २० जवान ठार; शांतता करारावर प्रश्नचिन्ह

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात नागरिकांना अनेक बदल करण्याची आवश्यकता आहे. भारतीय पद्धतीने नमस्कार केल्यास हातांचा स्पर्श टाळता येतो, परिणामी संसर्गाचा धोकाही कमी होतो, असे नेत्यान्याहू म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.