ETV Bharat / entertainment

BB OTT 2 Highlights : बिग बॉस ओटीटी २ मधून सायरस ब्रोचाने 'या' कारणास्तव सोडले घर...

author img

By

Published : Jul 11, 2023, 3:41 PM IST

सायरस ब्रोचाने बिग बॉसचे घर सोडले आहे. सायरसची तब्येत बिघडत असल्याने त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

BB OTT 2
बिग बॉस ओटीटी २

मुंबई : बिग बॉस ओटीटी २ हा वादग्रस्त शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोमध्ये सायरस ब्रोचाने बिग बॉसचे घर सोडले आहे. सायरसने याआधीच घर सोडण्याची कल्पना ही अभिनेता सलमान खानला दिली होती. सलमानला शो सोडण्याचे कारण सांगत त्याने सांगितले होते की, त्याने बऱ्याच दिवसांपासून काही खाल्लेल नाही, यामुळे त्याचे वजन कमी होत आहे. याशिवाय त्याला या घरात झोप लागत नाही. मात्र सायरसचे त्यावेळी कोणीही ऐकले नाही. याप्रकरणी सलमान खानचे त्याचे मन वळवून त्याला शोच्या कराराचा हवाला देऊन शो सोडण्यास मनाई केली होती, मात्र आता त्याने कराराची पर्वा न करता शो सोडला आहे.

बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन झाले नाही : विशेष म्हणजे या आठवड्यात कोणतेही एलिमिनेशन झाले नाही. सायरसने सलमान खानसमोर हात जोडले आणि त्याला घरी जायचे आहे हे सांगितले होते. दरम्यान सायरसने घर सोडल्यामुळे, त्याचे चाहते हैराण झाले आहेत. घर सोडण्यामागील काय कारण असू शकते हे जाणून घेण्यास प्रेक्षक फार उत्सुक आहेत. दरम्यान बिग बॉस ओटीटी फक्त एक महिन्यासाठी स्ट्रीमिंग होणार होते, मात्र आता शोचा वाढता टीआरपी पाहता, शो आणखी दोन आठवडे वाढवण्यात आला आहे.

सायरसने घर का सोडले? : सायरसने या शोमध्ये सलमानला आधीच सांगितले होती की, त्याच्या तब्यतीमुळे आणि घरगुती समस्यांमुळे तो शो सोडू इच्छितो. या शोसोबत सायरसचा तीन आठवड्यांचा करार होता. दरम्यान सायरसच्या नातेवाईकांनी शोच्या निर्मात्यांना विनंती केली होती. सायरस शोमधून बाहेर पाठविण्यात यावे त्यानंतर ही गोष्टी घडल्या.

मुक्तपणे खाण्याचा दिला टास्क : बिग बॉसच्या घरात २४ व्या दिवशी एक नवीन कार्य घडले. या टास्कमध्ये, कुटुंबातील सदस्यांना मुक्तपणे खाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले, ज्यामध्ये त्यांना कपकेक, बर्गर आणि काही फ्राईज देण्यात आले होते. दरम्यान, या टास्कमध्ये, कुटुंबातील सदस्यांना स्वतःबद्दल एकमेकांना सांगायचे होते आणि ज्याला या कार्यात रस नाही तो बजर दाबून घर सोडू शकतो.

अभिषेक आणि पूजा भट्टला आली घरच्याची आठवण : या टास्कमध्ये अभिषेक आणि पूजा भट्ट यांची जोडी होती. या टास्कदरम्यान दोघांनी कप केकचा आस्वाद घेतला त्यानंतर आपापसात आपल्या कुटुंबियांबद्दल चर्चा केली. यावेळी पूजा भट्टने सांगितले की, ती तिचे वडील महेश भट्ट तिला फार मिस करत आहे. याशिवाय अभिषेक देखील यावेळी आपल्या आई-वडिलांना आठवले आणि रडायला लागला. त्यानंतर लगेचच अभिषेक आणि पूजाची अवस्था पाहून सायरस घरातून निघून गेला. सायरसलाही त्याच्या कुटुंबीयांची खूप आठवण येत होती. त्यामुळे हा शो त्याने सोडला असेल.

हेही वाचा :

  1. SPKK Collection : 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री...
  2. Baipan Bhari Deva at the box office : भाईपण भारी देवा ठरला ब्लॉकबस्टर, १० व्या दिवशी रचला विक्रम
  3. Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने शेअर केला मुलगी मालती मेरीचा सुंदर फोटो...

मुंबई : बिग बॉस ओटीटी २ हा वादग्रस्त शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोमध्ये सायरस ब्रोचाने बिग बॉसचे घर सोडले आहे. सायरसने याआधीच घर सोडण्याची कल्पना ही अभिनेता सलमान खानला दिली होती. सलमानला शो सोडण्याचे कारण सांगत त्याने सांगितले होते की, त्याने बऱ्याच दिवसांपासून काही खाल्लेल नाही, यामुळे त्याचे वजन कमी होत आहे. याशिवाय त्याला या घरात झोप लागत नाही. मात्र सायरसचे त्यावेळी कोणीही ऐकले नाही. याप्रकरणी सलमान खानचे त्याचे मन वळवून त्याला शोच्या कराराचा हवाला देऊन शो सोडण्यास मनाई केली होती, मात्र आता त्याने कराराची पर्वा न करता शो सोडला आहे.

बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन झाले नाही : विशेष म्हणजे या आठवड्यात कोणतेही एलिमिनेशन झाले नाही. सायरसने सलमान खानसमोर हात जोडले आणि त्याला घरी जायचे आहे हे सांगितले होते. दरम्यान सायरसने घर सोडल्यामुळे, त्याचे चाहते हैराण झाले आहेत. घर सोडण्यामागील काय कारण असू शकते हे जाणून घेण्यास प्रेक्षक फार उत्सुक आहेत. दरम्यान बिग बॉस ओटीटी फक्त एक महिन्यासाठी स्ट्रीमिंग होणार होते, मात्र आता शोचा वाढता टीआरपी पाहता, शो आणखी दोन आठवडे वाढवण्यात आला आहे.

सायरसने घर का सोडले? : सायरसने या शोमध्ये सलमानला आधीच सांगितले होती की, त्याच्या तब्यतीमुळे आणि घरगुती समस्यांमुळे तो शो सोडू इच्छितो. या शोसोबत सायरसचा तीन आठवड्यांचा करार होता. दरम्यान सायरसच्या नातेवाईकांनी शोच्या निर्मात्यांना विनंती केली होती. सायरस शोमधून बाहेर पाठविण्यात यावे त्यानंतर ही गोष्टी घडल्या.

मुक्तपणे खाण्याचा दिला टास्क : बिग बॉसच्या घरात २४ व्या दिवशी एक नवीन कार्य घडले. या टास्कमध्ये, कुटुंबातील सदस्यांना मुक्तपणे खाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले, ज्यामध्ये त्यांना कपकेक, बर्गर आणि काही फ्राईज देण्यात आले होते. दरम्यान, या टास्कमध्ये, कुटुंबातील सदस्यांना स्वतःबद्दल एकमेकांना सांगायचे होते आणि ज्याला या कार्यात रस नाही तो बजर दाबून घर सोडू शकतो.

अभिषेक आणि पूजा भट्टला आली घरच्याची आठवण : या टास्कमध्ये अभिषेक आणि पूजा भट्ट यांची जोडी होती. या टास्कदरम्यान दोघांनी कप केकचा आस्वाद घेतला त्यानंतर आपापसात आपल्या कुटुंबियांबद्दल चर्चा केली. यावेळी पूजा भट्टने सांगितले की, ती तिचे वडील महेश भट्ट तिला फार मिस करत आहे. याशिवाय अभिषेक देखील यावेळी आपल्या आई-वडिलांना आठवले आणि रडायला लागला. त्यानंतर लगेचच अभिषेक आणि पूजाची अवस्था पाहून सायरस घरातून निघून गेला. सायरसलाही त्याच्या कुटुंबीयांची खूप आठवण येत होती. त्यामुळे हा शो त्याने सोडला असेल.

हेही वाचा :

  1. SPKK Collection : 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री...
  2. Baipan Bhari Deva at the box office : भाईपण भारी देवा ठरला ब्लॉकबस्टर, १० व्या दिवशी रचला विक्रम
  3. Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने शेअर केला मुलगी मालती मेरीचा सुंदर फोटो...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.