ETV Bharat / city

आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी - आयुषमंत्री श्रीपाद नाईक

आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. युवकांनी जंक फूड टाळून आयुर्वेदिक आणि योगाच्या माध्यमातून निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

author img

By

Published : Mar 3, 2019, 7:49 PM IST

आयुषमंत्री श्रीपाद नाईक

पणजी - आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. युवकांनी जंक फूड टाळून आयुर्वेदिक आणि योगाच्या माध्यमातून निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद या संस्थेने दोनापावल येथे २ दिवसीय आयुर्वेद युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नाईक बोलत होते.

अलिकडच्या काळात आपला देश मधूमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, ही चिंतेची बाब आहे. यावर आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व संस्था आणि सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. आपली परंपरागत कुटुंब पद्धती सांभाळून युवकांना योग्य दिशा दिली जाऊ शकते. समाजातील नैराश्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्र कुटुंब पध्दती अतिशय महत्त्वाचा घटक आहे, असे नाईक म्हणाले.

नाईक पुढे म्हणाले, की आयुर्वेद केवळ आरोग्य उपचार प्रणाली नाही, तर ती एक संतुलित जीवनपद्धती आहे. युवकांना आयुर्वेदाच्या माध्यमातून सुदृढ आणि निरोगी जीवनपद्धतीविषयी माहिती देण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. आयुर्वेद युवा महोत्सव आयुष मंत्रालयाच्या २५ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग असून सोमवारी या महोत्सवाची सांगता होणार आहे.

undefined

आयुर्वेद महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. वरूण सहानी, सीसीआरएएस नवी दिल्लीचे उपमहासंचालक डॉ. एस. नारायण, साहाय्यक संचालक डॉ. आदर्श कुमार, डॉ. एस. गायधनी, गोवा सरकारच्या आरोग्य संचालनायाचे संचालक डॉ. संजीव दळवी उपस्थित होते.

पणजी - आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. युवकांनी जंक फूड टाळून आयुर्वेदिक आणि योगाच्या माध्यमातून निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद या संस्थेने दोनापावल येथे २ दिवसीय आयुर्वेद युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नाईक बोलत होते.

अलिकडच्या काळात आपला देश मधूमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, ही चिंतेची बाब आहे. यावर आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व संस्था आणि सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. आपली परंपरागत कुटुंब पद्धती सांभाळून युवकांना योग्य दिशा दिली जाऊ शकते. समाजातील नैराश्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्र कुटुंब पध्दती अतिशय महत्त्वाचा घटक आहे, असे नाईक म्हणाले.

नाईक पुढे म्हणाले, की आयुर्वेद केवळ आरोग्य उपचार प्रणाली नाही, तर ती एक संतुलित जीवनपद्धती आहे. युवकांना आयुर्वेदाच्या माध्यमातून सुदृढ आणि निरोगी जीवनपद्धतीविषयी माहिती देण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. आयुर्वेद युवा महोत्सव आयुष मंत्रालयाच्या २५ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग असून सोमवारी या महोत्सवाची सांगता होणार आहे.

undefined

आयुर्वेद महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. वरूण सहानी, सीसीआरएएस नवी दिल्लीचे उपमहासंचालक डॉ. एस. नारायण, साहाय्यक संचालक डॉ. आदर्श कुमार, डॉ. एस. गायधनी, गोवा सरकारच्या आरोग्य संचालनायाचे संचालक डॉ. संजीव दळवी उपस्थित होते.

Intro:पणजी : आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. युवकांनी जंक फूड टाळून आयुर्वेदिक आणि योगाच्या माध्यमातून निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज दोनापावल येथे केले. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद या संस्थेने राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सभागृहात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या दोन दिवसीय आयुर्वेद युवा महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.


Body:अलिकडच्या काळात आपला देश मधूमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, ही चिंतेची बाब आहे. यावर आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व.संस्था आणि सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. आपली परंपरागत कुटुंबपद्धती सांभाळून युवकांना योग्य दिशा दिली जाऊ शकते. समाजातील नैराश्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्र कुटुंब पध्दती अतिशय महत्त्वाचा घटक आहे, असे ही नाईक म्हणाले.
पुढे बोलताना मंत्री नाईक म्हणाले, आयुर्वेद केवळ आरोग्य उपचार प्रणाली नाही. तर ती एक संतुलित जीवनपद्धती आहे. युवकांना आयुर्वेदाच्या माध्यमातून सुद्रुढ आणि निरोगी जीवनपद्धती विषयी माहिती देण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
राज्यात आयोजित करण्यात आलेला हा दोन दिवसीय आयुर्वेद युवा महोत्सव आयुष मंत्रालयाच्या २५ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग आहे. सोमवारी या महोत्सवाची सांगता होणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. वरूण सहानी, सीसीआरएएस नवी दिल्लीचे उपमहासंचारक डॉ. एस. नारायण, सहाय्यक संचालक डॉ. आदर्श कुमार, डॉ. एस. गायधनी, गोवा.सरकारच्या आरोग्य संचालनायाचे संचालक डॉ. संजीव दळवी उपस्थित होते.
....
फोटो.. श्रीपाद नाईक इन आयुर्वेद फेस्त नावाने इमेल करतो.


Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.