ETV Bharat / city

कोरोनाकाळात बेरोजगारांना इम्पोर्ट-एक्सपोर्टचा आधार; उद्यमी महाराष्ट्राने घडवले अनेक मराठी निर्यातदार - ओकार माळी

मराठी माणसाने व्यवसाय करावा या उद्देशाने डॉ. ओंकार हरी माळी यांनी गेल्यावर्षी ही चळवळ उभी केली. आज या चळवळीशी महाराष्ट्रातील आणि परदेशातील मराठी माणसे जोडली गेली आहेत. कोरोना काळात अनेक उद्योगधंदे बंद पडलेले असताना इम्पोर्ट-एक्सपोर्ट हा व्यवसाय सुरू होता. इम्पोर्ट-एक्सपोर्ट हा असा व्यवसाय आहे, की ज्याला मरण नाही, असे डॉ. ओंकार हरी माळी यांनी सांगितले.

उद्यमी महाराष्ट्राने घडवले अनेक मराठी निर्यातदार
उद्यमी महाराष्ट्राने घडवले अनेक मराठी निर्यातदार
author img

By

Published : Jun 9, 2021, 9:57 AM IST

Updated : Jun 9, 2021, 11:05 AM IST


ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, त्यांचा अनेकांना फटका बसला, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. बेरोजगार झाल्यानंतर घरावर आर्थिक संकट कोसळले, त्यामुळे बेरोजागर झालेले नागरिक नैराश्येच्या गर्तेत अडकू लागले. त्यामुळे पुढे काय हा प्रश्न अनेकांना सतावू लागला. तसेच या काळात दुसरी नोकरी मिळणे मुश्किल झाले. तर व्यवसाय करायला भांडवलाची मोठी अडचण अशी समस्याच्या गर्तेत अनेक तरुण अडकले होते. मात्र, अशाच बेरोजगार मराठी मुलांना उद्यमी महाराष्ट्रने तारले आहे. ठाण्यातील एका युवकाच्या संकल्पनेतून उद्यमी महाराष्ट्रने आयात निर्यातीच्या व्यवसायाच्या माध्यामतून अनेकांचा हाताला काम दिले आहे.

उद्यमी महाराष्ट्राने घडवले अनेक मराठी निर्यातदार
मराठी माणसाने मराठी माणसासाठी सुरू केलेली चळवळ म्हणजे 'उद्यमी महाराष्ट्र' होय. मराठी माणसाने व्यवसाय करावा या उद्देशाने डॉ. ओंकार हरी माळी यांनी गेल्यावर्षी ही चळवळ उभी केली. आज या चळवळीशी महाराष्ट्रातील आणि परदेशातील मराठी माणसे जोडली गेली आहेत. कोरोना काळात अनेक उद्योगधंदे बंद पडलेले असताना इम्पोर्ट-एक्सपोर्ट हा व्यवसाय सुरू होता. इम्पोर्ट-एक्सपोर्ट हा असा व्यवसाय आहे, की ज्याला मरण नाही, असे डॉ. ओंकार हरी माळी यांनी सांगितले. ऐन लॉकडाऊनच्या काळात ही चळवळ उभी राहिली ती बेरोजगार झालेल्या मराठी मांणसामधील हरवलेली जिद्द आणि आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी. इम्पोर्ट-एक्सपोर्ट या व्यवसायात हाताच्या बोटावर मोजण्याइतके मराठी माणसे आहेत. त्यामुळे या काळात त्यांनी एकत्र येऊन बेरोजगारीकडून रोजगारीकडे वळण्याचा पर्याय उभा केला. यासाठी त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट या विषयावर प्रशिक्षण सुरू केले. 30 हजार लोकांनी सहभाग घेतला उद्यमी महाराष्ट्रमधून आतापर्यंत आठ हजार मराठी माणसांनी प्रशिक्षण घेतले आहे. तर वेबिनारच्या माध्यमातून तब्बल ३० हजार लोकांपर्यंत या व्यवसायबद्दल जागृती केली आहे. या वेबिनारमधून प्रेरित होऊन ७० मराठी माणसांनी आपला माल निर्यात करून ते निर्यातदार झाले आहे. कोरोनाच्या कठीण काळात त्यांना या व्यवसायाने आणि डॉ. माळी यांच्या मार्गदर्शनामुळे आर्थिक पाठिंबा मिळाला आहे. यातून सरकारला अडीच ते तीन कोटींचा महसूल देखील मिळाला असल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले.नैराश्य टाळण्याचा प्रयत्ननैराश्येच्या जाळ्यात अडकून बेरोजगार मराठी मुलांनी चुकीचे पाऊल उचलू नये, म्हणून डॉ. ओंकार हरी माळी हे उद्यमी महाराष्ट्रच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, त्यांचा अनेकांना फटका बसला, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. बेरोजगार झाल्यानंतर घरावर आर्थिक संकट कोसळले, त्यामुळे बेरोजागर झालेले नागरिक नैराश्येच्या गर्तेत अडकू लागले. त्यामुळे पुढे काय हा प्रश्न अनेकांना सतावू लागला. तसेच या काळात दुसरी नोकरी मिळणे मुश्किल झाले. तर व्यवसाय करायला भांडवलाची मोठी अडचण अशी समस्याच्या गर्तेत अनेक तरुण अडकले होते. मात्र, अशाच बेरोजगार मराठी मुलांना उद्यमी महाराष्ट्रने तारले आहे. ठाण्यातील एका युवकाच्या संकल्पनेतून उद्यमी महाराष्ट्रने आयात निर्यातीच्या व्यवसायाच्या माध्यामतून अनेकांचा हाताला काम दिले आहे.

उद्यमी महाराष्ट्राने घडवले अनेक मराठी निर्यातदार
मराठी माणसाने मराठी माणसासाठी सुरू केलेली चळवळ म्हणजे 'उद्यमी महाराष्ट्र' होय. मराठी माणसाने व्यवसाय करावा या उद्देशाने डॉ. ओंकार हरी माळी यांनी गेल्यावर्षी ही चळवळ उभी केली. आज या चळवळीशी महाराष्ट्रातील आणि परदेशातील मराठी माणसे जोडली गेली आहेत. कोरोना काळात अनेक उद्योगधंदे बंद पडलेले असताना इम्पोर्ट-एक्सपोर्ट हा व्यवसाय सुरू होता. इम्पोर्ट-एक्सपोर्ट हा असा व्यवसाय आहे, की ज्याला मरण नाही, असे डॉ. ओंकार हरी माळी यांनी सांगितले. ऐन लॉकडाऊनच्या काळात ही चळवळ उभी राहिली ती बेरोजगार झालेल्या मराठी मांणसामधील हरवलेली जिद्द आणि आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी. इम्पोर्ट-एक्सपोर्ट या व्यवसायात हाताच्या बोटावर मोजण्याइतके मराठी माणसे आहेत. त्यामुळे या काळात त्यांनी एकत्र येऊन बेरोजगारीकडून रोजगारीकडे वळण्याचा पर्याय उभा केला. यासाठी त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट या विषयावर प्रशिक्षण सुरू केले. 30 हजार लोकांनी सहभाग घेतला उद्यमी महाराष्ट्रमधून आतापर्यंत आठ हजार मराठी माणसांनी प्रशिक्षण घेतले आहे. तर वेबिनारच्या माध्यमातून तब्बल ३० हजार लोकांपर्यंत या व्यवसायबद्दल जागृती केली आहे. या वेबिनारमधून प्रेरित होऊन ७० मराठी माणसांनी आपला माल निर्यात करून ते निर्यातदार झाले आहे. कोरोनाच्या कठीण काळात त्यांना या व्यवसायाने आणि डॉ. माळी यांच्या मार्गदर्शनामुळे आर्थिक पाठिंबा मिळाला आहे. यातून सरकारला अडीच ते तीन कोटींचा महसूल देखील मिळाला असल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले.नैराश्य टाळण्याचा प्रयत्ननैराश्येच्या जाळ्यात अडकून बेरोजगार मराठी मुलांनी चुकीचे पाऊल उचलू नये, म्हणून डॉ. ओंकार हरी माळी हे उद्यमी महाराष्ट्रच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Last Updated : Jun 9, 2021, 11:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.