ETV Bharat / city

'45 डिग्री तापमानात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घातक'- रवींद्र फडणवीस - शिक्षण विभाग

विदर्भ आणि मराठवाड्याचे तापमान एप्रिलमध्ये 40 ते 45 डिग्री पर्यत गेले आहे. अशा परिस्थितीत अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पिण्याची आणि विजेची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय चुकीचा असल्याचं मत राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सचिव रवींद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

ravindra fadanvis
ravindra fadanvis
author img

By

Published : Mar 30, 2022, 8:06 PM IST

नागपूर:- कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी यावर्षी राज्यातील शाळा एप्रिल महिन्याच्या अखेर पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. सध्या विदर्भातील भीषण उष्णतेची लाट आली असताना या आदेशामुळे केवळ पालकच नाही तर शिक्षकांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सचिव रवींद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री याना लिहिले पत्र लिहिले आहे. एप्रिल महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने राज्यातील भौगोलिक परिस्थितीसह कोणत्याही गोष्टीचा विचार न करता हा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रवींद्र फडणवीस वक्तव्य

विदर्भ आणि मराठवाड्याचे तापमान एप्रिलमध्ये 40 ते 45 डिग्री पर्यत गेले आहे. अशा परिस्थितीत अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पिण्याची आणि विजेची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय चुकीचा असल्याचं मत राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सचिव रवींद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. एप्रिल महिन्यात जर शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 45 डिग्री तापमानात काम करण्यासाठी मुंबईतील अधिकाऱ्यांना पाठवावे असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

रवींद्र फडणवीस
पत्र
2007 च्या निर्णयाची पुनरावृत्ती :- 2007 मध्ये सुद्धा शिक्षण विभागाकडून अशाप्रकारे अजब निर्णय घेण्यात आला होता,मात्र त्यावेळी त्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती,त्यानंतर मात्र शिक्षण विभागाने आपला निर्णय परत घेतला होता अशी माहिती रवींद्र फडणवीस यांनी दिली आहे.हेही वाचा - Pune Airport : पुणे विमानतळावर सुखोईचा टायर फुटला; खराब धावपट्टीचा फटका

नागपूर:- कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी यावर्षी राज्यातील शाळा एप्रिल महिन्याच्या अखेर पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. सध्या विदर्भातील भीषण उष्णतेची लाट आली असताना या आदेशामुळे केवळ पालकच नाही तर शिक्षकांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सचिव रवींद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री याना लिहिले पत्र लिहिले आहे. एप्रिल महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने राज्यातील भौगोलिक परिस्थितीसह कोणत्याही गोष्टीचा विचार न करता हा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रवींद्र फडणवीस वक्तव्य

विदर्भ आणि मराठवाड्याचे तापमान एप्रिलमध्ये 40 ते 45 डिग्री पर्यत गेले आहे. अशा परिस्थितीत अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पिण्याची आणि विजेची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय चुकीचा असल्याचं मत राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सचिव रवींद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. एप्रिल महिन्यात जर शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 45 डिग्री तापमानात काम करण्यासाठी मुंबईतील अधिकाऱ्यांना पाठवावे असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

रवींद्र फडणवीस
पत्र
2007 च्या निर्णयाची पुनरावृत्ती :- 2007 मध्ये सुद्धा शिक्षण विभागाकडून अशाप्रकारे अजब निर्णय घेण्यात आला होता,मात्र त्यावेळी त्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती,त्यानंतर मात्र शिक्षण विभागाने आपला निर्णय परत घेतला होता अशी माहिती रवींद्र फडणवीस यांनी दिली आहे.हेही वाचा - Pune Airport : पुणे विमानतळावर सुखोईचा टायर फुटला; खराब धावपट्टीचा फटका
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.