नागपूर - जिल्हा परिषदेतील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची चर्चा केवळ नागपूर जिल्हा आणि विदर्भापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. तर या पराभवाचे फटाके मुंबईसह दिल्लीत देखील फुटले. भाजपने हा पराभव स्वीकारला आहे. तरीही त्यांच्याकडे या शिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही. जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपला आलेल्या अपयशाची कारणमीमांसा आमचे वरीष्ठ नेते करतील, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सांगितले जात आहे.
हेही वाचा.... जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी - गृहमंत्री अनिल देशमुख
राज्यातील इतर जिल्हा परिषदांपेक्षा नागपूर जिल्हा परिषदेचे निकाल हे भाजपला धक्का देणारे ठरले. जिल्ह्यात काँग्रेसने ५८ पैकी ३० जागा मिळवून एक हाती यश मिळवले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आपला पराभव स्वीकारला असला, तरीही पराभवाच्या मुळ कारणांपासून मात्र भाजप नेते अजूनही दूर असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा... 'शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बरोबरच चिंतामुक्तही करणार'
स्थानिक नेत्यांकडून पराभवाचं खापर भलतीकडेच...
निवडणुकीच्या आधी तीन दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात महाविकास आघाडीने नागपुरमध्ये ३ मंत्र्यांना वजनदार मंत्रालय दिले. ज्यामुळे काँग्रेस पक्षाच्या बाजूने मतप्रवाह तयार झाला. याचा फटका भाजपला बसल्याचे, भाजपच्या स्थानिक प्रवक्त्या अर्चना डेहनकर म्हणाल्या आहेत.
या शिवाय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसह मोठमोठ्या घोषणा केल्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला नागपुर जिल्ह्यात मोठे यश मिळाल्याचा निष्कर्ष भाजप नेते काढत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणूकी आधी सत्ताधाऱ्यांकडून ग्रामीण भागातील मतदारांना धमक्या देण्यात आल्या असल्याचा गंभीर आरोपही, अर्चना डेहनकर यांनी केला.
हेही वाचा... डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला