ETV Bharat / entertainment

Kangana on Gehlot Government : कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार, दंगलीबाबत केले आरोप

author img

By

Published : May 6, 2022, 4:38 PM IST

फिल्मस्टार कंगना रणौत आजकाल तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. जयपूरमध्ये (Kangna Ranaut In jaipur) धाकड गाण्याच्या लाँचच्या वेळी, अराजकीय अभिनेत्रीने राजकीय वक्तव्य केले आणि राज्यातील गेहलोत सरकारला निशाण्यावर घेतले होते.

कंगना रणौत
कंगना रणौत

जयपूर - दंगल आणि बुलडोझरबाबत देशभरात राजकीय वाद सुरू आहे. आता या वादामध्ये बॉलिवूडची 'क्वीन' ( Bollywood Queen ) अर्थात कंगना रणौतनेही ( Kangana Ranaut ) उडी घेतली आहे. राजस्थानमधील दंगलीच्या निमित्ताने रणौत हिने राज्यातील गेहलोत सरकारवर निशाणा साधला. जयपूरमध्ये धाकड ( Dhakad ) चित्रपटाच्या गाण्याच्या लाँचिंगला आलेल्या या अभिनेत्रीने दंगल नियंत्रणात सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले. इशारा देत अताना तिने धमकीही दिली ज्यामध्ये यूपीच्या बुलडोझरचा उल्लेख होता.

कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार

FICCI च्या लेडीज ऑर्गनायझेशन फ्लो (FICCI FLO In Jaipur) कार्यक्रमात सहभागी झालेली कंगना रणौत म्हणाली की, माझी पोस्ट नकारात्मक विचारसरणीच्या लोकांना नकारात्मक वाटते. जे सकारात्मक आहेत त्यांनाही माझी पोस्ट सकारात्मक वाटते. कंगनाने तिच्या लवकरच रिलीज होणाऱ्या 'धाकड' या चित्रपटाचे गाणेही येथे लॉन्च केले. अर्जुन रामपाल, निर्माता दीपक मुकुट आणि दिग्दर्शक रजनीश घई यांनीही राज मंदिरात आयोजित केलेल्या फिक्की फ्लोच्या या कार्यक्रमात हजेरी लावली.

कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार
कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार

दंगलीवर 'अराजकीय' कंगनाचे भाष्य : राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या दंगलींबाबत कंगनाने थेट राज्यातील गेहलोत सरकारवर निशाणा साधला. परिस्थिती सामान्य करण्यासाठी येथे बदलाचे वारे वाहू लागले पाहिजेत, असे आवाहन तिने केले. कंगना म्हणाली- इथे असे सरकार आणा जे दंगलींवर नियंत्रण ठेवू शकेल. जेव्हा त्यांना त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने स्ट्रगलबद्दल सांगितले. म्हणाली की, राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी बरेच काम केले गेले आहे. आता राजकारणाच्या युक्त्या शिकणे हा वेगळा संघर्ष आहे. मी नवीन संघर्षासाठी तयार नाही

कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार
कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार

वादग्रस्त कंगना: खरंतर, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. भाजपच्या समर्थनार्थ ती सतत आपली मते मांडत असल्याचा आरोपही तिच्यावर झाला आहे. कंगना नेहमीच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. ट्रोलही खूप होत असते. अशा स्थितीत तिच्याबद्दलच्या या चर्चांनाही उधाण येत असते की, येत्या निवडणुकीत ती भाजपच्या वतीने राजस्थानमध्ये प्रचारही करू शकते.

हेही वाचा - Janhit Mein Jaari Trailer: नुश्रत भरुचाच्या विनोदाने सामाजिक नियमांना छेद

जयपूर - दंगल आणि बुलडोझरबाबत देशभरात राजकीय वाद सुरू आहे. आता या वादामध्ये बॉलिवूडची 'क्वीन' ( Bollywood Queen ) अर्थात कंगना रणौतनेही ( Kangana Ranaut ) उडी घेतली आहे. राजस्थानमधील दंगलीच्या निमित्ताने रणौत हिने राज्यातील गेहलोत सरकारवर निशाणा साधला. जयपूरमध्ये धाकड ( Dhakad ) चित्रपटाच्या गाण्याच्या लाँचिंगला आलेल्या या अभिनेत्रीने दंगल नियंत्रणात सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले. इशारा देत अताना तिने धमकीही दिली ज्यामध्ये यूपीच्या बुलडोझरचा उल्लेख होता.

कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार

FICCI च्या लेडीज ऑर्गनायझेशन फ्लो (FICCI FLO In Jaipur) कार्यक्रमात सहभागी झालेली कंगना रणौत म्हणाली की, माझी पोस्ट नकारात्मक विचारसरणीच्या लोकांना नकारात्मक वाटते. जे सकारात्मक आहेत त्यांनाही माझी पोस्ट सकारात्मक वाटते. कंगनाने तिच्या लवकरच रिलीज होणाऱ्या 'धाकड' या चित्रपटाचे गाणेही येथे लॉन्च केले. अर्जुन रामपाल, निर्माता दीपक मुकुट आणि दिग्दर्शक रजनीश घई यांनीही राज मंदिरात आयोजित केलेल्या फिक्की फ्लोच्या या कार्यक्रमात हजेरी लावली.

कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार
कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार

दंगलीवर 'अराजकीय' कंगनाचे भाष्य : राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या दंगलींबाबत कंगनाने थेट राज्यातील गेहलोत सरकारवर निशाणा साधला. परिस्थिती सामान्य करण्यासाठी येथे बदलाचे वारे वाहू लागले पाहिजेत, असे आवाहन तिने केले. कंगना म्हणाली- इथे असे सरकार आणा जे दंगलींवर नियंत्रण ठेवू शकेल. जेव्हा त्यांना त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने स्ट्रगलबद्दल सांगितले. म्हणाली की, राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी बरेच काम केले गेले आहे. आता राजकारणाच्या युक्त्या शिकणे हा वेगळा संघर्ष आहे. मी नवीन संघर्षासाठी तयार नाही

कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार
कंगना रणौतचा राजस्थान सरकारवर प्रहार

वादग्रस्त कंगना: खरंतर, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. भाजपच्या समर्थनार्थ ती सतत आपली मते मांडत असल्याचा आरोपही तिच्यावर झाला आहे. कंगना नेहमीच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. ट्रोलही खूप होत असते. अशा स्थितीत तिच्याबद्दलच्या या चर्चांनाही उधाण येत असते की, येत्या निवडणुकीत ती भाजपच्या वतीने राजस्थानमध्ये प्रचारही करू शकते.

हेही वाचा - Janhit Mein Jaari Trailer: नुश्रत भरुचाच्या विनोदाने सामाजिक नियमांना छेद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.