ETV Bharat / city

Uday Samant : काश्मिरी पंडितांच्या मुलांवर शैक्षणिक अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ - मंत्री उदय सामंत

author img

By

Published : Jun 5, 2022, 7:41 PM IST

देशात आताचे वातावरण बघता ज्या पद्धतीने काश्मिरी पंडित ( Kashmiri Pandits education Uday Samant reaction ) बाहेर पडत आहेत आणि इतर ठिकाणी जात आहेत, त्यांना जर महाराष्ट्रात यायचे असेल आणि त्यांच्या मुलांना जर शिक्षण ( Kashmiri Pandits children education ) घ्यायचे असेल तर महाविकास आघाडी सरकारकडून त्यांना शिक्षणासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Kashmiri Pandits education uday samant
उदय सामंत

पुणे - दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने एक निर्णय घेतला होता की, काश्मिरी पंडित जर विस्थापित असतील आणि त्यांच्या मुलांना जर महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश पाहिजे असेल तर ते प्राधान्याने देण्यात येईल. त्याची अमलबजावणी देखील आम्ही केली आहे. देशात आताचे वातावरण बघता ज्या पद्धतीने काश्मिरी पंडित ( Kashmiri Pandits education Uday Samant reaction ) बाहेर पडत आहेत आणि इतर ठिकाणी जात आहेत, त्यांना जर महाराष्ट्रात यायचे असेल आणि त्यांच्या मुलांना जर शिक्षण ( Kashmiri Pandits children education ) घ्यायचे असेल तर महाविकास आघाडी सरकारकडून त्यांना शिक्षणासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत

हेही वाचा - Pune metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते बुधवार पेठ अंडरग्राऊंड मार्गचं काम पूर्ण; पाहा VIDEO

आम्ही प्रसिद्धी करत नाही - काश्मिरी पंडितांच्या बाबतीत हा जो निर्णय घेण्यात आला आहे तो आजच घेतलेला नाही, आम्ही प्रसिद्धी करत नाही. आम्ही बोंबाबोंब करत नाही. म्हणून आम्ही घेतलेला निर्णय कदाचित माणसांपर्यंत पोहचत नसेल. काश्मिरी पंडितांचा निर्णय हा आता सुरू झाला आहे, त्याचे प्रयोजन आम्ही दोन वर्षांपूर्वी करून ठेवले आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आता आला आहे. त्यांच्या देखील शिक्षणाचा प्रश्न उपस्थित राहणार आहे, त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ, असे देखील यावेळी सामंत म्हणाले.

विद्यार्थी कोटा - कोटा कुठे वाढवावा लागला तर वाढवू, कुठे समायोजन करायचे असल्यास ते करू, परंतु आपल्या संर्वांची तीच भावना असेल की ते सांगत असतील आम्हाला पुणे विद्यापीठात शिक्षण घ्यायचे आहे, रत्नागिरीत शिकायचे आहे त्याला आपण कुठे तरी न्याय दिला पाहिजे. जो काही फॉर्म्युला बनवायचा आहे तो आम्ही नक्की बनवू, असे देखील यावेळी सामंत म्हणाले.

हेही वाचा - Saswad double murder case : सासवड दुहेरी हत्याकांडातील तपास अधिकारी बदलला, पोलिसांच्या भूमिकेवर होता संशय

पुणे - दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने एक निर्णय घेतला होता की, काश्मिरी पंडित जर विस्थापित असतील आणि त्यांच्या मुलांना जर महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश पाहिजे असेल तर ते प्राधान्याने देण्यात येईल. त्याची अमलबजावणी देखील आम्ही केली आहे. देशात आताचे वातावरण बघता ज्या पद्धतीने काश्मिरी पंडित ( Kashmiri Pandits education Uday Samant reaction ) बाहेर पडत आहेत आणि इतर ठिकाणी जात आहेत, त्यांना जर महाराष्ट्रात यायचे असेल आणि त्यांच्या मुलांना जर शिक्षण ( Kashmiri Pandits children education ) घ्यायचे असेल तर महाविकास आघाडी सरकारकडून त्यांना शिक्षणासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत

हेही वाचा - Pune metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते बुधवार पेठ अंडरग्राऊंड मार्गचं काम पूर्ण; पाहा VIDEO

आम्ही प्रसिद्धी करत नाही - काश्मिरी पंडितांच्या बाबतीत हा जो निर्णय घेण्यात आला आहे तो आजच घेतलेला नाही, आम्ही प्रसिद्धी करत नाही. आम्ही बोंबाबोंब करत नाही. म्हणून आम्ही घेतलेला निर्णय कदाचित माणसांपर्यंत पोहचत नसेल. काश्मिरी पंडितांचा निर्णय हा आता सुरू झाला आहे, त्याचे प्रयोजन आम्ही दोन वर्षांपूर्वी करून ठेवले आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आता आला आहे. त्यांच्या देखील शिक्षणाचा प्रश्न उपस्थित राहणार आहे, त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ, असे देखील यावेळी सामंत म्हणाले.

विद्यार्थी कोटा - कोटा कुठे वाढवावा लागला तर वाढवू, कुठे समायोजन करायचे असल्यास ते करू, परंतु आपल्या संर्वांची तीच भावना असेल की ते सांगत असतील आम्हाला पुणे विद्यापीठात शिक्षण घ्यायचे आहे, रत्नागिरीत शिकायचे आहे त्याला आपण कुठे तरी न्याय दिला पाहिजे. जो काही फॉर्म्युला बनवायचा आहे तो आम्ही नक्की बनवू, असे देखील यावेळी सामंत म्हणाले.

हेही वाचा - Saswad double murder case : सासवड दुहेरी हत्याकांडातील तपास अधिकारी बदलला, पोलिसांच्या भूमिकेवर होता संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.