ETV Bharat / city

संधी द्या..! दर सहा महिन्याला प्रत्येक प्रभागात बैठक घेऊ; गोव्यात 'आप'चे आश्वासन

मागील पंचवीस वर्षे पणजीवासियांना तिच ती आश्वासने दिली जात आहेत, असे सांगून नाईक म्हणाले, भाजप आणि काँग्रेस सारखेच वागत आहेत. आम्हाला आजारी पणजी शहराचा विकास करायचा आहे.

author img

By

Published : May 13, 2019, 8:00 PM IST

'आप'ला संधी दिली तर दर सहा महिन्यांत एक प्रभाग बैठक

पणजी - मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम आदमी पार्टीने प्रतिज्ञापत्रा पाठोपाठ आज जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये दर सहा महिन्याला प्रभागात बैठकीचे आयोजनक करण्याचे आश्वासन आपने पत्रकार परिषदेत दिले आहे. यावेळी उमेदवार वाल्मिकी नाईक, संयोजक एल्वीस गोम्स, सरचिटणीस प्रदीप पाटगावकर उपस्थित होते.

'आप'ला संधी दिली तर दर सहा महिन्यांत एक प्रभाग बैठक

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी बोलताना नाईक म्हणाले, पणजी हे आर्थिक, प्रशासकीय, रोजगार निर्मिती यामध्ये मागे राहिलेले शहर आहे. त्यामुळे पणजीचा सर्वांग, सुंदर विकास करण्याबरोबरच शहराचे नैसर्गिक वारसा जतन केला पाहिजे. येथे आजही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विकास आणि रोजगाराकरीता पणजीतील मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तर दर सहा महिन्यांनी प्रत्येक प्रभागात बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मागील पंचवीस वर्षे पणजीवासियांना तिच ती आश्वासने दिली जात आहेत, असे सांगून नाईक म्हणाले, भाजप आणि काँग्रेस सारखेच वागत आहेत. आम्हाला आजारी पणजी शहराचा विकास करायचा आहे.

आपचे गोवा संयोजक एल्वीस गोम्स म्हणाले, भाजप आणि काँग्रेसने गोव्याचे राजकारण धोक्यात आणले आहे. पणजीवासियांना याचा फार मोठा धोका आहे. हे दोन्ही पक्ष गोव्यातील युवकांना भवितव्य देऊ शकत नाहीत. ते केवळ आपले अस्तित्व टीकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे सरळ उदाहरण म्हणजे पणजी मतदारसंघात भाजपने उमेदवारी नकारलेल्यास काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. भाजपनेदेखील शिरोडा मतदारसंघात तेच केले आहे. लोकांना उत्तरदायी असलेले राज्य देण्यावर 'आप'चा भर आहे.

पणजी - मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम आदमी पार्टीने प्रतिज्ञापत्रा पाठोपाठ आज जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये दर सहा महिन्याला प्रभागात बैठकीचे आयोजनक करण्याचे आश्वासन आपने पत्रकार परिषदेत दिले आहे. यावेळी उमेदवार वाल्मिकी नाईक, संयोजक एल्वीस गोम्स, सरचिटणीस प्रदीप पाटगावकर उपस्थित होते.

'आप'ला संधी दिली तर दर सहा महिन्यांत एक प्रभाग बैठक

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी बोलताना नाईक म्हणाले, पणजी हे आर्थिक, प्रशासकीय, रोजगार निर्मिती यामध्ये मागे राहिलेले शहर आहे. त्यामुळे पणजीचा सर्वांग, सुंदर विकास करण्याबरोबरच शहराचे नैसर्गिक वारसा जतन केला पाहिजे. येथे आजही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विकास आणि रोजगाराकरीता पणजीतील मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तर दर सहा महिन्यांनी प्रत्येक प्रभागात बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मागील पंचवीस वर्षे पणजीवासियांना तिच ती आश्वासने दिली जात आहेत, असे सांगून नाईक म्हणाले, भाजप आणि काँग्रेस सारखेच वागत आहेत. आम्हाला आजारी पणजी शहराचा विकास करायचा आहे.

आपचे गोवा संयोजक एल्वीस गोम्स म्हणाले, भाजप आणि काँग्रेसने गोव्याचे राजकारण धोक्यात आणले आहे. पणजीवासियांना याचा फार मोठा धोका आहे. हे दोन्ही पक्ष गोव्यातील युवकांना भवितव्य देऊ शकत नाहीत. ते केवळ आपले अस्तित्व टीकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे सरळ उदाहरण म्हणजे पणजी मतदारसंघात भाजपने उमेदवारी नकारलेल्यास काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. भाजपनेदेखील शिरोडा मतदारसंघात तेच केले आहे. लोकांना उत्तरदायी असलेले राज्य देण्यावर 'आप'चा भर आहे.

Intro:पणजी : मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यापाठोपाठ आज जाहीरनामा प्रसिद्ध करत दर सहा महिन्यात प्रभागात बैकठीचे आश्वासन दिले. यावेळी उमेदवार वाल्मिकी नाईक, संयोजक एल्वीस गोम्स, सरचिटणीस प्रदीप पाटगावकर उपस्थित होते.



Body:पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
यावेळी बोलताना नाईक म्हणाले, पणजी हे आर्थिक, प्रशासनिक, रोजगार निर्मिती यामध्ये मागे राहिलेले शहर आहे. त्यामुळे पणजीचा सर्वांग, सुंदर विकास करण्याबरोबरच शहराचे नैसर्गिक वारसा जतन केला पाहिजे. येथे आजही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विकास आणि रोजगाराकरीता पणजीतील मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तर दर सहा महिन्यांनी प्रत्येक प्रभागात बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येईल.
मागील पंचवीस वर्षे पणजी वासियांना तिच ती आश्वासने दिली जात आहेत, असे सांगून नाईक म्हणाले, भाजप आणि काँग्रेस सारखेच वागत आहेत. आम्हाला आजारी पणजी शहराचा विकास करावयाचा आहे.
तर आपचे गोवा संयोजक एल्वीस गोम्स म्हणाले, भाजप आणि काँग्रेसने गोव्याचे राजकारण धोक्यात आणले आहे. पणजीवासीयांना याचा फार मोठा धोका आहे. हे दोन्ही पक्ष गोव्यातील युवकांना भवितव्य देऊ शकत नाहीत. ते केवळ आपले अस्तित्व टीकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे सरळ उदाहरण म्हणजे पणजी मतदारसंघात भाजपने उमेदवारी नकारलेल्यास काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर भाजपने शिरोडा मतदारसंघात तेच केले आहे. लोकांना उत्तरदायी असलेले राज्य देण्यावर 'आप'चा भर आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.