ETV Bharat / city

'.... तेव्हा सरकार काळ्या मांजरासारखं आडवं जात असेल, तर खपवून घेणार नाही'

author img

By

Published : Nov 12, 2019, 6:58 PM IST

Updated : Nov 12, 2019, 7:16 PM IST

शेतकरी कांद्याला आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपुन ठेवतो.. जेव्हा भाव असेल तेव्हा विक्री करतो, मात्र नेहमी सरकार हे काळ्या मांजरासारखे आडवे येऊन शेतकऱ्यांच्या मुळावर उठते, हे खपवून घेणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे..

राजू शेट्टी

नाशिक - जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची राजू शेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना शेट्टी यांनी, शेतकरी कांद्याला आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवतो आणि जेव्हा भाव असेल तेव्हा विक्री करतो, मात्र सरकार नेहमी काळ्या मांजरासारखे आडवे येऊन शेतकऱ्यांच्या मुळावर उठते. यातूनच कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई करणे आणि बाजारात अस्थिरता निर्माण करणे, अशी कामे केली जातात. यापुढे असा अन्याय अजिबात सहन करणार नाही, असे शेट्टी यावेळी म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची राजू शेट्टी यांनी पाहणी केली

हेही वाचा... ' देशाची अर्थव्यवस्था येत्या १० ते १५ वर्षात १० लाख कोटी डॉलरची होईल'

खासदार राजू शेट्टी यांनी नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका करत, राज्यात पोरखेळ सुरू असल्याचे सांगितले. प्राप्तिकर विभाग आज कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकत आहे, इतक्या दिवस काय झोपा काढल्या का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची नाही, म्हणून हा सर्व खेळ सुरू असून बाजारभावात अस्थिरता निर्माण करून शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैसेही मिळू द्यायचे नाहीत, असे शेतकरी विरोधात असलेले सरकार जायलाच हवे, असेही यावेळी ते म्हणाले.

हेही वाचा... दिल्लीची हवा 'अतिगंभीर' श्रेणीतच, श्वास घेणे बनलेय कठीण

आमचा पक्ष संयुक्त महाआघाडी सोबत आहे, पण निवडणुकीनंतर काही फेरजोड्या होणार असतील तर त्याबाबत अद्यापही आमच्याकडे विचारणा केलेली नाही. या बद्दल काही भाष्य करणे योग्य नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सद्यातरी आम्ही महाआघाडीसोबत आहोत, असेही राजू शेट्टी म्हणाले.

नाशिक - जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची राजू शेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना शेट्टी यांनी, शेतकरी कांद्याला आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवतो आणि जेव्हा भाव असेल तेव्हा विक्री करतो, मात्र सरकार नेहमी काळ्या मांजरासारखे आडवे येऊन शेतकऱ्यांच्या मुळावर उठते. यातूनच कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई करणे आणि बाजारात अस्थिरता निर्माण करणे, अशी कामे केली जातात. यापुढे असा अन्याय अजिबात सहन करणार नाही, असे शेट्टी यावेळी म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची राजू शेट्टी यांनी पाहणी केली

हेही वाचा... ' देशाची अर्थव्यवस्था येत्या १० ते १५ वर्षात १० लाख कोटी डॉलरची होईल'

खासदार राजू शेट्टी यांनी नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका करत, राज्यात पोरखेळ सुरू असल्याचे सांगितले. प्राप्तिकर विभाग आज कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकत आहे, इतक्या दिवस काय झोपा काढल्या का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची नाही, म्हणून हा सर्व खेळ सुरू असून बाजारभावात अस्थिरता निर्माण करून शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैसेही मिळू द्यायचे नाहीत, असे शेतकरी विरोधात असलेले सरकार जायलाच हवे, असेही यावेळी ते म्हणाले.

हेही वाचा... दिल्लीची हवा 'अतिगंभीर' श्रेणीतच, श्वास घेणे बनलेय कठीण

आमचा पक्ष संयुक्त महाआघाडी सोबत आहे, पण निवडणुकीनंतर काही फेरजोड्या होणार असतील तर त्याबाबत अद्यापही आमच्याकडे विचारणा केलेली नाही. या बद्दल काही भाष्य करणे योग्य नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सद्यातरी आम्ही महाआघाडीसोबत आहोत, असेही राजू शेट्टी म्हणाले.

Intro:शेतकरी कांद्याला आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपुन ठेवतो आणि जेव्हा भाव असेल तेव्हा विक्री करतो मात्र नेहमी सरकार हे काळ्या मांजरासारखे आडवे येऊन शेतकऱ्यांच्या मुळावर उठते यातुनच कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई करणे आणि बाजरात अस्थिरता निर्माण करणे असे काम केले जातात असा अन्याय अजिबात सहन करणार नाही याबाबत लवकरात लवकर उपाय काढावाBody:आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी नांदगांव तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका करत राज्यात पोरखेळ सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर आयकर विभाग आज कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकत आहे इतक्या दिवस काय झोपा काढल्या का असा सवाल त्यांनी केला तर सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची नाही म्हणून हा सर्व खेळ सुरू असुन बजाराभावात अस्थिरता निर्माण करून शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैशेही मिळू द्यायचे नाही असे शेतकरी विरोधात असलेले सरकार जायलाच हवे असेही यावेळी ते म्हणाले.Conclusion:आमचा पक्ष संयुक्त महाआघाडी सोबत आहे पण निवडणुकी नंतर काही फेरजोड्या होणार असेल तर त्या बाबत अद्यापही कोणी ही आमच्या कडे विचारणा केलेली नाही त्या बद्दल काही भाष्य करण योग्य नाही पण भारतीय जनता पार्टीला सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी सद्यातरी आम्ही महाआघाडी सोबत आहोत असेही राजू शेट्टी म्हणाले.
Last Updated : Nov 12, 2019, 7:16 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.