ETV Bharat / city

Ajit Pawar : राज्य सरकारच्या दिवाळी योजनेवर अजित पवार म्हणाले 'काहीतरी गौडबंगाल'

author img

By

Published : Oct 15, 2022, 4:07 PM IST

राज्य सरकारने गोरगरिबांना दिवाळी निमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोप केला ( opposition leader Ajit pawar criticized over the Diwali scheme ) असुन, याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच मी बोलेल असेही यावेळी त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते पवार हे काल एक दिवसीय मालेगाव दौऱ्यावर नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतलेली भेटीवर अजितदादा म्हणाले की, आपण या भेटीवरून गैरसमज पसरवू नका अशी विनंती केली.

Ajit pawar
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले

मालेगाव :राज्य सरकारने गोरगरिबांना दिवाळी निमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोप केला असुन,याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच मी बोलेल असेही यावेळी त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते पवार हे काल एक दिवसीय मालेगाव दौऱ्यावर नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतलेली भेटीवर अजितदादा म्हणाले की, आपण या भेटीवरून गैरसमज पसरवू नका अशी विनंती केली. विरोधी पक्षनेते पवार हे काल एक दिवसीय मालेगाव दौऱ्यावर नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले



सरकारने योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित - दिवाळीनिमित्त प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना अन्नधान्य व्यतिरिक्त शंभर रुपयांत सामान देण्यात येणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारच्या गोरगरिबांना दिवाळीनिमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेवर प्रश्न उपस्थित केले असून, या योंजनेत शंभर टक्के गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या बाबत आकडेवारी घेत असून आकडेवारी मिळताच ती जनते समोर ठेवणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

भेटीबाबत काय म्हणाले अजित पवार - राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची बंद दाराआड घेतलेल्या भेटी बाबत गैर अर्थ काढू बोल नका, असे मत विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केले असून ते मालेगावात प्रसार माध्यमाशी बोलत होते.

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतलेली भेटीवर अजित पवार प्रतिक्रिया व्यक्त करताना

जयंत पाटील यांची टीका - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार अल्पसंख्यांक समाजाला त्रास देण्याचे काम करीत असून आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस संविधानाची रक्षा करण्यास सक्षम असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगाव महापालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

मालेगाव :राज्य सरकारने गोरगरिबांना दिवाळी निमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोप केला असुन,याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच मी बोलेल असेही यावेळी त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते पवार हे काल एक दिवसीय मालेगाव दौऱ्यावर नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतलेली भेटीवर अजितदादा म्हणाले की, आपण या भेटीवरून गैरसमज पसरवू नका अशी विनंती केली. विरोधी पक्षनेते पवार हे काल एक दिवसीय मालेगाव दौऱ्यावर नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले



सरकारने योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित - दिवाळीनिमित्त प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना अन्नधान्य व्यतिरिक्त शंभर रुपयांत सामान देण्यात येणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारच्या गोरगरिबांना दिवाळीनिमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेवर प्रश्न उपस्थित केले असून, या योंजनेत शंभर टक्के गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या बाबत आकडेवारी घेत असून आकडेवारी मिळताच ती जनते समोर ठेवणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

भेटीबाबत काय म्हणाले अजित पवार - राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची बंद दाराआड घेतलेल्या भेटी बाबत गैर अर्थ काढू बोल नका, असे मत विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केले असून ते मालेगावात प्रसार माध्यमाशी बोलत होते.

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतलेली भेटीवर अजित पवार प्रतिक्रिया व्यक्त करताना

जयंत पाटील यांची टीका - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार अल्पसंख्यांक समाजाला त्रास देण्याचे काम करीत असून आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस संविधानाची रक्षा करण्यास सक्षम असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगाव महापालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.