ETV Bharat / city

‘गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणातील दक्षता समितींनी सतर्क राहावे’

author img

By

Published : Jul 17, 2020, 8:56 PM IST

गणेशोत्सवात मुंबई भागातून काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपापल्या घरी जाऊन उत्सव साजरा करतात. सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागात जास्त दिसत असला तरी ग्रामीण भागातही संसर्ग दिसू लागला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

मुंबई - कोकणातील गावागावातील दक्षता समिती व गणेश मंडळांनी गणेशोत्सव सुरक्षित साजरा करावा. आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता उत्सव पार पाडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या कोरोनाविषयीच्या उपाययोजना आढावा बैठकीत शुक्रवारी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की गणेशोत्सवात मुंबई भागातून काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपापल्या घरी जाऊन उत्सव साजरा करतात. सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागात जास्त दिसत असला तरी ग्रामीण भागातही संसर्ग दिसू लागला आहे. मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अजूनही त्याचा प्रादुर्भाव नसला तरी गणेशोत्सव काळात नागरिकांची ये-जा होणार आहे. हे पाहता प्रशासनाने पुरेपूर काळजी घ्या व दक्ष राहावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुरेसा पोलीस बंदोबस्त व आरोग्य कर्मचारी राहतील, याची काळजी घ्या-
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यांचे कटाक्षाने पालन सर्वांकडून झाले पाहिजे. मुंबईत मोठ्या गणेश मंडळांशी बोलून त्यांच्या एकमताने यंदाचा उत्सव साजरा करण्याबाबत काही नियम ठरविले आहेत. कोकणातही त्याचे पालन होणे खूप गरजेचे आहे. प्रशासनाने या काळात चेक पोस्ट अधिक सतर्क करावेत. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त व आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्यावी. गणेश मंडळानीसुद्धा आपापल्या गावांत आरोग्य शिबिरे घ्यावीत. उत्सवाचे स्वरुप खूप साधे ठेवावे. गर्दी होणार नाही. तसेच मास्क लावणे व शारीरिक अंतर ठेवणे हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे.


बेड्स, रुग्णवाहिका तयार ठेवा
रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी चाचणी प्रयोगशाळा सुरु झाली आहे. रायगडमधील प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वित होईल. आयसोलेशन बेड्स तसेच इतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवाव्यात. रुग्णवाहिकांसह गणेशोत्सवापर्यंत वैद्यकीय तयारी राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

१५ ऑगस्ट रोजी प्रयोगशाळा सुरू होणार

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले की, सध्या ३५०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १ हजार ९०० नागरिक घरीच विलगीकरणात आहेत. मागील काही दिवसात दक्षिण रायगड भागात कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण औद्योगिक वसाहतीमध्ये आढळले आहेत. पनवेल व महाडमध्ये अशीच परिस्थिती आहे. १० इमारती विलगीकरण करण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. ५ हजार ५०० आयसोलेशन बेड्स उपलब्ध करीत आहोत. १५ ऑगस्टपूर्वी एक प्रयोगशाळा रायगड जिल्ह्यासाठी उभी करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या १ हजार ते १,२०० चाचण्या दिवसाला होतात. हे प्रमाण ३ हजारपर्यंत नेणार असल्याची माहिती रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, १०४९ पैकी ६६५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. एकूण ३६ मृत्यू आजवर झाले आहेत. १, ४९६ बेड्सची सुविधा केली आहे. २०० रुग्ण सध्या याठिकाणी दाखल आहेत. १०० बेड्सचे महिला रुग्णालय लवकरच सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी प्रयोगशाळेत २०० चाचण्या होतात अशी माहितीही त्यांनी दिली. रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल व नागरी कृती दल स्थापन केले आहेत.

सिंधुदुर्गात चेक पोस्ट सज्ज

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले, की जिल्ह्यात सध्या कोरोनाचे २७० रुग्ण आहेत. तर २७ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आजवर ५ मृत्यू झाले आहेत. मुंबई सीमेलगत व इतर ठिकाणीही चेक पोस्ट तयार झाल्या आहेत. गणेशोत्सावत दीड लाख लोक जिल्ह्यात येतील, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.

मुंबई - कोकणातील गावागावातील दक्षता समिती व गणेश मंडळांनी गणेशोत्सव सुरक्षित साजरा करावा. आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता उत्सव पार पाडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या कोरोनाविषयीच्या उपाययोजना आढावा बैठकीत शुक्रवारी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की गणेशोत्सवात मुंबई भागातून काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपापल्या घरी जाऊन उत्सव साजरा करतात. सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागात जास्त दिसत असला तरी ग्रामीण भागातही संसर्ग दिसू लागला आहे. मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अजूनही त्याचा प्रादुर्भाव नसला तरी गणेशोत्सव काळात नागरिकांची ये-जा होणार आहे. हे पाहता प्रशासनाने पुरेपूर काळजी घ्या व दक्ष राहावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुरेसा पोलीस बंदोबस्त व आरोग्य कर्मचारी राहतील, याची काळजी घ्या-
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यांचे कटाक्षाने पालन सर्वांकडून झाले पाहिजे. मुंबईत मोठ्या गणेश मंडळांशी बोलून त्यांच्या एकमताने यंदाचा उत्सव साजरा करण्याबाबत काही नियम ठरविले आहेत. कोकणातही त्याचे पालन होणे खूप गरजेचे आहे. प्रशासनाने या काळात चेक पोस्ट अधिक सतर्क करावेत. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त व आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्यावी. गणेश मंडळानीसुद्धा आपापल्या गावांत आरोग्य शिबिरे घ्यावीत. उत्सवाचे स्वरुप खूप साधे ठेवावे. गर्दी होणार नाही. तसेच मास्क लावणे व शारीरिक अंतर ठेवणे हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे.


बेड्स, रुग्णवाहिका तयार ठेवा
रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी चाचणी प्रयोगशाळा सुरु झाली आहे. रायगडमधील प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वित होईल. आयसोलेशन बेड्स तसेच इतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवाव्यात. रुग्णवाहिकांसह गणेशोत्सवापर्यंत वैद्यकीय तयारी राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

१५ ऑगस्ट रोजी प्रयोगशाळा सुरू होणार

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले की, सध्या ३५०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १ हजार ९०० नागरिक घरीच विलगीकरणात आहेत. मागील काही दिवसात दक्षिण रायगड भागात कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण औद्योगिक वसाहतीमध्ये आढळले आहेत. पनवेल व महाडमध्ये अशीच परिस्थिती आहे. १० इमारती विलगीकरण करण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. ५ हजार ५०० आयसोलेशन बेड्स उपलब्ध करीत आहोत. १५ ऑगस्टपूर्वी एक प्रयोगशाळा रायगड जिल्ह्यासाठी उभी करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या १ हजार ते १,२०० चाचण्या दिवसाला होतात. हे प्रमाण ३ हजारपर्यंत नेणार असल्याची माहिती रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, १०४९ पैकी ६६५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. एकूण ३६ मृत्यू आजवर झाले आहेत. १, ४९६ बेड्सची सुविधा केली आहे. २०० रुग्ण सध्या याठिकाणी दाखल आहेत. १०० बेड्सचे महिला रुग्णालय लवकरच सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी प्रयोगशाळेत २०० चाचण्या होतात अशी माहितीही त्यांनी दिली. रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल व नागरी कृती दल स्थापन केले आहेत.

सिंधुदुर्गात चेक पोस्ट सज्ज

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले, की जिल्ह्यात सध्या कोरोनाचे २७० रुग्ण आहेत. तर २७ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आजवर ५ मृत्यू झाले आहेत. मुंबई सीमेलगत व इतर ठिकाणीही चेक पोस्ट तयार झाल्या आहेत. गणेशोत्सावत दीड लाख लोक जिल्ह्यात येतील, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.