ETV Bharat / city

तोतलाडोह धरण भरल्याने नागपुरकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले

author img

By

Published : Sep 11, 2019, 1:54 PM IST

तोतलाडोह जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होऊन 90 टक्क्यांवर पाणीसाठा पोहचला आहे. जलाशयात पाणीसाठा वाढल्याने नागपूर शहरावरील जलसंकट दूर झाले आहे. तोतलाडोह धरण 2013 साला नंतर पहिल्यांदाच पूर्ण भरले आहे.

तोतलाडोह धरण

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाने 20 दिवसांपूर्वी मृत साठा गाठला होता. त्यामुळे नागपुरकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले होते. मात्र जोरदार पावसामुळे व चौराई धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे तोतलाडोह धरणात 90 टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. तोतलाडोह धरण 2013 नंतर पहिल्यांदाच पूर्ण भरले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

नागपुरकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले

हेही वाचा - नागपूर शहराला आता महावितरण करणार वीजपुरवठा, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

तोतलाडोह जलाशयातील पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे महापालिका शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासंबंधीचा निर्णय 15 सप्टेबर नंतर घेईल, अशी माहिती पाणीपुरवठा समितीचे सभापती विजय झलके यांनी दिली. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी या जलाशयाने तळ गाठला होता. त्यातच मान्सूननेही दडी मारल्याने मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढावली होती. परंतु गेल्या काही दिवसात लगतच्या मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने तेथील चौराई धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तोतलाडोहातील पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहचला आहे. तोतलाडोह जलाशयात पाणीसाठा वाढल्याने नागपूर शहरावरील जलसंकट दूर झाले आहे. तसेच पाण्याची पातळी 95 टक्क्यांवर पोहोचल्यास तोतलाडोह मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल, अशी माहिती विजय झलके यांनी दिली.

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाने 20 दिवसांपूर्वी मृत साठा गाठला होता. त्यामुळे नागपुरकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले होते. मात्र जोरदार पावसामुळे व चौराई धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे तोतलाडोह धरणात 90 टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. तोतलाडोह धरण 2013 नंतर पहिल्यांदाच पूर्ण भरले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

नागपुरकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले

हेही वाचा - नागपूर शहराला आता महावितरण करणार वीजपुरवठा, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

तोतलाडोह जलाशयातील पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे महापालिका शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासंबंधीचा निर्णय 15 सप्टेबर नंतर घेईल, अशी माहिती पाणीपुरवठा समितीचे सभापती विजय झलके यांनी दिली. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी या जलाशयाने तळ गाठला होता. त्यातच मान्सूननेही दडी मारल्याने मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढावली होती. परंतु गेल्या काही दिवसात लगतच्या मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने तेथील चौराई धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तोतलाडोहातील पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहचला आहे. तोतलाडोह जलाशयात पाणीसाठा वाढल्याने नागपूर शहरावरील जलसंकट दूर झाले आहे. तसेच पाण्याची पातळी 95 टक्क्यांवर पोहोचल्यास तोतलाडोह मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल, अशी माहिती विजय झलके यांनी दिली.

Intro:नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघालेला आहे...20 दिवसांपूर्वी मृत साठा गाठलेल्या तोतलाडोह धरणात 90 टक्यांपेक्षा जास्त पाणी साठा जमा झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली आहे....2013 नंतर तोतलाडोह धरण पहिल्यांदाच पूर्ण भरलं आहे Body:नागपूर शहराला पणीपुरावठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होऊन 90 टक्क्यांवर पाणीसाठा पोहचला आहे... त्यामुळे नागपूर शहरावर येणारे पिण्याच्या पाण्याचे संकट सद्यपरिस्थित टळले आहे... त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासंबंधी निर्णय महापालिका 15 सप्टेंबर नंतर घेईल अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती विजय झलके यांनी दिली... नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी या जलाशयातील पाणी साठ्याने तळ गाठला होता... त्यातच मान्सूनने दडी मारल्याने या जलाशयाच्या मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची नामुष्की नागपूर महापालिकेवर आली होती... परंतु गेल्या काही दिवसात लगतच्या मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाणी सोडण्यात आले... त्यामुळे तोतलाडोह मध्ये पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहचला आहे... तोतलाडोह जलाशयात पाणीसाठा वाढल्याने नागपूर शहरावरील जलसंकट दूर झाले आहे...तसेच पाण्याची पातळी 95 टक्क्यांवर पोहोचल्यास तोतलाडोह मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल अशी माहिती विजय झलके यांनी दिली.

बाईट -- विजय (पिंटू) झलके (सभापती, पाणीपुरवठा समिती,महापालिकाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.