ETV Bharat / city

नागपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक

author img

By

Published : Aug 26, 2021, 7:36 PM IST

किरकोळ वादातून तीन मित्रांनी संगनमत करून एका मित्राची हत्या केल्याची घटना राजीवनगर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घडली आहे.

Nagpur latest news
Nagpur latest news

नागपूर - मित्रांसोबत दारू पीत असताना झालेल्या किरकोळ वादातून तीन मित्रांनी संगनमत करून एका मित्राची हत्या केल्याची घटना राजीवनगर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घडली आहे. सुरेंद्र आनंद पीलघर (२६) असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी हिंगणा पोलिसांनी अवघ्या काही तासांत तीनही आरोपींना अटक केली आहे.

प्रतिक्रिया

किरकोळ वादातून हत्या -

सुरेंद्र आनंद पीलघर याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश उर्फ गजनी शाहा (१९), अरुण जनमत सिंह (१९) आणि बबलू रामाधर स्लोडिया (२०) यांना अटक केली आहे. मृतक व आरोपी हे सर्व बांधकाम मजूर असून एकमेकांचे निकटवर्तीय होते. मृतक आणि आरोपी नियमितपणे एकत्र दारू प्यायचे. मृतक सुरेंद्र हा भाजीपाला आणण्यासाठी घरून बाहेर पडला होता. मात्र, वाटेत त्याचे दोन मित्र त्याला भेटले. त्यामुळे सुरेंद्र भाजीपाला घ्यायचे विसरून दारू पिण्यासाठी गुत्त्यावर गेला. तिथे तिघेही आरोपी आधीच दारू पीत होते. दारूच्या नशेत मृतक व त्याच्या मित्रांसोबत आरोपींची बाचाबाची झाली. त्यानंतर तिथून सगळे निघून गेले. मात्र, वाटेत जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आरोपींनी मृतक सुरेंद्रला गाठले आणि धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

हत्येसाठी वापरलेल्या चाकूसह तिघांना अटक -

आज सकाळी परिसरातील नागरिकांना सुरेंद्रचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पळून दिसला. नागरिकांनी लागलीच याची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. डीसीपी पखाले एसीपी परशुराम कार्यकर्ते यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयताची ओळख पटवल्यानंतर तपासाला सुरवात केली, तेव्हा मृतक सुरेंद्रला दारूचे व्यसन होते आणि त्यातून काल त्याचा आरोपींसोबत वाद झाल्याची माहिती हाती येताच पोलिसांनी या प्रकरणात तीनही आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून हत्या करण्यासाठी वापरलेले चाकू जप्त केले आहे.

हेही वाचा - भाजप-शिवसेनेतील मतभेद कोणत्याही क्षणी दूर होऊ शकतात - प्रवीण तोगडिया

नागपूर - मित्रांसोबत दारू पीत असताना झालेल्या किरकोळ वादातून तीन मित्रांनी संगनमत करून एका मित्राची हत्या केल्याची घटना राजीवनगर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घडली आहे. सुरेंद्र आनंद पीलघर (२६) असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी हिंगणा पोलिसांनी अवघ्या काही तासांत तीनही आरोपींना अटक केली आहे.

प्रतिक्रिया

किरकोळ वादातून हत्या -

सुरेंद्र आनंद पीलघर याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश उर्फ गजनी शाहा (१९), अरुण जनमत सिंह (१९) आणि बबलू रामाधर स्लोडिया (२०) यांना अटक केली आहे. मृतक व आरोपी हे सर्व बांधकाम मजूर असून एकमेकांचे निकटवर्तीय होते. मृतक आणि आरोपी नियमितपणे एकत्र दारू प्यायचे. मृतक सुरेंद्र हा भाजीपाला आणण्यासाठी घरून बाहेर पडला होता. मात्र, वाटेत त्याचे दोन मित्र त्याला भेटले. त्यामुळे सुरेंद्र भाजीपाला घ्यायचे विसरून दारू पिण्यासाठी गुत्त्यावर गेला. तिथे तिघेही आरोपी आधीच दारू पीत होते. दारूच्या नशेत मृतक व त्याच्या मित्रांसोबत आरोपींची बाचाबाची झाली. त्यानंतर तिथून सगळे निघून गेले. मात्र, वाटेत जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आरोपींनी मृतक सुरेंद्रला गाठले आणि धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

हत्येसाठी वापरलेल्या चाकूसह तिघांना अटक -

आज सकाळी परिसरातील नागरिकांना सुरेंद्रचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पळून दिसला. नागरिकांनी लागलीच याची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. डीसीपी पखाले एसीपी परशुराम कार्यकर्ते यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयताची ओळख पटवल्यानंतर तपासाला सुरवात केली, तेव्हा मृतक सुरेंद्रला दारूचे व्यसन होते आणि त्यातून काल त्याचा आरोपींसोबत वाद झाल्याची माहिती हाती येताच पोलिसांनी या प्रकरणात तीनही आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून हत्या करण्यासाठी वापरलेले चाकू जप्त केले आहे.

हेही वाचा - भाजप-शिवसेनेतील मतभेद कोणत्याही क्षणी दूर होऊ शकतात - प्रवीण तोगडिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.