ETV Bharat / city

#CitizenshipAmendmentBill : स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

author img

By

Published : Dec 10, 2019, 4:30 PM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. विधेयकाबद्दल स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

uddhav thackarey on citizenship amendment bill
स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - लोकसभेत मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेच्या खासदारांनी पाठिंबा दिला होता. हिवाळी अधिवेशनात सोमवारी(दि.09 डिसेंबर)ला नागरिकत्व विधेयकावरुन गदारोळ झाला. अखेर संध्याकाळी 311 मतांनी विधेयक मंजूर झाले. तर 80 मते विरोधात पडली होती.

स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या विधेयकाला शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. विधेयकाबद्दल स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली; परंतु, सेनेच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याने आम्हाला अधिक स्पष्टिकरणाची गरज असल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलताना, या विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही असे चित्र सत्ताधारी उभे करत आहेत. परंतु,या भ्रमातून बाहेर यायला हवे, असे ठाकरे म्हणाले.

सध्या राज्यसभेत 240 खासदार आहेत. संबंधित विधेयक मंजूर करण्यासाठी भाजप सरकारला 212 मतांची गरज आहे. आत्ता भाजपच्या पाठिशी 83 खासदार असल्याचे चित्र आहे. यातच तेलंगणा राष्ट्र समितीने अंग काढून घेतले असून त्यांनी विधेयकाला विरोध दर्शवला आहे. एआयडीएमके या पक्षाचे 11 खासदार आहेत. तसेच सेनेचे 03 खासदार आहेत.

मुंबई - लोकसभेत मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेच्या खासदारांनी पाठिंबा दिला होता. हिवाळी अधिवेशनात सोमवारी(दि.09 डिसेंबर)ला नागरिकत्व विधेयकावरुन गदारोळ झाला. अखेर संध्याकाळी 311 मतांनी विधेयक मंजूर झाले. तर 80 मते विरोधात पडली होती.

स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या विधेयकाला शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. विधेयकाबद्दल स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली; परंतु, सेनेच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याने आम्हाला अधिक स्पष्टिकरणाची गरज असल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलताना, या विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही असे चित्र सत्ताधारी उभे करत आहेत. परंतु,या भ्रमातून बाहेर यायला हवे, असे ठाकरे म्हणाले.

सध्या राज्यसभेत 240 खासदार आहेत. संबंधित विधेयक मंजूर करण्यासाठी भाजप सरकारला 212 मतांची गरज आहे. आत्ता भाजपच्या पाठिशी 83 खासदार असल्याचे चित्र आहे. यातच तेलंगणा राष्ट्र समितीने अंग काढून घेतले असून त्यांनी विधेयकाला विरोध दर्शवला आहे. एआयडीएमके या पक्षाचे 11 खासदार आहेत. तसेच सेनेचे 03 खासदार आहेत.

Intro:Body:mh_mum_thakare_bill_mumbai_7204684

स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देणार नाही :ठाकरे

मुंबई: सोमवारी रात्री लोकसभेत मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता.

दरम्यान, काल या विधेयकाला शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. या विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही अशी
सरळ विभागणी केली गेली आहे. त्यामुळे कुणाला शंका घेण्यास वाव मिळू नये म्हणून आम्ही लोकसभेत या
विधेयकाला पाठिंबा दिला.

या विधेयकात अधिक स्पष्टता
येण्याची गरज आहे. तसेच याबाबत जोपर्यंत या विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत मतदान करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.