ETV Bharat / city

पणजी शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली वाहून

पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्याला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कुर्टी खांडेपार येथे वाहून गेली. ज्या ठिकाणी ही वाहिनी फुटली तेथे मातीचा भराव घालण्यात आला होता. काही दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने ही माती खचली. त्यामुळे ही घटना घडली.

author img

By

Published : Aug 15, 2019, 9:26 PM IST

जलवाहिनी गेली वाहून

पणजी - गोव्याची राजधानी पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्याला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी सकाळी कुर्टी खांडेपार येथे वाहून गेली. त्यामुळे पाणी वाया जाण्याबरोबर येथील रस्ताही वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली वाहून
पणजी शहराला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी आहे. ज्या ठिकाणी ही वाहिनी फुटली तेथे मातीचा भराव घालण्यात आला होता. त्यात ही जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु, योग्यप्रकारची काळजी घेण्यात आली नाही. शिवाय या परिसरातील झाडे रस्ता रुंदीकरणसाठी तोडण्यात आली. तसेच रस्त्याच्यामधून पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिकाही ठेवण्यात आली. मागील आठवडाभरापासून या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे हा मातीचा भराव कमकुवत बनल्याने वाहून गेला. त्याबरोबर खांडेपार येथील जलवाहिनीही वाहून गेली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. शिवाय या कामासाठी खर्च करण्यात आलेले लाखो रुपयेही पाण्यात गेले. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

घटनेविषयी स्थानिक ग्रामस्थ संदीप पारकर म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाच्या माध्यमातून याची कल्पना देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज ही घटना घडली आहे. जेथे जलवाहिनी फुटली त्या भागात माती आहे. माती वाहून गेल्यामुळे खांडेपारच्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

पणजी - गोव्याची राजधानी पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्याला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी सकाळी कुर्टी खांडेपार येथे वाहून गेली. त्यामुळे पाणी वाया जाण्याबरोबर येथील रस्ताही वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली वाहून
पणजी शहराला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी आहे. ज्या ठिकाणी ही वाहिनी फुटली तेथे मातीचा भराव घालण्यात आला होता. त्यात ही जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु, योग्यप्रकारची काळजी घेण्यात आली नाही. शिवाय या परिसरातील झाडे रस्ता रुंदीकरणसाठी तोडण्यात आली. तसेच रस्त्याच्यामधून पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिकाही ठेवण्यात आली. मागील आठवडाभरापासून या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे हा मातीचा भराव कमकुवत बनल्याने वाहून गेला. त्याबरोबर खांडेपार येथील जलवाहिनीही वाहून गेली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. शिवाय या कामासाठी खर्च करण्यात आलेले लाखो रुपयेही पाण्यात गेले. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

घटनेविषयी स्थानिक ग्रामस्थ संदीप पारकर म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाच्या माध्यमातून याची कल्पना देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज ही घटना घडली आहे. जेथे जलवाहिनी फुटली त्या भागात माती आहे. माती वाहून गेल्यामुळे खांडेपारच्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Intro:पणजी : गोव्याची राजधानी पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्याला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज सकाळी कुर्टी_खांडेपार येथे वाहून गेली. त्यामुळे पाणी वाया जाण्याबरोबर येथील रस्ताही वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. Body:पणजी शहराला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी फुटली आहे. दर्या ठिकाणी ही वाहिनी फुटली तेथे मातीचा भराव घालण्यात आला होता. त्यातच ही जलवाहिनी टाकण्यात आली होती. त्यासाठी योग्यप्रकारची काळजी घेण्यात आली नव्हती. तसेच या परिसरातील झाडे रस्ता रुंदीकरण करताना तोडून अथवा उखडून टाकण्यात आली. तय माती पकडून ठेवण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. शिवाय रस्त्याच्या मधूनच पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिका ठेवली होती. मागील आठवडाभरापासून या परिसरातील जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे हा मातीचा भराव कमकुवत बनून आज सकाळी वाहून गेला. त्याबरोबर खांडेपार येथून पणजीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी वाहून गेली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. शिवाय या कामासाठी खर्च करण्यात आलेले लाखो रूपये पाण्यात गेले.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
याविषयी बोलताना स्थानिक ग्रामस्थ संदीप पारकर म्हणाले, जेथे ही जलवाहिनी फुटली यांचा अंदाज आल्याने स्थानिकांनी सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाच्या माध्यमातून यांची कल्पना देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ज्यामुळे आज ही दूर्घटना घडली आहे. जेथे जलवाहिनी फुटली तो भागात मातीच्या सरावाचा आहे. तर विरूद्ध दिशेने संरक्षक भिंत उभारली आहे. आज माती वाहून गेल्यामुळे खांडेपारच्या शेतकऱ्यांना त्रासदायक ठरले आहे. कारण येथील लोकांसाठी या परिसरातील शेती हेच एकमेव उपजिवीकेचे साधन आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.