ETV Bharat / city

'ईडी'च्या प्रेमप्रकरणातून पक्षांतर वाढले - शरद पवार

author img

By

Published : Oct 3, 2019, 7:09 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ज्यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून लोकांपुढे जाण्यासाठी काहीही मुद्दे नसतात तेव्हा असे धार्मिक मुद्दे उपस्थित करून भावनिक आवाहन सत्ताधाऱयांकडून केले जात असल्याचे पवार म्हणाले. काश्मीर आणि राम मंदिराचा मुद्दा हा विधानसभेच्या निवडणुकीचे मुद्दे असू शकत नाही. हे मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळचे असल्याचे ते म्हणाले.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

ठाणे - ईडीच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. हा केवळ माझा एकट्याचा प्रश्न नसून विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी 'ईडी'सारख्या यंत्रणांचा वापर करण्यात येत असून ईडीच्या या प्रेमप्रकरणांनंतर लोकांचा प्रतिसाद वाढला असून यावेळी परिवर्तन होणार, असा विश्वास शरद पवार यांनी ठाण्यात व्यक्त केला आहे. राजकारणात कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार असून मतदार मात्र त्यांचा योग्य अधिकार बजावतील, असा टोला देखील पवारांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या गयारामांना लगावला आहे.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागत - छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ज्यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून लोकांपुढे जाण्यासाठी काहीही मुद्दे नसतात तेव्हा असे धार्मिक मुद्दे उपस्थित करून भावनिक आवाहन सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचे पवार म्हणाले. काश्मीर आणि राम मंदिराचा मुद्दा हा विधानसभेच्या निवडणुकीचे मुद्दे असू शकत नाही. हे मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळचे असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - ठाकरे कुटुंबाने मराठी माणसाला काय दिले- अॅड. सुरेश माने

राज्यात बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मात्र, त्यावर हे सरकार बोलायला तयार नसल्याचेही पवार म्हणाले. सत्तेचा गैरवावर करून ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जात असून हे आशा प्रकारे भूमिका घेणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले. यात ईडीला मी दोष देणार नाही, ईडीला ज्या 'वरून' सूचना आल्या होत्या त्याचे त्यांनी पालन केले. यामागे कोणाचा दबाव आहे हे देखील पाहावे लागेल, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन

अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना पवार कुटुंबीय कोणत्याही प्रकारे हवालदिल नव्हते, असे सांगून माझ्यावरील लावण्यात आलेल्या आरोपांमुळे ते भावूक झाले होते. मात्र, हा फक्त त्यांच्यापुरता प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गयारामांना मतदार धडा शिकवतील -

राजकारणात कोणी कुठे जायचे हे त्या त्या लोकांना अधिकार असतो. मात्र, मतदार फार सुज्ञ असतात, ते त्यांचा अधिकार योग्य पद्धतीने बजावतील असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

भाजपचे लोक संपर्कात-

भाजपने मंत्री विनोद तावडे, एकनाथ खडसे, तसेच बावनकुळे, नवी मुंबईचे विजय नाहटा यांना अजूनही तिकीट मिळाले नसल्याचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी विचारल्यानंतर हे सर्व त्या त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश नाईक यांनी सन्मान गमावला-

भाजपमध्ये योग्य सन्मान मिळणार नाही हे माहीत असताना ते भाजपमध्ये गेले .त्यामुळे त्यांना आता हे सर्व भोगावेच लागेल, असा टोला देखील पवार यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे

महाराष्ट्रात परिवर्तनाचा मूड -

महाराष्ट्रातील 80 % तरुण मतदारांना बदल हवा आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे केलेल्या दौऱ्यात महाराष्ट्रात परिवर्तनाचा मूड असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

ठाणे - ईडीच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. हा केवळ माझा एकट्याचा प्रश्न नसून विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी 'ईडी'सारख्या यंत्रणांचा वापर करण्यात येत असून ईडीच्या या प्रेमप्रकरणांनंतर लोकांचा प्रतिसाद वाढला असून यावेळी परिवर्तन होणार, असा विश्वास शरद पवार यांनी ठाण्यात व्यक्त केला आहे. राजकारणात कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार असून मतदार मात्र त्यांचा योग्य अधिकार बजावतील, असा टोला देखील पवारांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या गयारामांना लगावला आहे.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागत - छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ज्यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून लोकांपुढे जाण्यासाठी काहीही मुद्दे नसतात तेव्हा असे धार्मिक मुद्दे उपस्थित करून भावनिक आवाहन सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचे पवार म्हणाले. काश्मीर आणि राम मंदिराचा मुद्दा हा विधानसभेच्या निवडणुकीचे मुद्दे असू शकत नाही. हे मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळचे असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - ठाकरे कुटुंबाने मराठी माणसाला काय दिले- अॅड. सुरेश माने

राज्यात बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मात्र, त्यावर हे सरकार बोलायला तयार नसल्याचेही पवार म्हणाले. सत्तेचा गैरवावर करून ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जात असून हे आशा प्रकारे भूमिका घेणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले. यात ईडीला मी दोष देणार नाही, ईडीला ज्या 'वरून' सूचना आल्या होत्या त्याचे त्यांनी पालन केले. यामागे कोणाचा दबाव आहे हे देखील पाहावे लागेल, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन

अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना पवार कुटुंबीय कोणत्याही प्रकारे हवालदिल नव्हते, असे सांगून माझ्यावरील लावण्यात आलेल्या आरोपांमुळे ते भावूक झाले होते. मात्र, हा फक्त त्यांच्यापुरता प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गयारामांना मतदार धडा शिकवतील -

राजकारणात कोणी कुठे जायचे हे त्या त्या लोकांना अधिकार असतो. मात्र, मतदार फार सुज्ञ असतात, ते त्यांचा अधिकार योग्य पद्धतीने बजावतील असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

भाजपचे लोक संपर्कात-

भाजपने मंत्री विनोद तावडे, एकनाथ खडसे, तसेच बावनकुळे, नवी मुंबईचे विजय नाहटा यांना अजूनही तिकीट मिळाले नसल्याचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी विचारल्यानंतर हे सर्व त्या त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश नाईक यांनी सन्मान गमावला-

भाजपमध्ये योग्य सन्मान मिळणार नाही हे माहीत असताना ते भाजपमध्ये गेले .त्यामुळे त्यांना आता हे सर्व भोगावेच लागेल, असा टोला देखील पवार यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे

महाराष्ट्रात परिवर्तनाचा मूड -

महाराष्ट्रातील 80 % तरुण मतदारांना बदल हवा आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे केलेल्या दौऱ्यात महाराष्ट्रात परिवर्तनाचा मूड असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Intro:ईडीच्या प्रेमप्रकरणातून पक्षांतर वाढले शरद पवारBody: ईडीच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.हा केवळ माझा एकट्याचा प्रश्न नसून विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करण्यात येत असून ईडीच्या या प्रेमप्रकरणांनंतर लोकांचा प्रतिसाद वाढला असून यावेळी परिवर्तन होणार असा विश्वास शरद पवार यांनी ठाण्यात व्यक्त केला आहे.राजकारणात कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार असून मतदार मात्र त्यांचा योग्य अधिकार बाजावतील असा टोला देखील पवारांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या गयारामाना लगावला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.ज्यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून लोकांपुढे जाण्यासाठी काहीही मुद्दे नसतात तेव्हा असे धार्मिक मुद्दे उपस्थित करून भावनिक आवाहन सत्ताधार्यांनाकडून केले जात असल्याचे पवार म्हणाले.काश्मीर आणि राममंदिराचा मुद्दा हा विधानसभेच्या निवडणुकीचे मुद्दे असू शकत नाही,हे मुद्दे पार्लमेंटच्या निवडणुकीच्या वेळीचे असल्याचे ते म्हणाले.राज्यात बेरोजगारी आहे,शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मात्र त्यावर हे सरकार बोलायला तयार नसल्याचेही पवार म्हणाले.सत्तेचा गैरवावर करून ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जात असून हे आशा प्रकारे भूमिका घेणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले. यात ईडीला मी दोष देणार नाही,ईडीला ज्या वरून सूचना आल्या होत्या त्याचे त्यानी पालन केले असून यामागे कोणाचा दबाव आहे हे देखील पाहावे लागेल असे पवार यांनी सांगितले.
अजितदादा यांच्या संदर्भात बोलताना पवार कुटुंबीय कोणत्याही प्रकारे हवालदिल नव्हते असे सांगून माझ्यावरील लावण्यातआलेल्या आरोपांमुळे ते भावूक झाले होते मात्र हा फक्त त्यांच्यापुरता प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

गायरामाना मतदार धडा शिकवतील -
राजकारणात कोणी कुठे जायचे हे त्या त्या लोकांना अधिकार असतो मात्र मतदार फार सुज्ञ असतात ,ते त्यांचा अधिकार योग्य पद्धतीने बाजावतील असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

भाजपचे लोक संपर्कात-
भाजपने मंत्री विनोद तावडे, एकनाथ खडसे,तसेच बावनकुळे नवी मुंबईचे विजय नाहटा यांना अजूनही तिकीट मिळाले नसल्याचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी विचारल्यानंतर हे सर्व त्या त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश नाईक यांनी सन्मान गमावला-
भाजपमध्ये योग्य सन्मान मिळणार नाही हे माहीत असताना ते भाजपमध्ये गेले .त्यामुळे त्यांना आता हे सर्व भोगावेच लागेल असा टोला देखील पवार यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे
.byte शरद पवार अध्यक्ष राष्ट्रवादी


महाराष्ट्रात परिवर्तनाचा मुड-शरद पवार
ठाणे (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील 80 % तरुण मतदारांना बदल हवा आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे केलेल्या दौर्‍यात महाराष्ट्रात परिवर्तनाचा मूड असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ जितेंद्र आव्हाड यांचा कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी आ. जितेंद्र आव्हाड, साम्यवादी विचारवंत कन्हैया कुमार, आंबेडकरी विचारवंत सुषमा अंधारे, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजिब मुल्ला, प्रदेश सचिव तथा ठाणे शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुहास देसाई, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, नगरसेवक मुकूंद केणी, प्रमिला केणी, मनिषा साळवी, शानू पठाण, शमीम खानआदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शरद पवार यांचा उल्लेख आ. जितेंद्र आव्हाड यांनी 80 वर्षांचे तरुण असा केला. त्यावर मनमुराद हसत पवार यांनी दाद दिली. सलग 3 तास उन्हामध्ये प्रचार रॅली करुन आल्यानंतरही शरद पवार यांनी प्रचंड उत्साहामध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
शरद पवार म्हणाले की, माझ्या पन्नास वर्षाच्या सामाजिक जीवनात तरुणवर्गाचा इतका उदंड प्रतिसाद मी पहिल्यांदाच अनुभवतोय. महाराष्ट्रात काढलेल्या दौर्‍याप्रसंगी 80 % तरुण मतदार विद्यमान सरकारच्या कारभारावर नाराज आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या सर्व भागातील शेतकरी, महिला, कामगार हे त्रस्त या सरकारच्या नाराज असल्याचे दिसून आले. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना अडचणीत आणण्याची नीती विद्यमान सत्ताधार्‍यांची आहे. भाजपकडून ईडी, सीबीआयचा केल्या जाणार्‍या गैरवापराचे चित्र जनतेच्या नजरेसमोर आहे. ही नाराजी मतदानातून दिसून येणार आहे.
आपला आकड्यांवर विश्वास नाही पण महाराष्ट्रात परिवर्तनाचा मुड असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले की, भाजपमुळे भविष्य नाही असे वाटणारे सत्ताधारी पक्षाचे सगळेच संपर्कात आहेत. बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी निवडणूक आयोगाने नाकारल्याने आता इव्हिएम विषयी चर्चा करण्यात अर्थ नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. ईडी, सीबीआयद्वारे विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. यामुळे लोकशाही अधिकारावर गदा आणली जातेय. महाराष्ट्रात निवडणूक होत असल्याने इथल्या जनतेच्या समस्यांना उत्तर देण्याची ताकद नसल्याने मंदिर, कश्मीर सारखे भावनिक मुद्दे सत्ताधारी पक्ष पुढे करीत आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

समतामूलक विचारांसाठी लढणार्‍या जितेंद्र आव्हाडांचा प्रचार करणार - कन्हैया कुमार
महाराष्ट्रामध्ये प्रतिगामी शक्तींकडून लढणार्‍या हातांची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवारांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा हे त्याचे उदाहरण आहे. ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून दबाव निर्माण केला जात असतानाच आ. जितेंद्र आव्हाड हे आपल्या समतामूलक विचारधारेवर ठाम आहेत. समतेसाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी ते लढत आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या प्रचारासाठी ठाण्यात आलो आहे. अन् या पुढेही त्यांचा प्रचार करणार आहे, असे कन्हैय्या कुमार यांनी सांगितले.
या देशात रामाच्या नावावर नथुरामाचे सरकार चालवणारे लोक सत्तेवर आले आहेत. आज या देशात अनेक मूलभूत समस्या जिवंत आहेत. जोरदार पावसात ठाणे- मुंबईत एवढे पाणी जमा होते की त्यामध्ये मत्स्यपालन करता येऊ शकेल; ठाणे शहरातील कारखाने बंद होत आहेत. लोकांचे रोजगार बंद पडत आहेत. अशा स्थितीमध्ये सत्ताधारी वर्ग भावनिक मुद्यांचे राजकारण करीत आहेत. पण, आता त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यातच येणार आहे, असेही कन्हेैय्याकुमार यांनी सांगितले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.