ETV Bharat / elections

भाजपकडून गुंडांच्या सहाय्याने निवडणूक लढवली जातेय, संजय दिना पाटलांचा आरोप

author img

By

Published : Apr 9, 2019, 9:53 PM IST

भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे ठाणे आणि इतर ठिकाणचे गुंड ईशान्य मुंबई मतदार संघात आणत आहेत, असा आरोप आघाडीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी केला आहे.

संजय दिना पाटील

मुंबई - भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे ठाणे आणि इतर ठिकाणचे गुंड ईशान्य मुंबई मतदार संघात आणत आहेत. त्यामुळे भाजप ही निवडणूक गुंडांच्या सहाय्याने लढवत आहे, असा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी केला.

संजय दिना पाटील

ईशान्य मुंबई मतदार संघातील आघाडीचे उमेदवार पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मुलुंड येथील निवडणूक कार्यालयात भरला. त्यापूर्वी त्यांनी भाजपचा गड असलेल्या मुलुंडमध्ये शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, भाजप लोकांचे स्वागत गुंडांकडून करत आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांच्या सोबत फिरायला गुंड असतात. आमच्यासोबत कोण दिसतील त्यांना हे गुंड धमक्या देतात, असा आरोप केला.

पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी हे सर्व लोक स्वतःहून आलेले आहेत. तुमच्याप्रमाणे भाड्यावर माणसे आणली नाहीत, असा टोला भाजपला लगावला.

निवडणूक ही लढाई असते. लढाई छोटी किंवा मोठी नसते. ईशान्य मुंबईमधील निवडणुकीत मला कोणाचेही आव्हान दिसत नाही. भाजपने जे खोटे वादे केले आहेत. त्याचा लोकांना अंदाज आला आहे, त्यामुळेच त्यांना हार दिसत आहे. आम्ही गेली काही वर्ष जे काम केले त्याचे फळ आम्हाला मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई - भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे ठाणे आणि इतर ठिकाणचे गुंड ईशान्य मुंबई मतदार संघात आणत आहेत. त्यामुळे भाजप ही निवडणूक गुंडांच्या सहाय्याने लढवत आहे, असा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी केला.

संजय दिना पाटील

ईशान्य मुंबई मतदार संघातील आघाडीचे उमेदवार पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मुलुंड येथील निवडणूक कार्यालयात भरला. त्यापूर्वी त्यांनी भाजपचा गड असलेल्या मुलुंडमध्ये शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, भाजप लोकांचे स्वागत गुंडांकडून करत आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांच्या सोबत फिरायला गुंड असतात. आमच्यासोबत कोण दिसतील त्यांना हे गुंड धमक्या देतात, असा आरोप केला.

पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी हे सर्व लोक स्वतःहून आलेले आहेत. तुमच्याप्रमाणे भाड्यावर माणसे आणली नाहीत, असा टोला भाजपला लगावला.

निवडणूक ही लढाई असते. लढाई छोटी किंवा मोठी नसते. ईशान्य मुंबईमधील निवडणुकीत मला कोणाचेही आव्हान दिसत नाही. भाजपने जे खोटे वादे केले आहेत. त्याचा लोकांना अंदाज आला आहे, त्यामुळेच त्यांना हार दिसत आहे. आम्ही गेली काही वर्ष जे काम केले त्याचे फळ आम्हाला मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Intro:मुंबई -
भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण हे ठाणे आणि इतर ठिकाणचे गुंड ईशान्य मुंबई मतदार संघात आणत आहेत. आमच्या सोबर दिसतील त्यांना हे गुंड दम देत आहेत. भाजपाही ही निवडणूक गुंडांच्या सहाय्याने लढवत आहे असा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजय दिना पाटील यांनी केला आहे. Body:ईशान्य मुंबई मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मुलुंड येथील निवडणूक कार्यालयात भरला. त्यापूर्वी त्यांनी भाजपाचा गड असलेल्या मुलुंडमध्ये शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी बोलताना भाजप लोकांचे स्वागत गुंडांकडून करत आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये आणि फिरायला गुंड असतात. आमच्यासोबत कोणी दिसतील त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे पाटील म्हणाले.

भाजपाने आपल्या रॅलीमध्ये भाड्यावर माणसे आणली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आज अर्ज भरताना रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. स्वतःहून लोक आलेले आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला. निवडणूक हि लढाई असते. लढाई छोटी किंवा मोठी नसते. ईशान्य मुंबईमधील निवडणूकीत आव्हान असे काही दिसत नाही. भाजपाला विद्यमान खासदाराला बाजूला करून एका नगरसेवकाला आणायला लागले आहे. भाजपाने जे खोटे वादे केले आहेत त्याचा त्यांना अंदाज आला आहे, त्यांना त्यांची हार दिसत आहे. आम्ही गेले काही वर्ष जे काम केले त्याचे फळ आम्हाला मिळणार आहे असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

सोबत - संजय दिना पाटील यांची बाईट Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.