ETV Bharat / city

Maharashtra Corona : रुग्णसंख्येत किंचित घट! ६७५३ नवीन रुग्ण, १६७ रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 23, 2021, 8:18 PM IST

राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. राज्यात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यातील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. राज्यात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यातील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. रविवारी ९ हजार रुग्ण आढळून आले होते. सोमवारी त्यात घट होऊन ६०१७ रुग्ण आढळून आले होते. बुधवारी त्यात वाढ होऊन ८१५९ रुग्ण आढळून आले, गुरुवारी त्यात घट होऊन ७३०२ नवे रुग्ण आढळून आले. आज त्यात आणखी घट होऊन ६७५३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गेले काही दिवस रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येत सतत चढउतार दिसून येत आहे.

५९७९ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ५९७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,२२,४८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,७५३ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३१,२०५ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६४,४६,३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५१,८१० (१३.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५२,७०२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३,६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,७६९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यू दर स्थिर -
सोमवारी मृत्यूच्या संख्येत घट होऊन ६६ मृत्यूची नोंद झाली होती. मंगळवारी त्यात वाढ होऊन १४७ मृत्यूची नोंद झाली, बुधवारी त्यात किंचित वाढ होऊन १६५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी त्यात घट होऊन १२० मृत्यूंची नोंद झाली. आज शुक्रवारी पुन्हा मृत्युसंख्येत वाढ होऊन १६७ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.०९ टक्के इतका नोंदवण्यात आला असून तो काही दिवस स्थिर आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - ३७३
रायगड - २८१
अहमदनगर - ७२३
पुणे - ६९७
पुणे पालिका - २७३
सोलापूर - ४२५
सातारा - ८१७
कोल्हापूर - ७४४
कोल्हापूर पालिका - १५६
सांगली - ६४३
रत्नागिरी - १५८

जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या
22 जुलै - 6753 नवे रुग्ण
22 जुलै - 7302 नवे रुग्ण
21 जुलै - 8159 नवे रुग्ण
20 जुलै - 6910 नवे रुग्ण
19 जुलै - 6017 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
17 जुलै - 8172 नवे रुग्ण
16 जुलै - 7761 नवे रुग्ण
15 जुलै - 8010 नवे रुग्ण
14 जुलै - 8602 नवे रुग्ण
13 जुलै - 7243 नवे रुग्ण
12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

हेही वाचा - Maharashtra Floods : राज्यात अतिवृष्टी, पुराचे 65 बळी; पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा

मुंबई - राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. राज्यात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यातील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. रविवारी ९ हजार रुग्ण आढळून आले होते. सोमवारी त्यात घट होऊन ६०१७ रुग्ण आढळून आले होते. बुधवारी त्यात वाढ होऊन ८१५९ रुग्ण आढळून आले, गुरुवारी त्यात घट होऊन ७३०२ नवे रुग्ण आढळून आले. आज त्यात आणखी घट होऊन ६७५३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गेले काही दिवस रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येत सतत चढउतार दिसून येत आहे.

५९७९ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ५९७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,२२,४८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,७५३ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३१,२०५ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६४,४६,३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५१,८१० (१३.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५२,७०२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३,६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,७६९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यू दर स्थिर -
सोमवारी मृत्यूच्या संख्येत घट होऊन ६६ मृत्यूची नोंद झाली होती. मंगळवारी त्यात वाढ होऊन १४७ मृत्यूची नोंद झाली, बुधवारी त्यात किंचित वाढ होऊन १६५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी त्यात घट होऊन १२० मृत्यूंची नोंद झाली. आज शुक्रवारी पुन्हा मृत्युसंख्येत वाढ होऊन १६७ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.०९ टक्के इतका नोंदवण्यात आला असून तो काही दिवस स्थिर आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - ३७३
रायगड - २८१
अहमदनगर - ७२३
पुणे - ६९७
पुणे पालिका - २७३
सोलापूर - ४२५
सातारा - ८१७
कोल्हापूर - ७४४
कोल्हापूर पालिका - १५६
सांगली - ६४३
रत्नागिरी - १५८

जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या
22 जुलै - 6753 नवे रुग्ण
22 जुलै - 7302 नवे रुग्ण
21 जुलै - 8159 नवे रुग्ण
20 जुलै - 6910 नवे रुग्ण
19 जुलै - 6017 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
17 जुलै - 8172 नवे रुग्ण
16 जुलै - 7761 नवे रुग्ण
15 जुलै - 8010 नवे रुग्ण
14 जुलै - 8602 नवे रुग्ण
13 जुलै - 7243 नवे रुग्ण
12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

हेही वाचा - Maharashtra Floods : राज्यात अतिवृष्टी, पुराचे 65 बळी; पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.