ETV Bharat / entertainment

Big B praises Jay Shahs : अमिताभनं केलं जय शाहांचं कौतुक, स्टेडियममध्ये फटाके न उडवण्याचा बीसीसीआयचा निर्णय

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 10:29 AM IST

Updated : Nov 3, 2023, 12:48 PM IST

आयसीसी विश्वचषक 2023 सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये फटाके न उडवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी घेतलेल्या या निर्णयाचं 'मेगास्टार' अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलंय.

Big B praises Jay Shahs
अमिताभनं केलं जय शाहांचं कौतुक

मुंबई - सध्या भारतातील 10 शहरात क्रिकेट विश्वचषकाचे सामने विविध स्टेडियमवर सुरू आहेत. सामन्याचा निर्णय झाला की आतषबाजी करण्याची एक परंपरा आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात आकाशत रोषणाईचे फटाके उडवले जातात. यापुढे आयसीसी विश्वचषक 2023 सामन्यांदरम्यान दिल्ली आणि मुंबईतील स्टेडियममध्ये फटाके न उडवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी घेतलेल्या या निर्णयाचं 'मेगास्टार' अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलंय.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एका बातमीच्या लेखाचा फोटो आणि स्टेडियमचा फोटोही शेअर केला आहे.

गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 33 व्या वनडे विश्वचषक 2023 च्या सामन्यात भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सांगितले की मुंबईत सामन्यानंतर स्टेडियमवर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही.

एका निवेदनात जय शाह म्हटलंय की, भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था पर्यावरणविषयक समस्येबाबत संवेदनशील आहे. यासाठी त्यांनी हे प्रकरण आयसीसीकडे नेले आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कोणतेही फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला. ते पुढे म्हणाले की, बीसीसीआय पर्यावरणीय समस्यांशी लढण्यासाठी कटिबद्ध आहे आणि चाहते आणि भागधारकांच्या हितांना नेहमीच अग्रस्थानी ठेवणार आहे. बीसीसीआयने मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेबाबत तातडीची चिंता मान्य केली आहे.

भारताचा उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. या क्रमवारीत त्यानंतर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. गतविजेता इंग्लंड संघ सर्वात कमी गुण मिळवत गुणतालिकेत तळाशी आहे.

सध्या भारतात असंख्य शहरामध्ये हवा प्रदूषणाची समस्या लोकांच्या आरोग्याला बाधा पोहोचवत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक प्रशासन, राज्य सरकारे आणि इतर संबंधित संस्था घडपडत आहेत. सध्या दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषीत शहर बनलंय. मुंबईच्या हवेतील दूषितपणाही खूपच वाढलाय. काही दिवसांत येणार असलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे हे प्रदूषण आणखी वाढण्याची भीती पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत असतात. या पार्श्वभूमीवर क्रिकेट सामन्यांदरम्यान फटाके न उडवण्याचा बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयाचं सर्वच थरातून कौतुक होतंय.

हेही वाचा -

1. Bigg Boss 17: मन्नारा चोप्रा बिग बॉसच्या घरात झाली भावूक, ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलमध्ये झाला राडा

2. Koffee With Karan 8: सनी देओल आणि बॉबी देओलनं 'कॉफी विथ करण 8'मध्ये केला खुलासा ; दुसरा एपिसोड प्रसारित

3. Salaar Movie Updates : 'सालार: भाग 1' च्या एका अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूटसाठी निर्मात्यांनी केला तब्बल 750 वाहनांचा वापर

मुंबई - सध्या भारतातील 10 शहरात क्रिकेट विश्वचषकाचे सामने विविध स्टेडियमवर सुरू आहेत. सामन्याचा निर्णय झाला की आतषबाजी करण्याची एक परंपरा आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात आकाशत रोषणाईचे फटाके उडवले जातात. यापुढे आयसीसी विश्वचषक 2023 सामन्यांदरम्यान दिल्ली आणि मुंबईतील स्टेडियममध्ये फटाके न उडवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी घेतलेल्या या निर्णयाचं 'मेगास्टार' अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलंय.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एका बातमीच्या लेखाचा फोटो आणि स्टेडियमचा फोटोही शेअर केला आहे.

गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 33 व्या वनडे विश्वचषक 2023 च्या सामन्यात भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सांगितले की मुंबईत सामन्यानंतर स्टेडियमवर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही.

एका निवेदनात जय शाह म्हटलंय की, भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था पर्यावरणविषयक समस्येबाबत संवेदनशील आहे. यासाठी त्यांनी हे प्रकरण आयसीसीकडे नेले आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कोणतेही फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला. ते पुढे म्हणाले की, बीसीसीआय पर्यावरणीय समस्यांशी लढण्यासाठी कटिबद्ध आहे आणि चाहते आणि भागधारकांच्या हितांना नेहमीच अग्रस्थानी ठेवणार आहे. बीसीसीआयने मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेबाबत तातडीची चिंता मान्य केली आहे.

भारताचा उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. या क्रमवारीत त्यानंतर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. गतविजेता इंग्लंड संघ सर्वात कमी गुण मिळवत गुणतालिकेत तळाशी आहे.

सध्या भारतात असंख्य शहरामध्ये हवा प्रदूषणाची समस्या लोकांच्या आरोग्याला बाधा पोहोचवत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक प्रशासन, राज्य सरकारे आणि इतर संबंधित संस्था घडपडत आहेत. सध्या दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषीत शहर बनलंय. मुंबईच्या हवेतील दूषितपणाही खूपच वाढलाय. काही दिवसांत येणार असलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे हे प्रदूषण आणखी वाढण्याची भीती पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत असतात. या पार्श्वभूमीवर क्रिकेट सामन्यांदरम्यान फटाके न उडवण्याचा बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयाचं सर्वच थरातून कौतुक होतंय.

हेही वाचा -

1. Bigg Boss 17: मन्नारा चोप्रा बिग बॉसच्या घरात झाली भावूक, ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलमध्ये झाला राडा

2. Koffee With Karan 8: सनी देओल आणि बॉबी देओलनं 'कॉफी विथ करण 8'मध्ये केला खुलासा ; दुसरा एपिसोड प्रसारित

3. Salaar Movie Updates : 'सालार: भाग 1' च्या एका अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूटसाठी निर्मात्यांनी केला तब्बल 750 वाहनांचा वापर

Last Updated : Nov 3, 2023, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.