मुंबई - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Mamata Banerjee met NCP chief Sharad Pawar ) यांची भेट घेतली. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. देशात सध्या जी परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठी एक सक्षम पर्याय देण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून जे लढतील त्या सर्वांना सोबत घेतलं जाईल असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. ममता बॅनर्जींनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.
या भेटीनंतर ममता बँनर्जी म्हणाल्या की. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटायला आले होते. मुख्यमंत्री लवकर बरे होवो, अशी प्रार्थना मी करते. मुख्यमंत्री भेटू शकले नाहीत पण संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे मला भेटायला आले होते. देशात जी फॅसिझमची परिस्थिती सुरू आहे. त्याच्या विरोधात एक altetnative फ्रंट तयार केला पाहिजे. शरद पवार हे मोस्ट सिनिअर लीडर आहेत, त्यांच्यासोबत मी काम केलं आहे, म्हणून मी त्यांच्याशी पोलिटिकल कर्टसी आणि चर्चा करायला आली आहे. असे ममता म्हणाल्या.
जे लढतात अशांचा एक स्ट्रॉंग alternative हवाय, जर कुणी लढत नाही तर आम्ही काय करू? , असा टोला काँग्रेसला लगावला. तिसऱ्या आघाडीचा लीडर कोण यावर त्यांनी चर्चा करून ठरवू असे म्हणाल्या.
शरद पवार म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी फिल्ड मध्ये राहून काम केल्याने जिंकता आले. जे नवीन कायदे झालेत त्याबाबत एक सेकंड thought देणं गरजेचं आहे असं आम्हांला वाटते. कुणाला वगळण्याची गोष्ट नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आहे. ज्यांना सगळ्या सोबत जायचंय त्यांच्या सोबत यायला हवे. असे काँग्रेसबाबत पवार म्हणाले.
युपीएचे नेतृत्व कोण करणार या प्रश्नावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या विरोधात युपीए आहे कुठे ? त्यामुळे तिसऱ्या आघाडीची गरज आहे.